मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विठ्ठल चित्रकवि

विठ्ठल चित्रकवि

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


छंद बंध वचनें अनुपम्यें ।
काव्यरीति वचने ननु रम्यें ॥

कमलनयन कान्हा जो उभा कुंजशाई ।
मुरलि मधुर नादें जो वळी लक्ष गाईं ॥
शतहिमरुचि लोपे गोपिका मध्यभागीं ।
हृदयिं धरिं मना तूं लुब्ध जो रासरंगीं ॥

वाणी पवित्र रघुनाथचरित्र गातां ।
तें आइका पतित पावन होय आतां ॥
हें पंडितांस विनती करणें न लागे ।
‘घ्या हो ! सुगंध’ मधुपांप्रति कोण सांगे ? ॥

‘धान्याचे बहु ढीग सत्य वरुते त्री त्यांतळीं मांडणें ।
पूर्वी पुस्तक पूजणें शकुन पैं त्यानंतरें पाहणें ॥
तीं ठायीं तिन पोफळें वरि फुलें चिंतूनियां ठेवणें ।
आदौ सर्ग तथा दशा दशकिंचा श्लोक क्रमें देखणें ॥’

‘ज्ञाता श्रीगुरु रत्नपीठ भुवनीं चिद्नत्नसिंहासनीं ।
हस्ताब्जीं वरदा भयें प्रियमता शांति क्षमा आसनीं ॥
सालंकार उदार पुस्तक पुढें शिष्या प्रबोधीतसे ।
वाक्यें ‘तत्त्वमसीति’ विठ्ठलकवी साष्टांग वंदीतसे ॥’

“मेघश्याम अनंगधान चपला सीता भजावी बुधीं ।
चौं हातीं वरदाभयें प्रतिधनुर्बाणीं क्रमें आयुधीं ॥
आत्माराम समस्त काम पुरवी वाचे सदां गाइजे ।
सालंकार उदार हास्य हृदयीं सद्विठ्ठलें ध्याइजे ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP