मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
इतकं काही बावरायला नकोय म...

आरती देवगांवकर - इतकं काही बावरायला नकोय म...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


इतकं काही बावरायला नकोय
मुळांसह नव्या जागी रुजताना...
मुळांबरोबर आलेली थोडी जुनी माती
मिसळून टाक नव्या मातीत...
मग रुजशीलच तू...

रुजायलाच हवं
बहरायलाच हवं तुला

तुला कल्पना नाहीये
किती खर्च, किती व्याप केलेत
तुला एका जागेवरून दुसरीकडं रुजवायला...

नको होऊस व्याकुळ जुन्या आठवणींनी
भेटतील इथंही नवे सगे - सोबती
लगडशीलही पुन्हा फळा - फुलांनी...

नशीब समज...
त्यांनी तुझ्या मुळांवर ऍसिड ओतलं नाही...!

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP