मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|प्रथम परिच्छेद|
मलमासविचार

धर्मसिंधु - मलमासविचार

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


या मलमासाचे अधिक महिना आणि क्षय महिना असे दोन प्रकार आहेत. ज्या महिन्यात सूर्यसंक्रांति नसते तो अधिक महिना आणि ज्यात दोन संक्रांति असतात तो क्षयमास होय. एक अधिक महिना झाल्यानंतर दुसरा अधिक महिना तीन महिने होऊन गेल्यावर, आठ किंवा नऊ महिने होण्याच्या आत केव्हा तरी होति. एक क्षयमास झाल्यानंतर दुसरा क्षयमास १४१ वर्षांनी अथवा १९ वर्षांनी येतो. हा अधिक महिन्याप्रमाणे तोड्या अवकाशाने येत नाही. कार्तिक, मार्गशीर्ष अथवा पौष यापैकीच कोणता तरी एक क्षयमास होतो. या (तीन महिन्यावाचून) दुसरा कोणचाही महिना क्षयमास होत नाही. ज्या वर्षी क्षयमास होतो, त्या वर्षी त्या क्षयमासाच्या आधी एक आणि मागून एक असे दोन अधिक महिने येतात.

N/A

References : N/A
Last Updated : April 21, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP