मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा १ ते ५०|
शेतकरी आणि बकरे

शेतकरी आणि बकरे

इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.


एकदा देशात खूप मोठा दुष्काळ पडला. तेव्हा एका शेतकर्‍याने आपल्याजवळच्या कोंबड्या मारून खाल्ल्या. कोंबड्या संपल्यावर त्याने कोकरांना मारून खाण्यास सुरुवात केली. ते पाहताच सगळे बकरे एकत्र जमले आणि त्यांनी विचार केला की, कोकरे संपल्यावर शेतकरी आपल्यालाच मारून खाणार. त्याऐवजी आपण आधीच येथून पळून गेलेले बरे. असा विचार करून ते तेथून पळून गेले.

तात्पर्य - पुढच्या संकटाची जाणीव होताच, ते टाळण्याची सावधगिरी राखणे योग्य होय.

N/A

References : N/A
Last Updated : January 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP