मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग १|
गौरी , सावित्री, लक्ष्मी ...

भजन - गौरी , सावित्री, लक्ष्मी ...

भजन - A bhajan or kirtan is a Hindu devotional song, often of ancient origin. Great importance is attributed to the singing of bhajans with Bhakti, i.e. loving devotion. "Rasanam Lakshanam Bhajanam" means the act by which we feel more closer to our inner self or God, is a bhajan. Acts which are done for the God is called bhajan.

गौरी , सावित्री, लक्ष्मी तिघी जणी दाटल्या गर्व अभिमानी । तेव्हा त्वरितची आले ते नारदमुनी । पुसती तया लागूनी । महा पतिव्रता ऎकुनी तिची कीर्ति अंतरी वाटते खंती । तिशी छळवुनी याल तरी तुमची प्रीति । नाही तर प्राण का उरती असे म्हणुनिया वेगं वेगं चालले देव तिघे । अतिथांचे घेऊनी योगे । त्यां अत्रीचा पर्वत जवळी आला दाखवी एकमेकाला । बहु आनंदे गेले त्या पर्वता । गुफेत मुनीची कांता । या भिक्षेना शब्द कानी ऎकतां । गर्जना झाली बहुदां । काही फळे मुळें घेऊनी आपुल्या हाती । बाहेर आली त्वरीत । ते म्हणति नग्न व्हावे । भोजन आम्हां हरावे । आपुले ब्रिद्र राखावे । मग पतिस्मरणीं शीर ठेविले हात । बालके झाली त्वरीत । हे बाळ तिने घेऊनी आपले करी । पाळण्यातं घाली नारी । ह्या पाळण्याची प्रेमा लावूनी दोरी । गीत गाती नानापरी । सांडूनी सर्व वैभवा । ग्रह आला आमच्या देवा । सुखी निद्रा करी केशवा । ह्या कांतेचा संशय दूर कराया । नीज नीज बाळा दत्तात्रया ॥ बाळा जो जो रे जोजो दत्तात्रया । निजविती माता अनुसया ॥धृ॥

तू शीव मूर्ति ऎकुनी तुझी कीर्ति । स्मरताची पापे हरती । हे विभूतिचे उधळण अंगावरती । त्रिशूळ , डमरू हाती । ह्या रुद्रांक्षा माळा गळा लोंबती । भूषणी नाग डोलती । विजयाची हळहळ अंगा । मस्तकी धरली गंगा । लागला स्त्रीच्या संगा । ही व्यर्थची रे जर्जर करिती जाया । नीजं नीज ॥२॥

बहु तप करिता झाली तुमची माता । संसार हरिली चिंता । पाळण्य़ात निजविता । परोपरी ओव्या गाता । लोटले दिवस बहुता । जेव्हा गृहाकडे चिंता करी कांता । म्हणे काय करावे आता । तो मुनी मागे नारद आला होता । कुणीकडे असेल तो आता । आता का रडता आपटुनी आपला माथा । हा बोल कुणा लाविता । गडबडा लोळे धारणीशी । आमच्या पतिच्या बहुनी । पति पाहु आमुच्या नयनी । उपकार होतील आमुच्या शिरी । घेऊनी निघाला नारी । गिरी पर्वत चढता संकट मोठे । चरणाशी रुतती काटे । वृंदका जाळ्या पाहुनी मनी भय वाटे । चीर चोळी गुंतुनी काटे । अरण्य घोर अचाट । ठायी ठायी वृक्ष घनदाट स्त्री उष्ण बहू नाही सुखाचा वारा । अभिमान फिरकी गरगरा । बहू संकटी पावल्या अनुसायाच्या द्वारी । नारद गुप्त झाले झडकरी । नाही आधार रडती दीर्घस्वरी । अनुसया आली बाहेरी । अनुसया म्हणे धन्य माय ईश्‍वरी । करी कृपा आम्हावरी । हे बाळ तिने आणूनी ठेविले पुढे । घ्या आपुले अक्षय चूडे । हे बाळ तिन्ही ऎसे लहान । रहाती अंधार जगी मग किती । तू शिव विष्णु ब्रह्मादेव त्रैमुर्ति । बाळ लघुचे थोर होती । बाळ लघुचे थोर झाले । अनुसया गहीवर बोले । अभिमान सर्व गळाले । बहू भीतिने कुणापाशी गीत गाऊ । बाळ तुझे होऊनी राहू । हे बाळ तिन्ही सवेच दत्त झाले । दुसरे देह निर्मिले । ह्या त्रैलोकी नवल मोठे झाले । नाव दत्तात्रय ठेवले । मातेच्या चरणी लागले । येतो माते स्मरशील निज अंतरी । दत्ताची तेथे फेरी । बाळा जो जो रे ॥३॥

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP