मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ६९

क्रीडा खंड - अध्याय ६९

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

तेव्हां विनायकानें, अपुल्या बाणीं मधेंच तोडियले ।

कृत्या विनायकावरि, येते पाहून केश तोडियले ॥१॥

सिद्धींनीं धरिली ती, सुटली कृत्या त्वरीत हातींची ।

सिद्धी कोपे तेव्हां, धांवत गेली मुरावरी साची ॥२॥

अपुल्या सूता समरीं, जय होईना म्हणून योजूनी ।

असुरें मायें करुनी, अदिती निर्मी रणांत आणूनी ॥३॥

अदिती विटंबिती ते, राक्षस सारे रणांत प्रभु दृष्टीं ।

तेव्हां विनायकासी, त्वदीय माता असून मी कष्टी ॥४॥

करितां तुजला साहे, पाहसि सूता कसातरी दृष्टी ।

कोठें विक्रम गेला, षंढासम पाहसी कसा दृष्टी ॥५॥

ऐकुन विनायकाला, भाषण वाटे खरें करी शोक ।

झाली निराळ वाणी, दुःखी होऊं नको सख्या ऐक ॥६॥

मायावी माता ही, राक्षस निर्मी असे बरें सखया ।

माता पिताहि धामीं, क्षेम असूनी फसूं नको वायां ॥७॥

सावध युद्ध करुनी, वधणें दैत्यास या रणामाजी ।

शंकर वर दैत्याचा, स्मरुनी करणें वदे करी आजी ॥८॥

दैत्याचा वर ध्यानीं, आला तत्काळ तो उषाकाल ।

दुसरे दिवशीं गणपति, युद्धा गेला धरुन तो काल ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP