मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
कल्यान हें तीन अक्षरें कल...

श्री कल्याण स्तवन - कल्यान हें तीन अक्षरें कल...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

कल्यान हें तीन अक्षरें कल्याणकारी ।
नाम गातां ध्यान ध्यातां सर्व जना तारी ॥ध्रु०॥

करी पावन जो दासजनातें तो पुण्यश्लोक ।
कर्ता कारि कारण सद्‍गुरुराज तो येक ।
कपट वेशधारि नव्हे चि सुखसाम्यक ।
करुणासागर कृपाकटाक्ष दासतारक ॥१॥


ल्याला आंगीं अनुभवलेणीं प्रभा प्रकाशल्या ।
ल्याहावया बहुत कुशळ ग्रंथ सटीका लिहिल्या ।
ल्याहाक जाणोनी रामदासवृत्ती तोषविल्या ।
ल्यावादेवी न करि विषयीं वृत्ति त्या विरल्या ॥२॥


नरोप नाम देह गेहें सर्व नीरंजन ।
नन्दन नंदन सर्व घटी भावी सज्जन ।
नम्र मानस ज्यां सम साधू दुर्जन ।
नमीं पदें ज्याचीं शिव सु व्हावया पातकभंजन ॥३॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP