मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
न झाली भावगीताची अजुनी पू...

गज्जलाञ्जलि - न झाली भावगीताची अजुनी पू...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


न झाली भावगीताची अजुनी पूर्ण अस्ताऊ,
मधे तों सूर का थाम्बे ? कुठे ती गायिका जाऊ ?
तकाके पाचुची झाडी, दिसे ही तृप्त आषाढीं;
कशाला गा विसंवादी ? तिला ही भीति का खाऊ ?

मिळेना साथही साधी, न रङगे राग आल्हादीं,
कलेची सेविका नादी त्यजूनी जाय ही राऊ.
जिवींची साद घालावी. कुणीही साथ ना द्यावी.
न लाभे शान्ति योगाची, रसज्ञांची न टन्चाऊ !

मरे तों प्रीतिची सेवा करावी आणखी - देवा !
निराशा मात्र लाधे वा ! जगाचा कायदा न्यायी !
जगाच्या विस्तृतारामीं विराजे चारुता नामी,
परी दग्धाश जीवाला गमे ही पेटली खाऊ.

मिळेना नीच या ठायां जुळ्या जीवांस भेटाया,
म्हणुनी स्वर्ग धुण्डाया ऊडी का मारिली ताऊ ?
बरें, गा नन्दनोद्यानीं तुझ्या घ्येयासवें गाणीं,
भवींची तेथ गार्‍हाणीं कशाला ?  स्तब्ध मी भाऊ !

जरी मी या वनीं लक्षीं न थोडे बोलके पक्षी,
तुझा तो सूर संरक्षीं मनीं मी - तोच तो गाऊं ?

१९ जून १९१९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP