मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
आतां काय आम्ही हरिवांच...

रामजोशी - आतां काय आम्ही हरिवांच...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


आतां काय आम्ही हरिवांचून राहूं । प्राणसख्याला कधी पाहु ॥ध्रु०॥

आतां काय मुरलिचा ध्वनि साहूं । कुंजवनींची गेली हाहु ॥१॥

आतां काय यमुनेमध्यें नाहूं । कृष्णपदीचें सुख लाहूं ॥२॥

प्राण चालला गे साजणी । आतां मेलो सोसेना जाचणी ॥३॥

झाली बहुत जिवाला जाचणी । कविराया भेटीची मागणी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 16, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP