मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌मआरिज

सूरह - अल्‌मआरिज

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ४४)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

मागणार्‍याने प्रकोप मागितला आहे, (तो प्रकोप) जो निश्चितपणे उद्धवणार आहे. अश्रद्धावंतांसाठी आहे, तो टाळणारा कुणीही नाही. त्या अल्लाहकडून आहे जो उंच स्थानाचा मालक आहे. दूत आणि आत्मा चढून त्याच्या पुढे जातात. एका अशा दिवशी ज्याचे प्रमाण पन्नास हजार वर्षे आहे. म्हणून हे पैगंबर (स.), धैर्य राखा, शांततापूर्ण धैर्य हे लोक त्याला दूर समजतात आणि आम्ही त्याला जवळ पाहत आहोत, (तो प्रकोप त्या दिवशी कोसळेल) ज्या दिवशी आकाश वितळलेल्या चांदीसमान होईल आणि पर्वत रंगीबेरंगी पिंजलेल्या लोकरीसमान होतील. आणि कोणी जिवलग दोस्त आपल्या जिवलग दोस्ताला विचारणार नाही, वस्तुत: तीकमेकाला दाखविले जातील. अपराधी इच्छिल की त्या दिवसाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी आपल्या संततीला, आपल्या पत्नीला, आपल्या भावाला आणि आपल्या निकटतम कुटुंबाला जे त्याला आश्रय देणारे होते. आणि पृथ्वीतलावरील सर्व लोकांना. मोबदला म्हणून तो देईल आणि या युक्तीमुळे त्याला मुक्ती मिळेल. कदापि नाही, ती तर भडकत्या अग्नीची ज्वाला असेल जी मांस व कातडीला चाटून टाकील. हांका मारूनमारून आपल्याकडे बोलाविल त्या प्रत्येक माणसाला जो सत्यापासून विमुख झाला आणि ज्याने पाठ फिरविली, आणि संपत्ती संचित केली आणि जपूनजपून ठेवली. (१-१८)

मनुष्य चंचल ह्रदयी निर्माण केला गेला आहे, जेव्हा त्याच्यावर संकट येते तेव्हा तो घाबरून जातो आणि जेव्हा त्याला सुस्थिती लाभते तेव्हा कंजुषपणा करू लागतो. परंतु ते लोक (या दोघांपासून अलिप्त आहेत) जे नमाज अदा करणारे आहेत, जे आपल्या नमाजात नेहमी नियमितपणा ठेवतात, ज्यांच्या मालमत्तेत याचक व वंचित असलेल्यांचा एक ठराविक हक्क आहे, जे मोबदल्याच्या दिवसाला सत्याधिष्ठित मानतात, जे आपल्या पालनकर्त्याच्या प्रकोपाचे भय बाळगतात कारण त्यांच्या पालनकर्त्याचा प्रकोप अशी गोष्ट नाही ज्यापासून एखाद्याने निर्भय रहावे, जे आपल्या गुप्तांगाचे रक्षण करतात, आपल्या पत्नी आणि आपल्या मालकीच्या स्रियांना वगळून की ज्यांच्यापासून सुरक्षित न ठेवण्यावर त्यांची कोणतीही निर्भर्त्सना नाही. तथापि जे याखेरीज अन्य काही इच्छितील तेच मर्यादेचे उल्लंघन करणारे होत. जे आपल्या अमानतीचे रक्षण आणि आपल्या वचनांचा आदर करतात, जे आपल्या साक्षीत सचोटीवर दृढ राहतात, आणि जे आपल्या नमाजचे रक्षण करतात, हे लोक प्रतिष्ठापूर्वक स्वर्गाच्या उद्यानात राहतील. (१९-३५)

म्हणून हे पैगंबर (स.), काय कारण आहे की हे इन्कार करणारे उजव्या व डाव्या बाजूने तुमच्याकडे झुंडी, झुंडीने धावत येत आहेत? काय यांच्यापैकी प्रत्येकजण ही लालसा बाळगतो की तो ऐश्वर्यसंपन्न स्वर्गात दाखल केला जाईल? कदापि नाही, आम्ही ज्या वस्तूपासून यांना निर्माण केले आहे त्याला हे स्वत: जाणतात. तर नव्हे, मी शपथ घेतो पूर्वेच्या व पश्चिमेंच्या स्वाचीची, आम्ही याला समर्थ आहोत की यांच्या जागी यांच्यापेक्षा उत्तम लोक आणू आणि कोणीही आमच्यावर मात करणारा नाही. म्हणून यांना आपल्या वाह्यात गोष्टी आणि आपल्या खेळांत मग्न राहू द्या, येथपावेतो की हे आपल्या त्या दिवसाला पोहोचतील ज्याचे याना वचन दिले जात आहे. जेव्हा हे आपल्या थडग्यातून निघून अशाप्रकारे पळत सुटले असतील जणू आपल्या मूर्तींच्या स्थानाकडे पळत असावेत, यांच्या नजरा झुकलेल्या असतील, फटफजिती यांच्यावर पसरली असेल, तो दिवस आहे ज्याचे यांना वचन दिले जात आहे. (३६-४४)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP