मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ४|
पंचमहायज्ञ

धर्मसिंधु - पंचमहायज्ञ

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


चरुपात्र प्रक्षालन करुन सव्यानें ब्रह्मादि आहुतीच्या वायव्येस "यक्ष्मै तत्ते निर्णेजनं" या मंत्रानें तें उदक द्यावें. पूर्वीप्रमाणें मनुष्ययज्ञ करावा. निरग्निक असेल त्यानें लौकिकाग्नि घेऊन "पृष्ठो दिवि०" या मंत्रानें त्याची प्रतिष्ठापना करुन "तत्सवितु ता ँसवितु० विश्वानिदेव०" या तीन सवितृमंत्रांनीं तो प्रज्वलित करावा व त्यावर औपासनहोम करुन पाक करावा आणि वैश्वदेव करावा असें गदाधर सांगतो. याविषयीं देखील अशक्त असेल त्यानें ऋग्वेदी इत्यादिकांना सांगितलेल्या रीतीनें पचनाग्नीची प्रतिष्ठापना करुन ध्यान करुन पूजा केल्यावर त्यावर पूर्वोक्त रीतीनें वैश्वदेव करावा. त्यामध्यें पहिल्या पांच आहुति दिल्यानंतर "अग्नये स्विष्टकृते स्वाहा" या मंत्रानें आहुति द्यावी. याप्रमाणें निरग्निकांचा सर्वत्र विशेष जाणावा. शेषकर्म पूर्वींप्रमाणें करावें. कात्यायनांनीं दिवसासच एक वैश्वदेव करावा; रात्रीं दुसरा करुं नये. सामवेदी व अथर्वणवेदी यांनीं देखिल आपाल्या गृह्यसूत्रांत सांगितलेल्या रीतीनें पंचमहायज्ञ करावे. आपापलें गृह्यसूत्र न मिळेल तर ऋग्वेदीयांच्या रीतीनें उपनयन वगैरे संस्कार व पंचमहायज्ञ करावे.

N/A

References : N/A
Last Updated : June 25, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP