मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ४२

उपासना खंड - अध्याय ४२

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(शार्दूलविक्रीडित)

मंदारीं शिव त्याकडे त्रिपुर हा दूतास प्रेशी त्वरें।

मागें दुत शिवास दे झडकरी चिंतामणी सत्वरें ।

जिंकूनी जगतास आज धनि मी आहें शिवा यास्तव ।

सामानें प्रतिमा निरोप कळतां देणें असें वास्तव ॥१॥

दूताच्या मुखिंचा निरोप कळतां बोले सदाशीव हें ।

तूं आहेस गडी म्हणोन मदना केलें असे भस्म हें ।

तैसें मी तुजसी करीत नच तें जाणें मनीं पूर्ण हें ।

ऐसें उद्धट भाषणास करि त्या त्यातें वधी तूर्ण हें ॥२॥

मूर्ती ही अधमास खास न मिळे जन्मांतरीं पाइका ।

ऐसें भाषण ऐकुनी परत तो गेला गडी कीं मुका ।

सांगे दूत निरोप जो घडतसे वृत्तान्त झाला असे ।

रागानें मग तो त्रिपूर अवघ्या सेनेनिशीं येतसे ॥३॥

(गीति)

तिकडुन त्रिपूर येई, युद्धासाठीं त्वरीत मंदारीं ।

इकडुन शिवही गेले, उभयांचें सैन्य पातलें समरीं ॥४॥

तुंबळ युद्ध सुरु तें झालें मग तो रुधीर कर्दम कीं ।

झाला रणांगणीं बहु, युद्धासी रंग येत निस्तुल कीं ॥५॥

झालें युद्ध बहू दिन नंतर ते मल्लयुद्ध करितात ।

विधि व्यासाला कथिती, वृत्त अतां हें पुढें प्रसंगांत ॥६॥

भृगु आश्रमांत अपुल्या, पावन तैशा रुचीरशा गोष्टी ।

तनु शुद्धिस्तव कथिती, नृपती तो सोमकांत जो कुष्ठी ॥७॥

व्हावें सुखी म्हणूनी,ऐके गोष्टी अहर्निशीं भूप ।

सतिसह मंत्री दोनी, सेविति आणी श्रवीत ज्या भूप ॥८॥

एणेंपरि कवनें हीं, मांदाराची सुपुष्प माला ती ।

मोरेश्वरसुत अर्पी चिंतामणिकंठ भूषणासम तीं ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP