मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
विवाहाविषयी मासादिकांचा निर्णय

धर्मसिंधु - विवाहाविषयी मासादिकांचा निर्णय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


माघ, फाल्गुन, वैशाख व ज्येष्ठ हे महिने शुभ होत. मार्गशीर्श मध्यम होय. क्वचित आषाढ व कार्तिक हेही सांगितले आहेत. याविषयी मिथुन राशीचा सूर्य असता आषाढ मास आणि वृश्चिक राशीचा सूर्य असता कार्तिक मास हे देशाचार असेल त्या अनुरोधाने घ्यावे. सर्वत्र घेऊ नयेत. याप्रमाणेच मकर राशीचा सूर्य असता पौष मास आणि मेष राशीचा सूर्य असता चैत्र मास याविषयीही जाणावे. ज्येष्ठ वधू व ज्येष्ठ वर यांचा विवाह ज्येष्ठ मासात करणे शुभ नाही. इतर मासात करणे मध्यम आहे. कारण "वर व वधू दोघेही ज्येष्ठ असता त्यांचा विवाह विशेषतः ज्येष्ठ महिन्यात करू नये. दोन ज्येष्ठ असतील तर तो विवाह मध्यम व एक ज्येष्ठ असेल तर तो विवाह सुखावह होय. तीन ज्येष्ठ असतील तर विवाह करू नये (म्हणजे ज्येष्ठ वर ज्येष्ठ वधू आणि ज्येष्ठ मास) असे सर्व संमत आहे" असे वचन आहे. ज्येष्ठ अपत्याचे मंगल कार्याविषयी ज्येष्ठ मास मध्यम आहे. जन्म मास, जन्म नक्षत्र इत्यादि ज्येष्ठ अपत्याला निषिद्ध आहेत. "विवाह सर्वकाल करावा" असे कोणी ग्रंथकार म्हणतात ते आसुर इत्यादि अधर्म्य विवाहासंबंधाने आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP