मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
प्रचितीविना करिती तनाना ।...

श्री कल्याणचे पद - प्रचितीविना करिती तनाना ।...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


प्रचितीविना करिती तनाना । बोलती नाना अपार वचना२ ॥१॥
सज्जनवृंद मिळे । तरी मग ब्रह्मस्थिती निवळे ॥धृ०॥
वणवण वणवण तीर्थे फिरती । भग्र देउळें भणभण करिती ॥२॥
लौकिक सकळिक माईक भ्रांती । देव परात्पर न कळोनि शिणती ॥३॥
नाना शास्त्रें पठण लौकिकीं । नाना दैवत पूजन अनेकीं ॥४॥
मी कोण कोठिल न कळे जयासी । गर्भगीता वर वचन तयासी ॥५॥
रामउपासक कल्याणदायक । दीनोद्धारक षड्‍रिपुहारक ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP