मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ५५ वा

पांडवप्रताप - अध्याय ५५ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः वैशंपायन म्हणे राया ऐक ॥ मागें पर्व संपलें विशोक ॥ पुढें स्त्रीपर्व सूरेख ॥ आतां परिसा यावरी ॥१॥
संजय म्हणे कुरु वर्या ॥ करीं सर्वांची उत्तरक्रिया ॥ अंधासी मूर्च्छा येऊ नियां ॥ उर्वीवरी पडिला हो ॥२॥
मग बोले विदुर सुमती ॥ ऊठ सर्वांची हेचि गती ॥ व्यर्थ कां करिसी आतां खंती ॥ पडली भ्रांति तुजलागीं ॥३॥
सायंकाळीं पक्षी देख ॥ एका वृक्षीं बैसले अनेक ॥ सवेंचि उगवतां अर्क ॥ गेले सर्व उडोनियां ॥४॥
तरी त्या पक्ष्यांलागीं देख ॥ कां वृक्षानेंचि करावा शोक ॥ तूं ह्रदयीं धरू नियां विवेक ॥ नाठवीं पुत्र वेदना ॥५॥
गंगेंत वाहात आलीं नेटें ॥ संगमीं मिळालीं दोन्ही काष्ठें ॥ बहुत दिवस होतीं एकवटें ॥ ऋणानुबधें करू नियां ॥६॥
त्यांत एक नेलें धरून धारेंत गेलें वाहून ॥ तैसे दारा बंधु आप्त स्वजन ॥ ऋणानुबंधें घडामोड ॥७॥
कुलालें पात्रें केलीं एकसरीं ॥ तीं लोकीं नेलीं घरोघरीं ॥ तीं वर्तती कोणे व्या पारीं ॥ कासया कुलालें विचारावें ॥८॥
छायेसी बैसले बहुत नर ॥ सवेंचि उठूनि गेले सत्वर ॥ तरी शोक करा वया तरुवर ॥ सिद्ध कदा नव्हेचि ॥९॥
मातेनें तान्ह्या दिधलें विष ॥ पित्यानें विकिलें पुत्रास ॥ रायानें नगर केलें ओस ॥ तरी कोणास सांगावें ॥१०॥
तैसें ईश्वरा धीन सर्व सूत्र ॥ नाचवी पुत्रळे चित्र विचित्र ॥ पहा अभिमन्यू सारिखा वीर ॥ रणांगणीं पडियेला ॥११॥
ज्याचा मातुल श्रीधर ॥ क्षणें सृष्टि क्षणें संहार ॥ जीवें मारूनि वांच विणार ॥ तोही जवळी होता कीं ॥१२॥
अर्जुना सारिखा पिता असोन ॥ जेणें समरीं जिंकिला पाकशासन ॥ परी उठवा वया अभिमन्य ॥ न जाहली शक्ति कोणासी ॥१३॥
ऐसें विदुरें बोधून ॥ सकल सामुग्री सिद्ध करून ॥ शत कौरव कामिनी शोकीं निमग्न ॥ शिबिकरूढ चालिल्या ॥१४॥
गांधारी कुंती आदिकरूनी ॥ दुर्यो धनाची पट्टराणी ॥ निघाल्या वहनीं पुढें दंडपाणी ॥ सहस्त्रावधि धांवती ॥१५॥
संजय ध्रुतराष्ट्र विदुर ॥ रथीं बैसोनि जाती सत्वर ॥ कर्णस्त्रिया सुकुमार ॥ लावण्यहरिणी निघाल्या ॥१६॥
द्रोणस्त्री कृपी पाहीं ॥ तेही गेली लवलाहीं ॥ एकचि हांक गाजली ते समयीं ॥ अंत नाहीं महा शब्दा ॥१७॥
एकवस्त्रा अनाथा ॥ भूषणें तोडिती जातां जातां ॥ पिता पुत्र बंधु सुता ॥ नाम घेऊनि आरडती ॥१८॥
लज्जा सोडूनि सकळ ॥ धरणी वरी फोडिती कपाळ ॥ केश तोडूनि विकळ ॥ एक पडती भूमीवरी ॥१९॥
हस्तिना पुर भणभणित ॥ मंदिरें भरलीं ओस दिसत ॥ पौरलोक त्यांस मवेत ॥ रणांगणीं पातले ॥२०॥
कृत वर्मा शारद्वत ॥ तेही पातले शोक करीत ॥ स्त्रियांचें दुःख पाहोनि समस्त ॥ म्हणती येथूनि जातां बरें ॥२१॥
कृत वर्मा गेला स्वराष्ट्र ॥ कृपाचार्य जात गज पुरा ॥ द्रौणी गेला वनांतरा ॥ कृष्ण शापेंकरो नियां ॥२२॥
तों बंधूंसह युधिष्ठिर ॥ युयुत्सु सात्यकी यादवेंद्र ॥ द्रौपदी स्त्रियां सह समग्र ॥ येतीं जाहलीं भेटा वया ॥२३॥
गंगा तीरीं कौरव युवती ॥ भ्रतार दुःखें प्रलय करिती ॥ तें दुःख कवीनें ग्रंथीं ॥ काय म्हणोनि लिहावें ॥२४॥
स्त्रिया म्हणती धर्माचें मन ॥ नवनीताहूनि मृदु पूर्ण ॥ ये वेळीं वज्राहून ॥ केलें कठिन ह्रदय कैसें ॥२५॥
तुझें अजात शत्रु नाम जाण ॥ कां दया दिधली दवडून ॥ सर्व गोत्रज मारून ॥ राज्य न करीं धर्म राया ॥२६॥
धर्म अंधासी करी नमस्कार ॥ प्रीतीं ह्र्दयीं धरी धृत राष्ट्र ॥ म्हणे धर्मा तुझें ह्रदय पवित्र ॥ सकलां माजी मी जाणें ॥२७॥
मज कारणें धर्मा निश्चितीं ॥ त्वां शोक सागरीं केली वस्ती ॥ बा रे तूं सहसा न करीं खंती ॥ मम प्रीति तुजवरी आहे ॥२८॥
मग धृत राष्ट्र म्हणे तेव्हां ॥ मजला वृकोदर भेटवावा ॥ क्षेम द्यावयासी भीम बरवा ॥ सरसावला पुढेंचि ॥२९॥
तंव तो भक्त पालक भगवंत ॥ भीमासी दावी भ्रूसंकेत ॥ म्हणे होईल आतां अनर्थ ॥ त्यासी सर्वथा भेटूं नको ॥३०॥
जो भक्त कम कल्प द्रुम ॥ जाणोनि भविष्य तो आत्मा राम ॥ केला होता लोहाचा सबळ भीम ॥ वस्त्रा भरतीं संयुक्त ॥३१॥
तो भीम पुढें उभा केला ॥ त्यासी धृत राष्ट्रें द्दढ धरिला ॥ रगडितांचि चूर्ण जाहला ॥ यवपिष्टवत ते समयीं ॥३२॥
नव सहस्त्र नागांचें बळ ॥ तो भीमाहूनि असे सबळ ॥ एक नेत्रां विण विकळ ॥ नाहीं तरी काळ प्रत्यक्ष ॥३३॥
भीमें मारिले सकल सुत ॥ तो डाव राखी मनांत ॥ असो लोह भीम तेथ ॥ चूर्ण करोनि टाकिला ॥३४॥
अंधाचें भावीत मन ॥ कीं मीं मारिला भीम सेन ॥ बळें रगडिला तेणें करून ॥ वाहे अशुद्ध मुखा वाटे ॥३५॥
भूमी वरी पडे मूर्च्छा येऊन ॥ आश्चर्य करिती पंडुनंदन ॥ म्हणती लीलाविग्रही श्रीकृष्ण ॥ भक्त जन पालक जो ॥३६॥
मग म्हणे युधिष्टिर ॥ पूर्ण ब्रह्मानंद याद वेंद्र ॥ आजि नवा जन्मला वृकोदर ॥ मोठें चरित्र दाख विलें ॥३७॥
असो यावरी अंबिका सुत ॥ अट्टहासें तेव्हां रडत ॥ म्हणे जळो हा क्रोधें केला घात ॥ भीम सेन मारिला ॥३८॥
हाहाकार करी वृद्ध ॥ मग बोलिला सच्चिदानंद ॥ म्हणे ह्रदयीं न धरावा खेद ॥ केला वध लोह भीमाचा ॥३९॥
तुझा क्रोध जाणोन ॥ म्यां लोहाचा केला भीम सेन ॥ तो तूं रगडूनि केला चूर्ण ॥ ऐकोन अंध संतोषला ॥४०॥
श्रीरंगाकडे पहोन ॥ गदगदां हांसती पंडुनंदन ॥ भ्रूसंकेत केवळ दाखवून ॥ एकमे कांसी खुणा विती ॥४१॥
रक्तें भरलें अंधाचें वदन ॥ धर्में धुतलें उदक आणून ॥ अंध म्हणे भीम सेन ॥ आतां मज भेटवा ॥४२॥
म्हणे विश्वव्यापका चक्रपाणी ॥ माझा क्रोध केवळ प्रलयाग्नी ॥ त्यासी तुंवा लोहभीम आणोनी ॥ आहुती दिधली उत्तम हे ॥४३॥
श्रीकृष्ण म्हणे अंधा प्रती ॥ पूर्वीं म्यां सांगितली नीती ॥ ते तुवां धरिली नाहीं चित्तीं ॥ अहंमतें भुलो नियां ॥४४॥
स्वदोष जाहले संपूर्ण ॥ राया पाहें विचारून ॥ कोणते अन्याय तुम्हां पासोन ॥ घडले नाहींत सांग पां ॥४५॥
आपुले गुण दोष लपवी सदा ॥ करी दुसर्‍याची दीर्घ निंदा ॥ अहा रे धृत राष्ट्रा वृद्धा ॥ किती क्रोधा वश्य होसी ॥४६॥
तुमचे अन्याय अद्भुत ॥ बहुत मीं घातले पोटांत ॥ द्रौपदी आणिली ओढीत ॥ तेव्हां संतोष वाटला तूतें ॥४७॥
पारधी वृधा आड स्वस्थ ॥ करा वया बैसला मृग घात ॥ तों सर्पें येऊनि अकस्मात ॥ पाय फोडिला कडकडोनी ॥४८॥
लहरी आस मास येती ॥ म्हणे कोणी वांचवा मज प्रती ॥ परी फांसे जवळी असती ॥ पापमति जाण वीतसे ॥४९॥
हिंसक गाई वधीत ॥ तों त्याचीच अंगुली तुटली अकस्मात ॥ त्या घायें परम आरं बळत ॥ परी गोघात आठवी ॥५०॥
तस्करीं भरिलें घरीं धन ॥ तेथें दरवडा पडला येऊन ॥ लोक नागविले म्हणून ॥ नाठवी कर्म आपुलें ॥५१॥
तैसें तुझ्या पुत्राचें कर्म दारुण ॥ आठवीना कां तुझें मन ॥ लोहभीम मारिला रगडून ॥ मत्सरें करून तुवां कीं ॥५२॥
वृंदावन जों जों पक्व होत ॥ तों तों कडूपणा चढे बहुत ॥ कोरफड जों जों माजत ॥ दुर्धंधि बहुत उठे तया ॥५३॥
मैंदाचीं पोरें मेलीं समस्त ॥ म्हणूनि चडफडोनि तो रडत ॥ परी आपण हिंसा केली बहुत ॥ तें मनांत आठवीना ॥५४॥
तैसें जळो तुझें वृद्धपण ॥ अजुनि ह्रदयीं नांदे अज्ञान ॥ अंधें ऐकतां ऐसें वचन ॥ उगाचि मग राहिला ॥५५॥
मग म्हणे श्रीहरी ॥ आतां मज चौघांची भेट करीं ॥ मग स्पर्शमान ते अवसरीं ॥ करिता जाहला स्वहस्तें ॥५६॥
चौघांनीं वंदिले चरण ॥ परी न देती आलिंगन ॥ विश्वास गेला उडोन ॥ मग तें बोलणें फोलचि ॥५७॥
असो गांधारीचें समाधान ॥ करिती पांचही पंडुनंदन ॥ पूर्वींच व्यास सदेवें येऊन ॥ बोधिलें होतें तियेतें ॥५८॥
कीं पांडवांवरी याउपरी ॥ क्रोध तूं सहसा न करीं ॥ मग धर्म राजें ते अवसरीं ॥ समाधान केलें तियेचें ॥५९॥
तों भीम बोले गर्जोन ॥ परम शठ दुर्यो धन ॥ त्यासी मी पूर्वींच टाकितों मारून ॥ परी धर्म वचनें उगाचि होतों ॥६०॥
जे वेळीं मांडी उघडून ॥ दाविली द्रौपदी लागून ॥ तेव्हांचि गदाघायें करून ॥ करितों चूर्ण अंक त्याचा ॥६१॥
असो गांधारीचे चरण ॥ धर्म रायें द्दढ धरोन ॥ म्हणे माते मज भस्म करीं शापून ॥ मी अन्यायी सर्वस्वें ॥६२॥
मीं पृथ्वी पाडिली ओस ॥ कुलक्षय केला निःशेष ॥ धर्म बोलतां गांधारीचें मानस ॥ स्नेहभरें उचंबळलें ॥६३॥
वस्त्रपट डोळ्यांवरी ॥ गांधारीच्या असे दिवस रात्रीं ॥ भ्रतार चक्षुहीन अवधारीं ॥ म्हणेनि पट बांधिला ॥६४॥
वस्त्रा आड उभी राहून ॥ सौबली पाहे न्याहालून ॥ तों धर्म राज देखिला दीन ॥ अत्यंत कृश जाहला असे ॥६५॥
मग बोले गांधारी ॥ धर्मा तूं पूत्र माझा निर्धारीं ॥ तूं सर्वथा चिंता न करीं ॥ सुखरूप नांदें सर्वदा ॥६६॥
कुंतीस साष्टांग नमस्कार ॥ करिते जाहले पांचही कुमार ॥ पृथेसी दाटला गहिंवर ॥ गेले ते सर्व आठवूनी ॥६७॥
वनींहूनि आलिया राम लक्ष्मण ॥ कौसल्या देत प्रेमें आलिंगन ॥ तैसी कुंती पांचां लागून ॥ ब्रह्मानंद्रें आलिंगी ॥६८॥
म्हणे बाळ हो वनांतरीं ॥ बहु श्रमलेति आजिवरी ॥ पुत्र म्हणती माते निर्धारीं ॥ तुझे पाय देखिले ॥६९॥
तेणें श्रम गेला समस्त ॥ तुज खेद न व्हावा यथार्था ॥ द्रौपदी गांधारीस वंदीत ॥ मग नमीत कुंतीतें ॥७०॥
पृथ्वी वरी पडली पांचाळी ॥ पुत्र दुःखें आरंबळली ॥ सुभद्रा शोक समुद्रीं बुडाली ॥ आठवूनि अभिमन्या ॥७१॥
मग कुंती समाधान करीत ॥ दोघी स्नुषा ह्र्दयीं धरीत ॥ म्हणे अष्टादशाक्षौहिणी सेना अद्भुत ॥ जाहला निःपात सर्वांचा ॥७२॥
विदुरें जें जें भविष्य केलें ॥ तें तें सर्व डोळां देखिलें ॥ असो कौरव स्त्रिया त्या वेळे ॥ रण भूमीसी धांवल्या ॥७३॥
पुत्र भ्राते आणि पती ॥ त्यांचीं प्रेतें ह्रदयीं धरिती ॥ दीर्घ स्वरें सकल रडती ॥ ऐकतां धरित्री कांपतसे ॥७४॥
दुर्यो धनादि शंभर बंधू जाण ॥ द्रोण कर्णादि वीर संपूर्ण ॥ वस्त्रा भरणें करून ॥ मंडित रणीं पडियेले ॥७५॥
मुकुट कुंडलें आणि शिरें ॥ अपार भूषणें लेवविलीं करें ॥ भूतें भक्षिती सत्वरें ॥ प्रेतमांसें काढू नियां ॥७६॥
मृगमदचंदनें शोभती ॥ ज्यांचीं शरीरें विराजती ॥ एकाचे डोळे पक्षी फोडिती ॥ चरण तोडिती एकाचे ॥७७॥
त्यांत भीष्म द्रोण कर्ण ॥ यांचीं कलेवरें देदीप्य मान ॥ त्यांसी भूतें प्रेतें द्विजगण ॥ स्पर्श करूं न शकती ॥७८॥
असो स्त्रियांचा कल्लोळ ॥ रण भूमीस माजला तुंबळ ॥ एकी ओळखूनि शिरकमळ ॥ धडासी नेऊन मेळविती ॥७९॥
एकांचीं प्रेतें न सांपडती ॥ सैरावैरा रणीं हिंडती ॥ बहुतांचीं शरीरें फुगलीं देखती ॥ ओळखूं न येती कदाही ॥८०॥
दुर्यो धनाचें प्रेत धरून ॥ गांधारी करीतसे रुदन ॥ असो आकांत वर्तला दारुण ॥ तो कवणासी न वर्णवे ॥८१॥
गांधीरी म्हणे दुर्यो धना लागून ॥ युद्धाचे आधीं तूं येऊन ॥ मज करो नियां नमन ॥ निघा लासी ते वेळे ॥८२॥
मी बोलिलें तुज वचन ॥ जेथें तेथें धर्म तेथें जय जाण ॥ अंतीं जाहलें तेंचि प्रमाण ॥ गेले मरोन पुत्र सर्व ॥८३॥
गांधारीच्या बहुत सुना ॥ कित्येक रडती हंसगमना ॥ गजग मना मृग नयना ॥ चंद्रवदना असती पैं ॥८४॥
एक मीनाक्षी मृगशावाक्षी ॥ एक कामाक्षी एक पद्माक्षी ॥ एक हरिमध्या नेत्रकटाक्षीं ॥ वेधूनि पाडिती पतींतें ॥८५॥
आपुल्या पतींचीं प्रेतें धरूनी ॥ शोक करिती नितंबिनी ॥ सुभद्रा उत्तरा शोधूनी ॥ अभिमन्यूसी आलिंगिती ॥८६॥
अभिमन्य़ूचें स्वरूप जाण ॥ प्रत्यक्ष केवळ दुजा श्रीकृष्ण ॥ असो देशो देशींच्या स्त्रिया येऊन ॥ आपुले पती शोधिती ॥८७॥
अभिमन्यूलागीं गांधारी ॥ बहुत शोक करी ते अवसरीं ॥ हे बाळा नरवीरकेसरी ॥ कोमलांगा कमल नेत्रा ॥८८॥
हे महाराज गुरु द्रोण ॥ हे धीर उदार वीर कर्ण ॥ कर्ण स्त्रिया सर्व मिळोन ॥ रणांगणीं आरडती ॥८९॥
हा शकुनि वीर पडिला येथ ॥ हा दूःशीलापति जय द्रथ ॥ बहुतीं रक्षिला परी मृत्य ॥ न सोडीच तयातें ॥९०॥
हा पडिला माद्रीचा बंधु शल्य ॥ हा भग दत्त पडिला विशाळ ॥ हा भीष्म सूर्य केवळ ॥ शरपंजरीं पहुडला ॥९१॥
नारायण हरि गोविंद ॥ ऐशा नामांचे दिव्य प्रबंध ॥ सहस्त्र नामावळी प्रसिद्ध ॥ भीष्मदेव स्मरण करी ॥९२॥
कोणा शींही न बोले वचन ॥ निजरूपी सावधान ॥ सकल स्त्रिया करूनि नमन ॥ प्रदक्षिणा करून जाती ॥९३॥
देहावरी नाहीं भीष्म ॥ स्वरूपीं पावला विश्राम ॥ नारी नर आप्त परम ॥ कोणा सही नेणे तो ॥९४॥
तो पिंडब्रह्मांडा वेगळा ॥ जैसें कमल पत्र नातळे जला ॥ तैसा तो ज्ञानी जाहला ॥ त्याची लीला कोण जाणे ॥९५॥
असो गांधारी म्हणे ते वेळां ॥ श्रीकृष्णा पाहें रे डोळां ॥ स्नुषा तळमळती सकळा ॥ जीवना विण मीनापरी ॥९६॥
सात्यकीनें मारिला ॥ हा भूरिश्रवा येथें पडला ॥ हा सोमदत्त रणीं मृत्यु पावला ॥ बाल्हीक बृद्ध तैसाचि ॥९७॥
छप्पन्न देशींचे नृपती ॥ धांवोनि आल्या त्यांच्या युवती ॥ दीर्घ स्वरें हांका देती ॥ नाहीं मिती शोकातें ॥९८॥
द्रुपद विराट द्रोणें मारिले ॥ ते येथें दोघे पडिले ॥ असो शाण्णव कुळींचे पहुडले ॥ राजे सर्व समरांगणीं ॥९९॥
गांधारी म्हणे कृष्णा श्याम सुंदरा ॥ तूं उपलव्यासी गेलास माघारा ॥ दळा सह माझ्या कुमरां ॥ पाणी तेव्हांचि सोडिलें ॥१००॥
अरे कृष्णा तूं चालक थोर ॥ तुवांचि हा केला संहार ॥ तरी मी गांधारी पतिव्रता साचार ॥ शाप माझा घेईं तूं ॥१०१॥
तुझा कुलकक्षय जाण ॥ शेवटीं होईल संपूर्ण ॥ हरि म्हणे कर्ता कारण ॥ मज विण कोण असे पैं ॥१०२॥
पिंड ब्रह्मांडघडामोडी ॥ एका रक्षीं एका रगडीं ॥ भूभार उतरा वया तांतडी ॥ म्यांचि सर्व मारिले ॥१०३॥
युगानुयुगीं धरोनि अवतार ॥ मीच करितों दुष्ट संहार ॥ पुढेंही सर्व करणार ॥ मीच असें आदि अंतीं ॥१०४॥
यादव संहार शेवटीं ॥ मज करणें आहे उठाउठी ॥ तुवां शाप दिधला हे गोष्टी ॥ मजही अगत्य आहे पैं ॥१०५॥
असो रणरंगीं जे पडले ॥ त्यांचें वैशंपायनें गणित केलें ॥ सासष्ट कोटी वीर पडिले ॥  लहानथोर मिळोनियां ॥१०६॥
मग यथानुक्रमें करून ॥ करिती तेव्हां सर्वांचें दहन ॥ करोनियां धर्मदान ॥ त्रयोदश दिन पर्यंत ॥१०७॥
धूम्र आणि अग्निज्वाळ ॥ येणें ब्रह्मांड भरलें तुंबळ ॥ त्यामाजी जे अनाथ केवळ ॥ ज्यांस दहनासी कोणी नाहीं ॥१०८॥
मग यांच्या राशी करून ॥ लाविला असंभाव्य अग्न ॥ विदुर युयुत्सु जाण ॥ तेंचि कृत्य करिते जाहले ॥१०९॥
सर्वांचें उत्तर क्रिया संपादन ॥ करिते जाहले त्रयो दश दिन ॥ शतही कौरवांचें दहन ॥ यथा न्यायें तैसेंचि ॥११०॥
धर्म म्हणे ते वेळीं ॥ हा कर्ण पडला महाबळी ॥ यासी कोणीं द्यावी तिलां जली ॥ कोणे कुळीं जन्मला ॥१११॥
तों कुंतीनें फोडिली हांक ॥ अट्टहासें करी शोक ॥ म्हणे माझा पुत्र कर्ण वरिष्ठ ॥ सूर्य वीर्यें जन्मला ॥११२॥
तुम्हां पांचांहूनि ज्येष्ठ ॥ जो धीर वीर उदार वरिष्ठ ॥ रणपंडित अति सुभट ॥ सूर्य भक्त निःसीम जो ॥११३॥
त्या चिया औदार्या पुढें ॥ सुरतरु कायसें बापुढें ॥ त्याचें सौंदर्य देखोनि रडे ॥ एकीकडे शफरी ध्वज ॥११४॥
तो जाहला कुमार पणीं ॥ सोडिला मी स्वर्धुनी जीवनीं ॥ अधिरथ ॥ किरातें नेऊनी ॥ राधे जवळी दिधला पैं ॥११५॥
राधा ते अधिरथनितंबिनी ॥ तिनें कर्ण लाविला निजस्तनीं ॥ राधेय कर्णासी जनी ॥ नाम तेंचि प्रकटलें ॥११६॥
मी आणि कृष्णें जाऊन ॥ बहुतांपरी बोधिला कर्ण ॥ परी कौरवांसी भाकवचन ॥ तेणें पूर्वींच दिधलें पैं ॥११७॥
श्रीधर विनवी श्रोत्यां लागून ॥ कर्णाचें हें जन्म कथन ॥ आदिपर्वीं निरू पिलें संपूर्ण ॥ पुनःपुन्हां वर्णूं कासया ॥११८॥
असो कृंती म्हणे ते क्षणीं ॥ अहा कर्णा वीरशिरोमणी ॥ मीं तुज सांडिलें बालपणीं ॥ तरीच रुसोनि गेलासी ॥११९॥
अहा कर्णा परम सुंदरा ॥ अहा कर्णा धीरोदारा ॥ अहा कर्णा परमशूरा ॥ पूर्वीं केला दिग्वि जय ॥१२०॥
जेणें कवचकुंडलें देऊन ॥ तोष विला पाकशा सन ॥ ऐसें कुंती दुःख आठवून ॥ कर्णा कर्णा म्हणोनि बाहे ॥१२१॥
धर्माचे नेत्रीं अवधारा ॥ चालिल्या तेव्हां अश्रुधारा ॥ म्हणे अहा कर्णा महाशूरा ॥ कां रे आम्हांसी टाकिलें ॥१२२॥
कुंतीस म्हणे युधिष्ठिर ॥ कर्ण वडील सहोदर ॥ तुवां हा कैसा विचार ॥ गुप्त करूनि ठेविला ॥१२३॥
मज कळूं न दिलें वर्त मान ॥ मी धरितों कर्णाचे द्दढ चरण ॥ राज्य छत्र देऊन ॥ सेवा करितों अहोरात्र ॥१२४॥
अहा कर्णा राजीव नेत्रा ॥ अहा कर्ना चारु गात्रा ॥ कोमलांगा परम पवित्रा ॥ सहोदरा माझिया ॥१२५॥
अभिमन्यूचे शोकाहून ॥ कर्ण शोकें धर्म क्षीण ॥ भूमीस पडे मूर्च्छा येऊन ॥ कृष्णार्जुन सांवरिती ॥१२६॥
धर्म म्हणे हो कृतीं ॥ परम कपटी स्त्रियांची जाती ॥ कदा अंत कळों न देती ॥ असत्य चित्तीं सदा वसे ॥१२७॥
सकल स्त्रिया ज्या सृष्टीं ॥ धर्म शापी उठाउठी ॥ आजि पासूनि गुह्य गोष्टी ॥ न राहोत पोटीं स्त्रियांच्या ॥१२८॥
असो धर्में ते काळीं ॥ कर्णवीराची क्रिया केली ॥ सर्वांसी समजलें ते वेळीं ॥ कीं पुत्र कुंतीचा ॥१२९॥
एवं सर्वांची उत्तर क्रिया करून ॥ गांधारी अंबिकानंदन ॥ विदुरादि सर्व जन ॥ हस्तिनापुरा प्रति गेले ॥१३०॥
स्वस्थळासी गेले पंडुनंदन ॥ स्त्रीपर्व संपलें येथून ॥ पुढें शांतिपर्व परम गहन ॥ वैशंपायन बोलिला ॥१३१॥
त्यांती सारांश यथार्थ ॥ बोलवीत पुढें पंढरीनाथ ॥ तें श्रवण ॥ करोत पंडित ॥ ब्रह्मानंदें करू नियां ॥१३२॥
श्रीधरवरदा रुक्मिणीपती ॥ तूं पांडुगंग पांडवसारथी ॥ ब्रह्मानंद तूंचि आदिअंतीं ॥ अभंग अक्षय सर्वदा ॥१३३॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ स्त्रीपर्व व्यास भारत ॥ त्यांतीत सारांश यथार्थ ॥ पंचावन्नाव्यांत कथियेला ॥१३४॥
इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे स्त्रीपर्वणि पंचपंचाशत्तमाध्यायः ॥५५॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ श्रीपांडवप्रताप स्त्रीपर्व समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP