मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


म्हणे, ‘राया आशीर्थंचन । तूं भूपाळ मी ब्राम्हाण ।
तूं दाता सर्वसंपन्न । दीन आम्ही मागते ॥
अराजा मित्र नव्हे रायातें । ऐसें बोलिलां तें यथार्थते ।
आतां जरी मानेल तूतें । तरी मित्रत्व मानी कां ’।
द्रुपद म्हणे, ‘द्रोणाचार्या । करणें न लगे येथें आश्चर्या ।
हारी अथवा जय ऐश्वर्या । पुरुष पावे प्रारब्धें ॥
काळें लाभ काळें हाणी । याचा विचार कायसा मनीं ? ।
तोष लाभ परदूपणीं । चित्त न घाली जाणता ॥
अवगुणासि करणें गुण । हें उत्तम पुरुषाचें लक्षण ।
उचिता चुकला अज्ञान । तें सज्ञान स्मरेना ॥
दैवापुढें न चाले बळ  । ऐसें बोलती विवेककुशळ ।
कुबेरसखा सर्व काळ । दैन्य भोगी शंकर ॥
असो, सुकृतबळोपायें । समर्थ करिती काय नोहे ? ।
तुजसारिका इच्छिलें लाहे । हें काय नवल सांगणें ?’॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP