मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ४९ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ४९ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ४९ वा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ जो पांडवांचा कैवारी ॥ नंदाचे घरींचा खिल्लारी ॥ पांचाळीचा साह्यकारी ॥ द्वारपाळ बळीचा ॥१॥जो क्षीराब्धीचा जामात ॥ जो होय कमलोद्भवाचा तात ॥ सनका दिक योगी जे समस्त ॥ आराध्यदैवत तयांचें जो ॥२॥जो आनकदुंदुभीचा कुमार ॥ जो त्रिनेत्राचा प्राण मित्र ॥ जो निगमाचें आद्यसूत्र ॥ पाठिराखा शतमखाचा ॥३॥जो पुराण पुरुष प्रर्हादवरद ॥ उद्धवाक्रूर ह्रदया ञमिलिंद ॥ तो अर्जुनरथीं मुकुंद ॥ बैसोनि काय बोल तसे ॥४॥अर्जुना होईं सावधान ॥ तुवां मारिला कर्ण नंदन ॥ त्या दुःखें करून ॥ तप्त जाहला वीर तो ॥५॥तों काळचे मनीं बैसे दचक ॥ ऐसी अर्जुनें फोडिली हांक ॥ तैसीच कर्णें ही देख ॥ गर्जना केली समरांगणीं ॥६॥दोघांचे रथ श्वेत वर्ण ॥ श्वेततु रंग गति समान ॥ दोघांचें सौंदर्य देखोन ॥ मीन केतन तटस्थ ॥७॥समवय समविद्या समठाण ॥ समसमान ओढिती समसंधान ॥ दोघेही पृथेचे नंदन ॥ तेजें दिशा उजळती ॥८॥कर्णाचे ध्वजीं रेखिला कुंजर ॥ पार्थ ध्वजीं वायु कुमर ॥ दोन्ही दळीं वाद्य गजर ॥ तुंबळ जाहला तेधवां ॥९॥सर्व वीरांची आरोळी ॥ दोन्ही दळीं गाजली ॥ शल्य कृष्ण सारथी बळी ॥ दोहीं कडे दोघांचे ॥१०॥एक मेरु एक मंदार ॥ एक भार्गव एक रघुवीर ॥ एक रमावर एक उमावर ॥ तैसे दोघे दिसती पैं ॥११॥एक सागर एक आकाश ॥ एक वासुकी एक शेष ॥ एक धैर्य एक यश ॥ तैसे दोघे दिसती पैं ॥१२॥एक सूर्य एक प्रलयाग्न ॥ एक वसिष्ठ एक गाधिनंदन ॥ तैसे कर्ण आणि अर्जुन ॥ समरांगणीं शोभले ॥१३॥एक स्मार्त एक वैष्णव ॥ एक सद्भाव एक गौरव ॥ विजय श्री वरा वया अभिनव ॥ रण नोवरे केवळ ते ॥१४॥दोन्ही दळें चिंतेनें व्याकुळ ॥ कोणासी विजय श्री घालील माळ ॥ सर्व देशींचे भूपाळ ॥ पक्षीं बोलती आपुला लिया ॥१५॥ कोणी वर्णिती वीर कर्ण ॥ कोणी म्हणती धन्य अर्जुन ॥ सूर्य आणि संक्रंदन ॥ चिंतिती कल्याण निज पुत्रां ॥१६॥पार्थाचें कल्याण चिंतिती ॥ सुरवर सर्व निश्चितीं ॥ कर्णासी व्हावी जय प्राप्ती ॥ दैत्य इच्छिती मनांत ॥१७॥ब्रह्म यासी पुसती देव आणि मुनी ॥ सांग जय प्राप्त कोणा लागूनी ॥ ते ऐका वया विधीची वाणी ॥ शक्र सादर जाहला ॥१८॥मग बोले विष्णु नाभ ॥ जिकडे असेल रुक्मिणी वल्लभ ॥ जय आणि लाभ ॥ तिकडे सर्व विलोका ॥१९॥ऐसें ऐकतां पाकशासन ॥ आनंद भरित त्रिभुवन ॥ जय वाद्यें वाजवून ॥ वर्षेम सुमनें पार्था वरी ॥२०॥अमर दाटले विमानीं ॥ नरनरेश्वरीं भरली मेदिनी ॥ निज भारेंशीं दुरोनी ॥ कित्येक विलो किती ॥२१॥असो कौरव पांडव रणीं ॥ झुंजतां पडल्या शीर्षाच्या श्रेणी ॥ कंपाय मान होय धरणी ॥ उरगेंद्र मस्तक सरसावी ॥२२॥दिग्गज चळचळां कांपत ॥ आदिवराह सरसावी दांत ॥ कूर्म पृष्ठ सरसावीत ॥ चिंता ग्रस्त भुवनत्रय ॥२३॥आकाश मंडप आसडत ॥ भडभडां नक्षत्रें रिचवत ॥ महाधाकें बलवंत ॥ हिमज्वरें कांपती ॥२४॥तया कल्होळांत उभय कृष्ण ॥ वाजविती देवदत्त पांच जन्य ॥ तेव्हां सृष्टि गेली म्हणोन ॥ एकचि हांक जाहली ॥२५॥त्या माजी अंजनी नंदन ॥ भुभुःकारें गाजवी त्रिभुवन ॥ वेष्टित भूतें आवेशें करून ॥ हांका फोडिती ते वेळीं ॥२६॥अगाध जीवनीं नौका डळमळी ॥ तैसी कुंभिनी डोलों लागली ॥ तों हनुमंतें कंव घातली ॥ ध्वजावरी कर्णाचे ॥२७॥कुंजररेखित कर्ण ध्वज ॥ तो विदारीत वायुतनुत ॥ कौतुक पहा वया धर्म राज ॥ पाठींशीं उभा पार्थाच्या ॥२८॥शल्या कडे शेष शयन ॥ क्रोधें पाहे विलोकून ॥ तुरंगांवरी तुरंग जाण ॥ रथींचे धांवले सक्रोधें ॥२९॥विजय म्हणे चक्र पाणी ॥ जरी मज कर्णें मारिलें रणीं ॥ तरी तूं काय रे करिसील ये क्षणीं ॥ सांग मजला गोविंदा ॥३०॥यावरी यादवकुल दिवाकर ॥ बोलात काय श्रीकरधर ॥ अघटित घडेल साचार ॥ परी पराजय नव्हे तूतें ॥३१॥सूर्य मार्ग ॥ चुकेल करितां भ्रमण ॥ नेत्रीं अंधत्व पावेल अग्न ॥ मशकाची थडक लागून ॥ जरी मेरु उपडेल ॥३२॥पाषाण प्रहारें करून ॥ जरी वायु पडेल मोडूनि चरण ॥ पिपीलिका शोषी सिंधु जीवन ॥ विजेसी धांवोनि शलभ धरी ॥३३॥धडधडीत प्रलय ज्वाळ ॥ कर्पूरतुषारें होय शीतळ ॥ हेंही घडेल एक वेळ ॥ परी परा जय नव्हे तूतें ॥३४॥पार्थ म्हणे ब्रह्मांड नायका ॥ सूत्रधारका विश्वव्यापक ॥ तुझी करणी भक्त पालका ॥ ब्रह्मादिकां नेणवेचि ॥३५॥कर्णाच्या नितंबिनी सकल ॥ विगत धवा आदि होतील ॥ वैकुंठींचा वेल्हाळ ॥ करी भविष्य आधींच हें ॥३६॥तों दुर्यो धन गुरु सुत ॥ कृत वर्मा आणि शारद्वत ॥ बाणांची वृष्टि करीत ॥ पार्था वरी लोटले ॥३७॥गज भार रथ भार ॥ पाय दळ आणि अश्वभार ॥ लक्षो नियां सुभद्रावर ॥ हाणिती शस्त्रें एकदांचि ॥३८॥तितुक्यांचीं शस्त्रें छेदून ॥ टाकिता झाला अर्जुन ॥ आपुले अंगीं एक बाण ॥ लागों नेदी कुशल तो ॥३९॥स्वभारेंशीं धांवले जे वीर ॥ तितुके पार्थें केले जर्जर ॥ शिरें उडविलीं अपार ॥ कंदुका ऐसीं तेधवां ॥४०॥पक्षी उडती वृक्षां वरूनी ॥ तैसीं शिरें उसळती गगनीं ॥ तो महाप्रलया देखोनी ॥ द्रौणी म्हणे सुयो धना ॥४१॥अजूनि तरी होईं सावधान ॥ ऐकें माझें हितवचन ॥ मित्र करूनि पंडुनंदन ॥ समसमान नांदा तुम्ही ॥४२॥माझिया बोलांत निश्चित ॥ आहेत पांचही पंडुसुत ॥ तूं ऐकतां आपुलें हित ॥ कल्याण यांत सर्वांचें ॥४३॥दुःखार्णव भरला देखा ॥ मम वचन द्दढनौका ॥ बैसोनि पावसी परतटाका ॥ विरोधवार्ता सांडीं कां ॥४४॥कर्णासी वारीं तूं सत्वर ॥ मी आवरितों सुभद्रा वर ॥ अभिमान हा महाक्रूर ॥ सांडीं संग तयाचा ॥४५॥धृत राष्ट्राचें वंशवन ॥ विरोधें गेलें शुष्क होऊन ॥ तेथें पांच पांडव पंचाग्न ॥ जाळीत पूर्ण चालिले ॥४६॥गुरु सुत मी गुरू समान ॥ सुधारस मानीं मम वचन ॥ दूर करील सर्वांचें मरण ॥ सांडीं अभिमान सुयोधना ॥४७॥म्ग दुर्यो धन बोले वचन ॥ आतां सोडूनियां अभिमान ॥ पांडवांसी न जाऊं शरण ॥ मैत्री करा म्हणो नियां ॥४८॥वेंचूं समरांगणीं प्राण ॥ कीर्तीनें भरूं त्रिभुवन ॥ अर्जुनासी मारील कर्ण ॥ पाहें कौतुक आतां हें ॥४९॥इभमस्त कींचें मुक्त ॥ घेऊं गेला मृगनाथ ॥ तो होऊनि भयभीत ॥ परतेल काय घडेल हें ॥५०॥माझ्या दुःशासनाचें रक्तपान ॥ केलें भीमें समरीं जाण ॥ त्याचा मी घेईन प्राण ॥ किंवा देईन आपुला ॥५१॥माझ्या मस्तकींचा मुकुट ॥ लत्ताप्रहारें करीन पिष्ट ॥ समरीं भीम बोलिला स्पष्ट ॥ तें तुवां श्रवण केलें कीं ॥५२॥आतां करूनि पुरुषार्थ ॥ प्राण द्यावा हाचि इत्यर्थ ॥ असो इकडे कर्ण आणि पार्थ ॥ रणरंगीं भिडती पैं ॥५३॥पूर्वीं इंद्र आणि वृत्रा सुर ॥ कीं श्रावणारि सुत मय जावर ॥ शक्रारि आणि ऊर्मिला प्रिय कर ॥ तैसे दोघे दिसती पैं ॥५४॥व्यो मकेश आणि त्रिपुरा सुर ॥ कीं तारका सुर आणि कुमार ॥ तैसे कर्ण आणि कृष्ण प्रियकर ॥ निःशंक वीर दोघेही ॥५५॥मग कर्ण पार्थासी लक्षून ॥ सोडिता जाहला दहा बाण ॥ ते अर्जुनें छेदून ॥ सोडिले द्विगुण तयावरी ॥५६॥कर्णें सोडिले बाण शत ॥ सहस्त्र बाणीं ताडीत पार्थ ॥ लक्ष बाणीं सूर्य सुत ॥ ताडिता जाहला तयातें ॥५७॥यावरी तो वीर जग जेठी ॥ सोडिता जाहला बाण कोटी ॥ अक्षय्य तूणीर पृष्ठी ॥ अर्जुनाचा भरला असे ॥५८॥अमोघ धनंजयाचे बाण ॥ सुटते जाहले चापा पासून ॥ जैसे चतुराचे मुखांतून ॥ अपार शब्द निघती पैं ॥५९॥कीं पद क्रम वर्ण क्रमे करून ॥ वैदिक करिती वेदाध्ययन ॥ तैसे चपलत्वें अर्जुन ॥ शर सोडी असंख्य ॥६०॥कीं मेघा पासूनि अवधारा ॥ अपार पडती तोय गारा ॥ कीं ओंकारा पासूनि अपारा ॥ ध्वनि जैसे निघती पैं ॥६१॥कीं मूल माये पासूनि एकसरें ॥ असंख्य जीव सृष्टि उभारे ॥ कीं चपल लेखका पासूनि त्वरें ॥ असंख्य अक्षरें उमटती ॥६२॥कर्णाचें जें बाण जाळ ॥ एक सरें छेदी कुंती बाळ ॥ जैसें उगवतां सूर्य मंडळ ॥ भगणें सर्व झांकती ॥६३॥कीं एक उठतां विनायक ॥ अपार संहरी दंदशूक ॥ कीं सुटतां चंडवात देख ॥ जलद जाल वितळे पैं ॥६४॥कीं विष्णु नामें करून ॥ असंख्य दुरितें जाती जळोन ॥ कीं चेततां द्विमूर्धान ॥ होती विपिनें दग्ध पैं ॥६५॥शत्रु बाण जाल समस्त ॥ छेदूनि पाडी एके क्षणांत ॥ जैसे एका सिंहनादें गज बहुत ॥ पडती गत प्राण होऊनी ॥६६॥ह्रदयीं प्रकट तांचि बोध ॥ सहपरिवारें पळती काम क्रोध ॥ कीं प्रत्यया येतां ब्रह्मानंद ॥ क्षुद्रानंद विरूनि जाती ॥६७॥अर्कज सोडी एक शर ॥ त्यापासूनि निघती अपार ॥ जैसा एकुलता एक पुत्र ॥ संतति वाढे बहु त्याची ॥६८॥तैलबिंदु जळीं पडतां ॥ तो पसरे चहूंकडे अवचितां ॥ कीं सत्पात्रीं दान देतां ॥ कीर्ति प्रकटे सर्वत्र ॥६९॥कीं कुलवंतासी उपकार करितां ॥ यश प्रकटे न सांगतां ॥ तैसा कर्ण एक बाण सोडितां ॥ पसरती बाण चहूंकडे ॥७०॥बाणांसी झगडतां बाण ॥ तेव्हां वर्षत प्रलयाग्न ॥ बाण खंड पडतां उसळोन ॥ कित्येक वनें दग्ध होती ॥७१॥शस्त्रांसी झगडतां शस्त्रें ॥ भयें रिचवती नक्षत्रें ॥ सप्तसमुद्रांचीं नीरें ॥ तप्त जाहलीं तेधवां ॥७२॥कलाहीन शशितरणी ॥ विमानें पळविती सुधापानी ॥ वायु फिरों न लाहे धरणीं ॥ दिवसचि रजनी वाटत ॥७३॥जळती सकल पांडवभार ॥ ऐसें कर्णें सोडिलें अग्न्यस्त्र ॥ वीरांचे रथ शस्त्रें समग्र ॥ जळों लागलीं तेधवां ॥७४॥हरिनामें निरसती दोष समग्र ॥ तेवीं पार्थें सोडिलें जल दास्त्र ॥ अग्नि विझाला समग्र ॥ जैसी मत्सरें प्रीति मरे ॥७५॥जलद माजले अद्भुत ॥ कौरवांची सेना वाहात ॥ जैसा विवेक होतां प्राप्त ॥ काम क्रोध निरसती ॥७६॥मग तो लोक प्राणे शास्त्र ॥ सोडिता जाहला सूर्य पुत्र ॥ पार्थ सेना समग्र ॥ वायुचक्रीं पडियेली ॥७७॥पार्थें सोडूनि पर्वत ॥ प्रभंजन कोंडिला समस्त ॥ जैसे मद अहंकार महंत ॥ सत्यज्ञानें विभांडी ॥७८॥मग वज्रास्त्र जपोन ॥ सोडिता जाहला सूर्य नंदन ॥ पार्थें माहेश्वर टाकून ॥ संहारिलें तेधवां ॥७९॥पार्थें कर्णाचा रहंवर ॥ निज बाणीं भेदिला समग्र ॥ जैसे शोभती तृणां कुर ॥ तेवीं रथ दिसतये ॥८०॥निज राथीं शोभे सूर्य कुमार ॥ जैसा निरभ्रनभीं सहस्त्रकर ॥ कर्णें तेव्हां कार्तवीर्यास्त्र ॥ अनिवार सोडिलें ॥८१॥सहस्त्रकरांचे तीव्र वीर ॥ कोटयवधि उठिले अपार ॥ मग पार्थें भार्ग वास्त्र ॥ असं भाव्य सोडिलें ॥८२॥कर्णें सोडिलें महिषास्त्र ॥ पार्थें शक्ति सोडिल्या समग्र ॥ कर्णें जपतां सर्पास्त्र ॥ गारुडास्त्र फाल्गुन जपे ॥८३॥कर्णें सोडिला अपांपती ॥ किरीटीनें पाठ विला अगस्ती ॥ कर्णें प्रेरिली काळराती ॥ सोडी गभस्ति पार्थ तेव्हां ॥८४॥यावरी कर्णें कृष्णार्जुन ॥ शरधारीं खिळिले संपूर्ण ॥ मग पार्था प्रति भीम सेन ॥ बोलता जाहला तेधवां ॥८५॥कर्णें संहारिली पृतना ॥ कौतुक काय पाहसी अर्जुना ॥ मग बाण जाळीं शल्य कर्णां ॥ पार्थें खिळिलें तेधवां ॥८६॥शल्य आणि सौती ॥ मयूरा ऐसेचि दिसती ॥ पांडवांचे बहुत हस्ती ॥ कर्णें मारिले तेधवां ॥८७॥रथी आटिले बहुत ॥ स्वारांसी तेथें नाहीं गणित ॥ धर्म राज कौतुक पाहात ॥ कर्णार्जुनांचें तेधवां ॥८८॥गांडीवाचा गुण जान ॥ कर्णे छेदिला टाकूनि बाण ॥ सवेंचि अर्जुनें आपण ॥ लाविला नूतन ॥ तत्काळ ॥८९॥थोर युद्धाचा कडकडाट ॥ वार्यासी मध्यें न फुटे वाट ॥ तेथें द्विजांचा संघट्ट ॥ होईल कैसा त्या ठाया ॥९०॥कृष्णा वरी साठ बाण ॥ सोडिता जाहला वीर कर्ण ॥ शल्या वरी नऊ मार्गण ॥ पार्थें तेव्हां घातले ॥९१॥दोन्ही दळींचे वीर ॥ पाहती उगेचि भया सुर ॥ जैसे चित्रीं लिहिले चित्र भार ॥ तैसे दिसती तेधवां ॥९२॥हस्तला घव करी कर्ण ॥ त्या हूनि विशेष करी अर्जुन ॥ तों कर्णाचे भातां येऊन ॥ तक्षक पुत्र बैसला ॥९३॥त्याची माता खांडववनीं ॥ पळतां मारिली पार्थें बाणीं ॥ तेथील वैर स्मरोनी ॥ शर होऊनि गुप्त वसे ॥९४॥कर्णार्जुन ॥ श्रमले फार ॥ अंगीं चालिले घर्मपूर ॥ विंझणे घेवोनि सेवक नर ॥ वारा घालिती दोघांवरी ॥९५॥चंदन कर्पूर मिश्रित नीर ॥ सेवक शिंपिती वारंवार ॥ घेघेही कौंतेय सुंदर ॥ तनु सुकुमार दोघांची ॥९६॥त्यावरी तो तक्षक बाण ॥ कर्णें काढिला जेवीं सहस्त्र किरण ॥ अर्जुनाचा कंठ लक्षून ॥ अकस्मात सोडित ॥९७॥तो बाण अनिवार ॥ अर्जुनाचा प्राण घेणार ॥ शक्रा दिदेव समग्र ॥ हाहाकार करिती तेव्हां ॥९८॥नित्य पूजिला तो बाण ॥ चर्चिला चंदनें करून ॥ त्याचि बाणीं तक्षक नंदन ॥ गुप्तरूपें संचरला ॥९९॥कळवळला शचीरमण ॥ त्याची शांतवी चतुरानन ॥ तूं धीर धरीं एक क्षण ॥ व्याकुल मन होऊं नेदीं ॥१००॥अर्जुनासी रक्षक पाहीं ॥ आहे क्षीराब्धीचा जांवई ॥ कौतुक करील ये समयीं ॥ साव धान पाहा तें ॥१०१॥प्रलयच पलेसी मागें टाकून ॥ निघता जाहला निर्वाण बाण ॥ द्वादश सूर्यांचें तेज पूर्ण ॥ तया शरीं एक वटलें ॥१०२॥कीं सुटला कालदंड ॥ विदारील वाटे ब्रह्मांड ॥ मेरु मंदार शत खंड ॥ घायें करील वाटतसे ॥१०३॥सहस्त्र विजा कडकडती ॥ तैसा बाण जाय सत्वरगती ॥ दोन्ही दळें मोह पावती ॥ वीर पळती दशदिशां ॥१०४॥धर्म भीम नकुल सहदेव ॥ भयभीत वीर सर्व ॥ म्हणती हे विश्वव्यापक कमला धव ॥ रक्षीं रक्षीं निजदासा ॥१०५॥परम आनंदला दुर्यो धन ॥ आतां सर्वथा न उरे अर्जुन ॥ माझें राज्य आणि प्राण ॥ ओंवाळीन कर्णा वरूनी ॥१०६॥वृक्षाग्रीचें फळ पाहोन ॥ पक्षी ये जैसा झेंपावोन ॥ तैसा पार्थाचा कंठ लक्षून ॥ प्रलय बाण पातला ॥१०७॥पांडवकैवारी जगन्नाथ ॥ बळें दडपिला विजय रथ ॥ गुडघे टेंकूनि तेथ ॥ तुरंग बैसवीत रथाचे ॥१०८॥चक्रां सहित विजय रथ ॥ खालीं लवला हें अद्भुत ॥ तों मुकुट छेदूनि अकस्मात ॥ बाणें नेला तेधवां ॥१०९॥तिल प्राय तुकडे करून ॥ मुकुट पडला चूर्ण होऊन ॥ तो मुकुट चतुराननें निर्मून ॥ शक्रासी पूर्वीं दिला होता ॥११०॥तो किरीट परम प्रीतीनें ॥ पार्थासी दिधला सहस्त्र नयनें ॥ असो अर्जुन जावा प्राणें ॥ परी मुकुटा वरीच तें गेलें ॥१११॥सूत्र धारी याद वेंद्र ॥ भक्तरक्षक दया समुद्र ॥ विमानांतूनि पुरंदर ॥ आनंदाश्रु ढाळीतसे ॥११२॥लक्षोनि पार्थ श्रीधर ॥ सुमनें वर्षे वारंवार ॥ पांडव करिती जय जय कार ॥ स्तविती तेव्हां श्रीरंगा ॥११३॥अस्तमाना जाय चंड किरण ॥ तैसा किरीट नेला उडवून ॥ मग पार्थें मूर्धज सांव रून ॥ वस्त्र बांधिलें तेधवां ॥११४॥यावरी तो तक्ष कसुत ॥ कर्णापाशीं येऊनि बोलत ॥ म्हणे संधान चुकलें यथार्थ ॥ पुन्हां सोडीं मजलागीं ॥११५॥कर्ण पुसे तूं कोण ॥ तो सांगे पूर्व वर्त मान ॥ मी मातेचा सूड घेईन ॥ करीं संधान ॥ मागुती ॥११६॥कर्ण म्हणे मी काय बलहत ॥ तुझ्या आश्रयें युद्ध करूं येथ ॥ मज वीर हांसतील समस्त ॥ जाईं तूं त्वरित निज स्थाना ॥११७॥मग सर्पास्त्राचें रूप धरून ॥ चालिला पार्थासी लक्षून ॥ कृष्ण म्हणे पार्था लागून ॥ तक्षक पुत्र शत्रु तुझा ॥११८॥मग बाण सोडूनि कृष्ण मित्रें ॥ खंडविखंड केलीं गात्रें ॥ यावरी त्या कुंती पुत्रें ॥ द्वादश शर सोडिले ॥११९॥ते कर्णाचें फोडूनि अंग ॥ पलीकडे गेले सर्वग ॥ सवेग ॥ सवेंचि कर्णाचा मुकुट सुरंग ॥ चूर्ण केला शरघायें ॥१२०॥कवच अंगींचें छेदून ॥ ह्र्दयीं भेदिले नव बाण ॥ मूर्च्छना येऊनि कर्ण ॥ ध्वजस्तंभीं टेंकला ॥१२१॥मूर्च्छना जाय निरसोन ॥ तोंवरी अर्जुन न मारी बाण ॥ मग सावध होऊनि कर्ण ॥ सरसावून बैसला ॥१२२॥अस्ता आतां वासरमणी ॥ तैसा कर्ण आरक्त दिसे ते क्षणीं ॥ मग सवेंचि शत बाणीं ॥ श्रीरंगासी खिळियेलें ॥१२३॥सवेंचि टाकोनि शत शर ॥ कर्णें पार्थ केला जर्जर ॥ मग पार्थासी म्हणे श्रीकरधर ॥ काढीं बाण शिव दत्त जो ॥१२४॥पृथ्वी आप तेज वायु अंबर ॥ यांचीं सत्त्वें काढूनि समग्र ॥ एकादश रुद्र द्वादश मित्र ॥ यांचीं तेजें घेऊनी ॥१२५॥तो बाण रची हिमनगजामात ॥ पूर्वीं त्रिपुरवधानिमित्त ॥ मग प्रसन्न होऊ नियां देत ॥ पार्था लागीं प्रीति भरें ॥१२६॥तों कर्णाचें कर्म गहन ॥ न सुटे कदा भोगिल्या विण ॥ गुरु शाप विप्रशाप दारुण ॥ सरसावले अंतकाळीं ॥१२७॥समीरगतीं चालतां रथ ॥ पृथ्वीनें चक्रें गिळिलीं अकस्मात ॥ मंत्र आठवेना समयो चित ॥ अस्त्रही कदा स्मरेना ॥१२८॥अस्त्रें शक्ति अद्भुत बाण ॥ असतां कदा नव्हे स्मरण ॥ हस्तल घव गेलें गळोन ॥ तेजोहीन मुख जाहलें ॥१२९॥दशदिशा वाटती शून्य ॥ वाटे जवळी आलें मरण ॥ परीतो भास्करी धैर्य धरून ॥ पुढती रण माज वीत ॥१३०॥मग चाप ओढूनि आकर्ण ॥ कर्णें सोडिले सात बाण ॥ सच्चिदानंदतनूसी भेदून ॥ बाण गेले पलीकडे ॥१३१॥सप्त बाण भेदूनि गेले ॥ परी कृष्णाचें आसन न ढळे ॥ पंचशरांचेनि मेळें ॥ न ढळे जैसा मारुती ॥१३२॥हाणितां कुठार तीक्ष्ण ॥ वृक्ष न जाय सोडूनि स्थान ॥ कीं वर्षतां अपार घन ॥ अचल स्थान सोडीना ॥१३३॥कीं निंदक निंदितां अपार ॥ न चळे साघूचें अंतर ॥ प्रर्हादासी लाविले विखार ॥ परी तेणें धीर न सोडिला ॥१३४॥जो षड्विकाररहिततनु ॥ जो नरवीर पंचाननु ॥ तो आदि पुरुष पुरातनु ॥ सप्तशरीं भेदिला ॥१३५॥पार्थाचे ह्रदयीं जाण ॥ कर्णें भेदिले द्वादश बाण ॥ सवेंचि प्रत्यंचा छेदून ॥ गांडीवाची टाकिली ॥१३६॥पार्थ आणिक लावी नूतन ॥ सवेंचि तोडूनि टाकी कर्ण ॥ असो एकामागें एक गुण ॥ शंभर तोडून टाकिले ॥१३७॥अर्जुने निर्वाण शरीं ॥ कर्ण खिळिला ते अवसरीं ॥ तेव्हां कर्णाचा रथ धरित्री ॥ गिळिती जाहली विप्रशापें ॥१३८॥ते वेळीं सूर्य नंदन ॥ रथा खालीं उतरोन ॥ रथचक्र काढी उपटोन ॥ परी कदा नुपटेचि ॥१३९॥धन्य कर्णाचें अद्भुत बळ ॥ डळमळलें उर्वी मंडळ ॥ परी समीप आला काळ ॥ चक्र सहसा उपटेना ॥१४०॥तों अर्जुनाचे येती बाण ॥ मग बोलता जाहला उदार कर्ण ॥ भो भो पार्थ पंडुनंदन ॥ क्षणैक स्थिर राहें तूं ॥१४१॥तूं वीर परम ख्यातिवंत ॥ अवकाशा देईं एक महूर्त ॥ मज चक्र उपटूं दे येथ ॥ संकटीं बहुत पडलों असें ॥१४२॥पार्थें मुकुट नेला छेदून ॥ कर्णाची वीर गुंठी सुटोन ॥ सुवास केश पसरले जाण ॥ ते शोभाय मान दिसती पैं ॥१४३॥असो तो कर्ण उदार ॥ पार्थासी विनवी वारंवार ॥ मी व्यसनीं पडलों साचार ॥ भीत नाहीं मरणातें ॥१४४॥धर्मा धर्म विचार बहुत ॥ तूं सर्व जाणसी रणपंडित ॥ त्या प्रति द्वारकानाथ ॥ प्रत्युत्तर देतसे ॥१४५॥म्हणे कर्णा धर्म न्याय नीती ॥ आतां काय रे तुज स्मरली चित्तीं ॥ सभेसी नेली द्रौपदी सती ॥ कपटद्यूत खेळोनियां ॥१४६॥तेव्हां धर्म न्याय नीती ॥ तुज नाठवली कदा चित्तीं ॥ अजात शत्रु धर्म नृपती ॥ कपटें करू नि नाडिला ॥१४७॥विष घालोनि मारिला वृकोदर ॥ वर्मीं दंशविले विखार ॥ लक्षा सदनीं लाविला वैश्वानर ॥ तेव्हां धर्म न विचारिला ॥१४८॥वना धाडिले पंडुकुमार ॥ रात्रीस मिळूनि तुम्ही समग्र ॥ घाला घालावया दुराचार ॥ येत होतां कपटी हो ॥१४९॥मिळूनि तुम्ही अवघे जणीं ॥ बाळ अभिमन्यु मारिला रणीं ॥ तुज धर्म नाठवला ते क्षणीं ॥ मदेंकरूनि भुललासी ॥१५०॥द्रौपदी नव्हें देवकी जाण ॥ सभेंत गांजिली नेऊन ॥ वस्त्रें घेतलीं फेडून ॥ तेव्हां धर्म न विचारिला ॥१५१॥आतां शत्रू निवटूनि सर्वत्र ॥ धर्मा वरी मी धरीन छत्र ॥ ऐसें बोलतां शत पत्र नेत्र ॥ सुर्य पत्र न बोलेचि ॥१५२॥पार्था वरी सोडी शर ॥ सवेंचि उपटी रथ चक्र ॥ पार्थासी म्हणे नीलगात्र ॥ सोडीं अस्त्र काय पाहसी ॥१५३॥कर्ण तिकडूनि शर सोडी ॥ सवेंचि रथ चक्रें बळें उपटी ॥ शत बाण सोडूनि प्रौढी ॥ अर्जुन मूर्च्छित पाडिला ॥१५४॥इतुक्यांत उपटी रथ चक्र ॥ परी तें न ढळेचि अणु मात्र ॥ ब्रह्म शाप परम दुस्तर ॥ कदा टाळिला नव जाय ॥१५५॥श्रीकृष्ण म्हणे पार्था पाहीं ॥ हा वधीं जों रथा वरी चढला नाहीं ॥ तों बाण सोडूनि लवलाहीं ॥ ध्वज छेदिला कर्णाचा ॥१५६॥हाहाकार करिती कौरव जन ॥ आतां न वांचे कदा कर्ण ॥ जय पारखा जाहला येथून ॥ कर्म गहन पूर्वींचें ॥१५७॥काढिला पार्थें शिव दत्त बाण ॥ प्रलय विजे ऐसा देदीप्य मान ॥ कीं तो माध्यान्हींचा चंड किरण ॥ तैसा मार्गण दिसतसे ॥१५८॥कीं तो शिव हस्तींचा त्रिशूळ ॥ किंवा वज्र सुटलें प्रबळ ॥ कीं सुदर्शन तेजाळ ॥ कृष्ण हस्तींचें चालिलें ॥१५९॥पार्थ करी तेव्हां शपथ ॥ जरी सत्यविद्या हे शिवदत्त ॥ आणि विबुधेश्वराचें सामर्थ्य ॥ अपरिमित असेल ॥१६०॥द्रोण गुरुचें पदकमल ॥ माझें मन तेथें भ्रमर असेल निश्चल ॥ कायावाचामनें निर्मळ ॥ कृष्णो पासक मी जरी असें ॥१६१॥तरी याचि बाणें तत्काळ ॥ तुटो कर्णाचें शिरकमळ ॥ तो बाण जातसे तेजाळ ॥ मूर्च्छित जाहलीं दोन्ही दळें ॥१६२॥पर्व तावरी पडे चपला ॥ तैसा शर कर्ण कंठीं बैसला ॥ कीं सूर्य अस्तमाना गेला ॥ तैसें शिर उडविलें ॥१६३॥शिर ऊर्ध्व गेलें देखा ॥ मूखांतूनि निघाली तेजकलिका ॥ ते मिळाली जाऊनि अर्का ॥ लवण जलन्यायेंशीं ॥१६४॥जय वाद्यांचे गजर ॥ पांडवदळीं जाहले अपार ॥ वरी आनंदला पुरंदर ॥ दुंदुभिवाद्यें वाजवी ॥१६५॥दिव्य सुमनांचा वर्षाव तेव्हां ॥ वारंवार करी मघवा ॥ कौरव दळीं तेधवां ॥ शिर पडलें कर्णाचें ॥१६६॥कर्ण पडतां रण मंडळीं ॥ दुःखाश्रु ढाळी चंडांशुमाळी ॥ निज करें स्पर्शोनि अस्ताचळीं ॥ सागर स्नान करीतसे ॥१६७॥उरले जे पांडवांचे वीर पूर्ण ॥ एकमेकां देती आलिंगन ॥ उत्तम दानीं संपूर्ण ॥ भूसुर जाण तोष विले ॥१६८॥रिता रथ घेऊनि ते वेळीं ॥ शल्य प्रवेशला कौरव दळीं ॥ धरणी वरी आंग घाली ॥ दुर्यो धन अतिशोकें ॥१६९॥तेव्हां नेत्रोदकें करूनी ॥ खालीं भिजतसे अवनी ॥ अहा बाल मित्रा मज टाकूनी ॥ कर्ण वीरा गेलासी ॥१७०॥अहा कर्णा परमोदारा ॥ अहा कर्णा अतिसुंदरा ॥ अहा कर्णा समर धीरा ॥ सद्नुण मी किती आठवूं ॥१७१॥हे कर्ण वीरा चंड किरण ॥ पावलासी आजि अस्त माना ॥ उदय नव्हेचि पुन्हां ॥ पडली सेना अंधारीं ॥१७२॥तुझिया स्वरूपावरून ॥ शंबरारि टाकावा ओंवाळून ॥ कवच कुंडलें मागों आला जाण ॥ ब्राह्मण वेषें शक्र तो ॥१७३॥तूं सकल उदारांचा राणा साच ॥ तत्काळ दिधलीं कुंडलें कवच ॥ कार्प ण्यता न धरिसीच ॥ काया वाचा मानसें ॥१७४॥औदार्य सात्त्विकता परोपकार ॥ धर्म राया सम गंभीर ॥ परा क्रमी पुण्यपवित्र ॥ तुज ऐसा नसेचि ॥१७५॥तों रण मंडळ सांडूनी ॥ पळे तेव्हां कौरव वाहिनी ॥ इकडे भीमें आनंदे करूनी ॥ हांक फोडिली आवेशें ॥१७६॥प्रति शब्द उठिला निराळीं ॥ कौरव सेना कांपे चळीं ॥ स्वदेशासी तये काळीं ॥ कित्येक जाती जीव भयें ॥१७७॥वीर बोलती भयें करून ॥ पैल पाहा आला अर्जुन ॥ एक म्हणती दुःशासनाचें रक्तपान ॥ कर्ता भीम आला हो ॥१७८॥अहो ते भय समुद्रांत ॥ कौरव सेना ॥ अवघी पडत ॥ कर्णाचें स्तवन ॥ अद्भुत ॥ शल्य करी तेधवां ॥१७९॥म्हणे कर्णा ऐसा वीर पाहीं ॥ नोहेचि कदा भुवनत्रयीं ॥ होणार न टळे सहसाही ॥ रणीं मारिला फाल्गुनें ॥१८०॥इकडे धर्म राज कृष्णार्जुनां ॥ प्रीतीनें देत आलिंगना ॥ म्हणे हे कृष्णा जना र्दना ॥ किती उपकारा आठवूं ॥१८१॥आमुची शोभा संपत्ति बळ ॥ तूंचि अवघा तमालनीळ ॥ तूंचि ब्रह्मा नंद निर्मळ ॥ सगुणपणा आलासी ॥१८२॥चिंतामणीचे धवला गारीं ॥ जो पहुडला सुखसेजेवरी ॥ तो ओसणतां बोलिला जरी ॥ तरी तें सर्व प्राप्त होय ॥१८३॥तैसा आमुचे मनोरथीं ॥ हरि तूं जाहलासी सारथी ॥ जें जें आम्ही इच्छितों चित्तीं ॥ तें श्रीपति पुरविसी तूं ॥१८४॥खाऊनि करकरां दांत ॥ दुर्यो धन धांवला सेने सहित ॥ पांडवसेना संहारीत ॥ वीर पळती दश दिशां ॥१८५॥जैसा चापापा सूनि सुटे बाण ॥ तैसा धांवला भीम सेन ॥ प्रचंड गदा घायें करून ॥ कौरव सेना विभांडिली ॥१८६॥पंचवीस सहस्त्र वीर ॥ मारीत तेव्हां वृकोदर ॥ धृत राष्ट्राचा ज्येष्ठ कुमार ॥ परा भवून पळविला ॥१८७॥रात्र जाहली परम घोर ॥ शिविरीं जाऊनि बैसला चिंतातुर ॥ कर्णासी आठवूनि वारंवार ॥ दुर्यो धन अश्रु गाळी ॥१८८॥जेणें द्रव्याचे पर्वत ॥ ब्राह्मणांसी दिधले अमित ॥ रणा आला सुर्य सुत ॥ करूनि समस्त ग्रहदानें ॥१८९॥तों हरिवर ध्वजाचे रथीं ॥ द्विजवर ध्वज जाहला सारथी ॥ म्हणो नियां जय प्राप्ती ॥ जाहली निश्चितीं तयातें ॥१९०॥देव ऋषी स्वस्थाना ॥ चालिले वर्णीत भीमार्जुनां ॥ कोणी वर्णिती कर्णा ॥ धीर उदार म्हणो नियां ॥१९१॥धर्म राज रथीं बैसोन ॥ सुगंधस्नेहदीपिका लावून ॥ कर्पूर दीपिका पाजळून ॥ सह्स्त्र सेवक चालती ॥१९२॥कर्ण पडला रण मंडळीं ॥ धर्म जवळी येऊनि न्याहाळी ॥ महावीर पडले स्थळो स्थळीं ॥ दिव्य अलंकारीं मंडित ॥१९३॥नक्षत्रें क्षितीवरी पडती ॥ तेवीं अलंकार शस्त्रें झगमगती ॥ असो पांडव शिबिरा प्रती ॥ जाते जाहले तेधवां ॥१९४॥कृष्ण कृपेचें बळ अद्भुत ॥ रणीं मारिला सूर्य सुत ॥ सुखें निद्रा पांडव करीत ॥ सर्व चिंता सोडुनियां ॥१९५॥इकडे धृत राष्ट्रालागून ॥ संजय सांगे वर्त मान ॥ रणीं पहुडला वीर कर्ण ॥ जो कां प्राण कौरवांचा ॥१९६॥धृतराष्ट्र आणि गांधारी ॥ बुडालीं तेव्हां शोक सागरीं ॥ संजय विदुर नानापरी ॥ शांतविती दोघांतें ॥१९७॥जन मेजय जो धरणीनाथ ॥ त्यासी वैशंपायन सांगत ॥ शौनका दिकां प्रति सूत ॥ कथा सांगत नैमिषारण्यीं ॥१९८॥कर्ण पर्व संपलें येथून ॥ पुढें शल्य पर्व करा श्रवण ॥ श्रीधर ब्रह्मानंदें करून ॥ विनवीतसे श्रीतियांसी ॥१९९॥हें कर्ण पर्व ऐकतां निर्मळ ॥ हाता येत अश्वमेधफळ ॥ श्रवण करी जो पुण्य शीळ ॥ इच्छिलें फळ पावे तो ॥२००॥तो होय धन धान्य संयुक्त ॥ पुत्र पौत्रीं तोचि नांदत ॥ माधव आणि उमा धव समस्त ॥ कृपा करिती त्यावरी ॥२०१॥ब्राह्मणांसी होय विद्या प्राप्त ॥ क्षत्रिय ऐकतां विजय सत्य ॥ निरंतर धन धान्य युक्त ॥ वैश्य शूद्र होती श्रवणें ॥२०२॥कर्ण पर्व क्षीराब्धि देख ॥ पार्थ रथ शेष मंचक ॥ जेथें विराजे वैकुंठ नायक ॥ सर्व सामर्थ्य सहित पैं ॥२०३॥जेथें जयश्री हेचि कमला ॥ अर्धागीं वसतसे वेल्हाळा ॥ म्हणो नियां होतसे सोहळा ॥ पांडव घरीं सर्वदा ॥२०४॥श्रीमद्भी मातट विहारा ॥ ब्रह्मानंदा सौख्य समुद्रा ॥ पांडुरंगा श्रीधरवरा ॥ दिगंबरा आदिंपुरुषा ॥२०५॥येथूनि शल्यपर्व अवधारा ॥ पांडित श्रोते श्रवण करा ॥ श्रीधरवरदा जग दुद्धारा ॥ मन्मनोरथीं बैसें कां ॥२०६॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ कर्ण पर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकुणपन्नाव्यांत कथियेला ॥२०७॥इति श्री श्रीधरकृतकर्णपर्वणिकर्णनिधनंनाम एकोनपंचाशत्तमाध्यायः ॥४९॥ इति - कर्णपर्व - समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP