मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
क्षणभरि गारे कोणी क्षण...

रामजोशी - क्षणभरि गारे कोणी क्षण...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


क्षणभरि गारे कोणी क्षणभरि हरिच्या नामा ॥ध्रु०॥

निशिदिनिं धुंडिता परि सुख नाहीं ।

उगिच तनु दंडिता त्यांत न कांहीं ।

भगवें गुंडाळिता खवळती सहाही ।

यामुळें सांगतो सोडा मोडा कामा ।

क्षणभरि गारे कोणी क्षणभरि हरिच्या नामा ॥१॥

कां मनि वाहतां ही भवचिंता ।

दिननिशीं पाहतां अभिनव संता ।

सुखमय राहतां जरि अनहंता ।

मोहुनी गुंतला खोट्या मोठ्या रामा ।

क्षणभरि गारे कोणी क्षणभरि हरिच्या नामा ॥२॥

धनसुत बायका ठका या खळसंगा ।

निवटुन आयका या कीर्तनरंगा ।

मन्मथसायकाचा हा दंगा ।

जा किरे कविरायाच्या साच्या धामा ।

क्षणभरि गारे कोणी क्षणभरि हरिच्या नामा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP