मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ३९ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ३९ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ३९ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ जो इंदिरावर पद्मनेत्र ॥ जो सौंदर्यनभींचा अक्षय्य चंद्र ॥ भक्तकामकल्पद्रुम यादवेंद्र ॥ कौरवसभेसी विराजे ॥१॥शिष्टाई करूं आला श्रीकरधर ॥ हें ऐकोनि नारदादि ऋषीश्वर ॥ सभेसी पातले समग्र ॥ ते पूजिले धृतराष्ट्रें ॥२॥नवग्रहांत वासरमणी ॥ तेवीं सभेंत शोभे चक्रपाणी ॥ कर्ण दुर्योधन एकासनीं ॥ बैसती परम प्रीतीनें ॥३॥श्रीकृष्णा जावळी बैसला विदुर ॥ जेवीं शक्रासमीप अंगिरापुत्र ॥ भीष्म द्रोण गौतम कुमार ॥ गुरु तनुज बैसला ॥४॥मेघ गंभीरगिरा गर्जोन ॥ धृत राष्ट्रासी म्हणे जगज्जीवन ॥ सकळ राजे शल्या दिकरून ॥ तटस्थ होऊन ऐकती ॥५॥पांडव कौरव बंधु प्रसिद्ध ॥ त्यांमध्यें पडला जो विरोध ॥ तो दूर करूनि विषाद ॥ त्वां कुरुकुळ रक्षावें ॥६॥तूं वडील सर्वांसी निर्धारीं ॥ न ऐकती त्यांसी दंड करीं ॥ तुझे पुत्र तूं शिकवूनि आवरीं ॥ पांडव आणितों मी आतां ॥७॥टाकोनि कुटिलता कपट सकळ ॥ स्नेह वाढवावा एथूनि सबळ ॥ स्तुतिवाद बोलतां निर्मळ ॥ निंदा मागील सहज विरे ॥८॥पांडव बळकट स्वशक्तीं ॥ धर्मनीति न सांडिती ॥ ऐकें वृद्ध कुरुकुलनृपती ॥ कुळ रक्षीं आपुलें ॥९॥निर्दो यश पदरीं घेईं ॥ पांचही पार्थ समजावीं लवलाहीं ॥ तुझे आज्ञेनें वनवास तिंहीं ॥ त्रयोदश वर्षें पैं केला ॥१०॥धर्में सांगितलें तुजला गून ॥ तूं मायबाप गुरु आम्हां पूर्ण ॥ निजपुत्रांसी शिकवून ॥ आपणा जवळी ने आम्हां ॥११॥श्रीरंग म्हणे अंबिका नंदना ॥ चित्त देईं माझिया वचना ॥ तव पुत्रांचे अन्याय नाना ॥ मागील सर्व क्षमा केले ॥१२॥राज सूययज्ञीं तिंहीं सहज ॥ जिंकिले पृथ्वीचे भूभुज ॥ पंडुनृपें पूर्वीं राज्य ॥ गजपुरींचें केलें असे ॥१३॥परदारा आणि परधन ॥ येथें कदा न ठेविजे मन ॥ वेदमर्यादा नुल्लंघावी पूर्ण ॥ प्राणान्तही जाहलिया ॥१४॥सदा सेवावे संत सज्जन ॥ गुरु भजनीं सावधान ॥ दूरी त्यागावे दुर्जन ॥ त्यांचें अवलोकन न करावें ॥१५॥साधु संत गोब्रह्नण ॥ ह्यांचें करावें प्रति पालन ॥ सकल दुष्टांसी दवडुन ॥ स्वधर्म पूर्ण रक्षावा ॥१६॥जरी क्लेशकाळ पातला बहुत ॥ तरी धैर्य न सांडावें यथार्थ ॥ गुरु भजनीं पुण्य पंथ ॥ न सोडावा सर्वथा ॥१७॥साधूंच न करावा मान भंग ॥ भगवद्भ जनीं झिजवावें अंग ॥ टाकूनि सकळ कुमार्ग ॥ सन्मार्गेंचि वर्तावें ॥१८॥कथा कीर्तन पुराण श्रवण ॥ काळ क्रमावा येणें करून ॥ आपुला वर्णा श्रम धर्म पूर्ण ॥ सहसाही न सांडावा ॥१९॥ऋषींचे आशीर्वाद घ्यावे ॥ वर्म कोणाचें न बोलावें ॥ विश्व हें अवघें पहावें ॥ आत्मरूप केवळ ॥२०॥सत्यंग धरावा आधीं ॥ नायकावी दुर्जनाची बुद्धी ॥ कामक्रोधा दिक वादी ॥ दमवावे निजपराक्रमें ॥२१॥मी जाहलों सर्वज्ञ ॥ हा न धरावा अभिमान ॥ विनोदेंही पराचें छळण ॥ न करावें कदाही ॥२२॥शमद मादिक साधनें ॥ दूर न करावीं साधकानें ॥ जन जाती जे आडवाटेनें ॥ त्यांसी सुमार्ग दाविजे ॥२३॥क्षणिक जाणोनि संसार ॥ सोडावा विषयां वरील आदर ॥ सद्नुरु वचनीं सादर ॥ चित्त सदा रक्षावें ॥२४॥शोक मोहांचे चपेटे पूर्ण ॥ अंगीं आदळती येऊन ॥ विवेकाचें ओढण करून ॥ ज्ञान शस्त्रें परजावें ॥२५॥काम क्रोध मद मत्सर ॥ हे गृहांत य़ेऊं न द्यावे तस्कर ॥ आयुष्य क्षणिक जाणोनि साचार ॥ सारासार विचार करावा ॥२६॥दैवें भाग्य आलें थोर ॥ त्याचा गर्व न धरावा अणुमात्र ॥ अथवा एक दांचि गेलें समग्र ॥ तरी धीर न सांडावा ॥२७॥ज्या गोष्टीनें अनर्थ होय ॥ आपुलें कुळ पावे क्षय ॥ ते गोष्टी चतुरवर्य ॥ मान्य कदा न करिती ॥२८॥हातींचें टाकूनि सुवर्ण ॥ कां बळेंचि घ्यावें शेण ॥ गोड शर्करा ओसंडून ॥ राख कां मुखीं घालावी ॥२९॥मुक्ता टाकोनि सुंदर ॥ कां पदरीं बांधावे कंकर ॥ ओसंडूनि केळें सुंदर ॥ अर्कफळें कां भक्षावीं ॥३०॥टाकोनियां शुद्ध पंथ ॥ आडमार्गें जो गमन करीत ॥ त्यासी अपाय येतील यथार्थ ॥ यासी संदेह नसेचि ॥३१॥सर्वांसी विरोध करून ॥ आपुलें व्हावें म्हणे कल्याण ॥ तो अनर्थीं पडेल पूर्ण ॥ यासी संदेह नसेचि ॥३२॥वेदशास्त्रीं जें अनुचित ॥ तेथें बळेंचि घाली चित्त ॥ तेणें आप आपणा केला घात ॥ यासी संदेह नसेचि ॥३३॥परस्त्रियांचा अभिलाष ॥ महा पुरुषासी ठेवणें दोष ॥ बलवंताशीं बांधणें कांस ॥ मग अनर्थास काय उणें ॥३४॥महासर्प उसां घेऊनी ॥ केवीं निजावें सुखशयनीं ॥ बळेंचि गृहासी लावितां अग्नी ॥ मग अनर्थासी काय उणें ॥३५॥विवेकसद्वुद्धींचा बळें ॥ अनर्थ तितुका टाळावा कुशळें ॥ संतवचनें प्रांजळें ॥ ह्रदयीं द्दढ धरावीं ॥३६॥परद्रव्याचा अभिलाष ॥ जाणूनि प्राशन करणें विष ॥ परनिंदा परद्वेष ॥ करितां अनर्थास काय उणें ॥३७॥पाषाण बांधोनि ह्रदयीं ॥ उडी घातली महाडोहीं ॥ अहिमुखीं हस्त घालितां पाहीं ॥ मग अनर्थासी काय उणें ॥३८॥नर तोचि पुरुषार्थी जाण ॥ परसती आणि परधन ॥ एथें जो कदा न घाली मन ॥ तोचि धन्य शास्त्र म्हणे ॥३९॥मानससरोवरींचा राजहंस पाडीं ॥ कदा न राहे उलूक गृहीं ॥ कल्पद्रुमींचा विहंगम सहसाही ॥ बाभुळेवरी न बैसे ॥४०॥सुधारस त्यजूनि निर्मळ ॥ कोणासी आवडे हालाहल ॥ सांडूनि उत्तम तंडुल ॥ सिकता कां हो शिजवावी ॥४१॥क्षीराब्धी माजी जो राहणार ॥ त्यासी नावडे दग्धकांतार ॥ सदाचार वृत्ति नर ॥ हिंसकसदनीं न राहे ॥४२॥अंतरीं जाणोनि यथार्थ ॥ अन्यथा बळेंचि प्रतिपादीत ॥ न करावें तें हटें करीत ॥ तरी अनर्थ जवळी आला ॥४३॥ऐकें नीति कौरवेश्वरा ॥ बळेंचि कां आणितां अनर्थ घरा ॥ हिरे सांडूनि गारा ॥ संग्रहितां काय सार्थक ॥४४॥कल्पद्रुम उपटून ॥ कां वाढवितां कंटकवन ॥ राज हंस दवडून ॥ दिवा भीतें कां पाळितां ॥४५॥सुधारस ओसंडूनि देख ॥ कांजी पितां काय सार्थक ॥ सुरभि दवडूनि सुरेख ॥ अजा कासया पाळावी ॥४६॥वृंदावन वरी चांगलें ॥ परी आंत कालकूट भरलें ॥ तें न सेवावें कदाकाळें ॥ विवेकियानें सहसाही ॥४७॥ फणसफळाचे फळासमान ॥ कनकफळही दिसे पूर्ण ॥ परी तें भुलीस कारण ॥ विवेकियानें त्यजावें ॥४८॥श्रीरंगाचीं सारवचनें ॥ जीं विवेकनभींचीं उडुगणें ॥ सद्बुद्धि सागरींचीं तीं रत्नें ॥ दुर्योधनें उपक्षिलीं ॥४९॥कमल पत्राक्ष कृपाघन ॥ वर्षला स्वातीचा पर्जन्य ॥ परी पालथा घट दुर्योधन ॥ बिंदुमात्र आंत न सांचे ॥५०॥शब्दा मृत वर्षला कृष्ण चंद्र ॥ जेणें निवती भक्तचकोर ॥ दुर्योधन काक दुराचार ॥ त्यासी ते गोष्टी कळेन ॥५१॥कमल सुवास सुंदर ॥ परी काय घेऊं जाणे दर्दुर ॥ मुक्तफलाचा आहार ॥ बक काय घेऊं जाणे ॥५२॥कस्तूरीचा सुवास ॥ परी काय घेऊं जाणे वायस ॥ तत्त्वविचार मद्यपियास ॥ काय व्यर्थ सांगोनी ॥५३॥आणोनियां केशर ॥ खर लेपिला अत्यादर ॥ परी त्यासी न साजे अणुमात्र ॥ तैसा प्रकार हा जाणावा ॥५४॥जन्मांधापुढें नेऊन ॥ व्यर्थ काय रत्नें ठेवून ॥ कीं उत्तम सुस्वर गायन ॥ बधिरा पुढें व्यर्थ केलें ॥५५॥पतिव्रतेचे धर्म सकळ ॥ जारिणीस काय सांगोनि फळ ॥ धर्मशास्त्र श्रवण रसाळ ॥ वाटपाडयासी कायसें ॥५६॥गिरिमस्तकीं वर्षें जलधर ॥ परी तेथें अणुमात्र न राहे नीर ॥ तैसा बोधिला अंधकुमार ॥ नव्हेचि स्थिर बोध तेथें ॥५७॥नित्य दुग्धें न्हणिला वायस ॥ परी कदा नव्हे राजहंस ॥ कीं दह्यांमाजी कोळसा बहु दिवस ॥ ठेवितां उजळ नव्हेचि ॥५८॥हरळ शिजविलें बहुकाळ ॥ परी कदा नव्हे मवाळ ॥ परीस नेऊनि अमोल ॥ खापरासी घांसिला ॥५९॥षोडशोपचारें पूजिलें प्रेत ॥ तें जैसें सर्व गेलें व्यर्थ ॥ तैसा बोधिला कौरवनाथ ॥ परी तो नायके सर्वथा ॥६०॥निर्बळाहातीं दिधलें शस्त्र ॥ बोरीवर घातलें दिव्यवस्त्र ॥ कीं अत्यंत दिव्य मंत्र ॥ अपवित्रासी सांगितला ॥६१॥दुग्ध उकरडां ओतिलें ॥ कीं मसणीं मंडप दिधलें ॥ कीं मृगमदें लेपिलें ॥ टोणग्याचें अंग जैसें ॥६२॥सभेसी बैसले ऋषीश्वर ॥ त्यांत बोलता जाहला रेणुकापुत्र ॥ जेणें धरणी हे सर्वत्र ॥ केली निःक्षत्रिय जाण पां ॥६३॥तो कल्याण राम होय बोलता पूर्वीं दंभोद्भव राजा होता ॥ तेणें गर्व केला तत्त्वतां ॥ मीच योद्धा रणपंडित ॥६४॥मृगयेसी गेला तो नृपवर ॥ तों द्दष्टीं देखिला ताप सभार ॥ नमन न करितां तो पामर ॥ गर्वेंकरूनि पुसतसे ॥६५॥मज योद्धा दाखवा कोणी ॥ तों ऋषी बोलिले तये क्षणीं ॥ नरनारायण बररीवनीं ॥ तप करिती तेथें जाईं ॥६६॥मग दळभाराशीं तो दुरात्मा ॥ आला नरनारायणा श्रमा ॥ म्हणे मागणें एक तुम्हां ॥ तेंचि सत्वर देइंजे ॥६७॥अवश्य म्हणती नरनारायण ॥ तरी उठा युद्ध करा दोघे जण ॥ ते म्हणती सिद्ध करीं सकळ सैन्य ॥ शस्त्र धरून उभा ठाकें ॥६८॥सैन्यासह तो शतमूर्ख पूर्ण ॥ वर्षता जाहला असंख्य बाण ॥ नरें मुष्टिभर दर्भ घेऊन ॥ झुगारिले तयावरी ॥६९॥त्रुटि न वाजतां साचार ॥ जाहला सर्व सैन्याचा संहार ॥ एकला उरला तो नृपवर ॥ शरण आला तयांसी ॥७०॥मग प्राणदान देऊन ॥ सोडिला तिंहीं कृपा करून ॥ तेचि हे नरनारायण कृष्णार्जुन ॥ अवतार पुरुष देघेही ॥७१॥आपुलें कल्याण इच्छीतसां जर ॥ तरी त्यांसीं मैत्री करा सत्वर ॥ जों रथीं चढला नाहीं वीर ॥ कपिवर ध्वज प्रतापी ॥७२॥सच्चिदानंद नीलगात्र ॥ अर्जुना पुढें शतपत्रनेत्र ॥ सारथ्य न करी तंव सत्वर ॥ करा मैत्री त्वरेनें ॥७३॥ऐसें बोलतां जामदग्न्य ॥ संतोषले सकळ संत सज्जन ॥ यावरी कण्वऋषि सज्ञान ॥ सुरस वचन बोलत ॥७४॥गांडीव धनुष्य अक्षय्य भाते ॥ पूर्वीं रचिले विष्णु सुतें ॥ ते प्राप्त जाहले पार्थातें ॥ पूर्व दत्तेंकरूनियां ॥७५॥पंच देवांचे अवतार ॥ हे पांचही पंहुपुत्र ॥ एक यमधर्म साचार ॥ लोक प्राणेश दूसरा ॥७६॥तिसरा साक्षात पुरंदर ॥ दोघे जाण अश्चिनी कुमार ॥ तेचि हे पांच दिवाकर ॥ पंडुपुत्र जाण पां ॥७७॥तरी दुर्योधना ऐकें लवलाहीं ॥ उपलव्या प्रति तूंचि जाईं ॥ पांचही पार्थ घेऊनि येईं ॥ निर्मत्सर होऊ नियां ॥७८॥आणि कही बहु संतीं ॥ दुर्योधनासी सांगितली नीती ॥ मग तो भृकुटीस घालोनि आंठी ॥ क्रोधें संतप्त बोलत ॥७९॥मांडी थापटूनि सुयोधन ॥ बोले कर्णाकडे पाहोन ॥ कैचा तूं आम्हां सांगसी ज्ञान ॥ तुवां अनुष्ठान करावें ॥८०॥नारद म्हणे दुर्योधना ॥ शरण रिघें श्री कृष्ण चरणा ॥ आग्रह करितां विघ्ना ॥ वरपडा तूं होसील ॥८१॥अंध म्हणत जगज्जीवना ॥ हा पुत्र माझें ऐकेना ॥ मदोन्मत्त नावरे कवणा ॥ दुष्टवचना बोलतो ॥८२॥दुर्योधन म्हणे कृष्णासी ॥ तूं शिष्टाई करूं आलासी ॥ आमुचे घरीं न राहसी ॥ न जेविसी काय म्हणोनी ॥८३॥त्यजोनियां भीष्म द्रोण ॥ माझें उपेक्षूनि सदन ॥ विदुर कुटिल दासी नंदन ॥ त्याचे गृहीं जेविलासी ॥८४॥मग बोले राजीवनेत्र ॥ विदुरा ऐसा कोण पवित्र ॥ त्रिकाल ज्ञानी पंडित चतुर ॥ तयासी शूद्र म्हणेल कोण ॥८५॥भगवद्भक्तां अनन्य शरण ॥ तो शूद्र होत्साता परम पावन ॥ राक्षसांमाजी बिभीषण ॥ प्रर्हाद जाण दैत्यांत ॥८६॥किरातांमाजी गुहक प्रसिद्ध ॥ अंत्यजांमाजी धर्मव्याध ॥ सत्यतुलनी नामें शुद्ध ॥ वणिक भक्त जाहला ॥८७॥श्रीधर म्हणे श्रोतयांला ॥ कलियुगीं अजामेळ चोखा भोळा ॥ कबीर प्रिय हा विठ्ठलाला ॥ नाहीं जातीवरी प्रमाण ॥८८॥मज रिघाला जो अनन्य शरण ॥ तो शूद्र हो अथवा ब्राह्मण ॥ मज मुख्य भक्ति प्रमाण ॥ नाहीं कारण ज्ञातीसी ॥८९॥अभक्त बाह्मण कपटी दुष्ट ॥ तो अंत्यजाहूनि पापी वरिष्ठ ॥ मम द्वेषी सर्वथा भ्रष्ट ॥ विटाळ त्याचा न व्हावा ॥९०॥विदुराचा बहुत आदर ॥ देखतां निवालें माझें अंतर ॥ भोजन गतजीर्ण साचार ॥ आदर अजरामर असे पैं ॥९१॥मम भक्तास ठेविसी दूषण ॥ कोणाचें कुळ निर्दोष जाण ॥ तूं निजकुळ पाहें विचारून ॥ बोलतां दारूण निंदा घडे ॥९२॥उर्वशीगर्भ संभूत ॥ वसिष्ठ ब्रह्म पुत्र विख्यात ॥ परम तपें पावला ब्रह्मत्व ॥ जाती तेथें कायसी ॥९३॥हरिणी गर्भा पासून ॥ ऋष्य श्रृंग जाहला निर्माण ॥ जेणें दशर थाचा करूनि यज्ञ ख्याती केली त्रिभुवनीं ॥९४॥धीवरी पासोनि जनन ॥ तो महाराज कृष्ण द्वैपायन ॥ तुझे वडील तिघे जण ॥ त्याचे नंदन विचारीं हें ॥९५॥विदुराशीं लाविसी दोष ॥ तरी सत्वरचि पावसी नाश ॥ माझे बोल वाटती विष ॥ परी पुढें अमृता समान ॥९६॥औषध आधीं कडवट पूर्ण ॥ परी पुढें करी रोग हरण ॥ तैसीं माझीं वचनें जाण ॥ दूःखमोचक सुयोधना ॥९७॥जैसी नाबद साखर ॥ मुखीं घालितां घालितां खडखडे फार ॥ परी पुढें गोडी अपार ॥ वचनें साचार माझी तैसीं ॥९८॥तुरट वाटे आमलक ॥ परी पुढें गोडी अधिक ॥ तेवीं माझीं वचनें दुःख नाशक ॥ ह्रदयीं धरीं रे आवडीनें ॥९९॥पिता पढवी पुत्रा लागून ॥ त्यासी तें वाटे विषासमान ॥ परी पुढें गोड अमृताहून ॥ महिमा जाण वाढे तेव्हां ॥१००॥सुपुत्रासी द्दष्टांत ॥ दीपाचा देती पंडित ॥ परी तो एक देशी निश्चित ॥ प्रकाशत्वे करू नियां ॥१०१॥दीप क्षणोक्षणीं जाळी गुण ॥ सत्पुत्र करी सद्नुण वर्धन ॥ दीप स्नेह टाकी आटवून ॥ काळिमा लावी सर्वांसी ॥१०२॥सुपुत्रा पासूनि निर्धारें ॥ सुटती बहुत स्नेहाचे झ्ररे ॥ दीप स्थळ एक सरें ॥ चहूंकडे काळें करी ॥१०३॥हा बैसे जेथें तेथें सोज्ज्वळ ॥ यशा ऐसें करी उज्ज्वळ ॥ दीप लागे तेथें जाळी सकळ ॥ सुपुत्र शीतळ सर्वांसी ॥१०४॥दीप पात्रासी करी तप्त ॥ सुपुत्र सत्पात्रासी निववीत ॥ दीप पात्रा मेणी लावीत ॥ कोणी न धरीत हातीं तें ॥१०५॥हा आपुलें स्ववंशपात्र ॥ उजळ करी सप्तगोत्र ॥ दीपासी काजळी ये सत्वर ॥ उबारा निरंतर करीतसे ॥१०६॥दीपाची मैत्री क्षणैक पाहतां ॥ स्नेह सरतां न राहे तत्त्वतां ॥ जीवन वरी टाकितां ॥ तडतड न सोसे ॥१०७॥वायु लागतां किंचित ॥ डळमळोनि जाय क्षणांत ॥ सुपुत्र सर्व गुणीं भरित ॥ विपरीत नसे एकही ॥१०८॥दीपाचे पोटीं निपजावें रत्न ॥ तेथें काजळ होय कुलक्षण ॥ परी सुपुत्रा पासून ॥ भक्त सज्ञान उपजे पैं ॥१०९॥तरी दीपासारिखाचि दुर्जन ॥ क्षणोक्षणीं जाळीत गुण ॥ स्नेह टाकी आटवून ॥ काळिमा लावी सर्वांसी ॥११०॥जेथें बैसे तेथें जाळीत ॥ सत्पात्रासी न करी तृप्त ॥ स्ववंशीं डाग लावीत ॥ मेणी तेचि अमंगळ ॥१११॥अखंड काजळी पोटांत ॥ नावडे जीवनशास्त्रार्थ ॥ बैसे तेथें उबारा करीत ॥ न शके देखों कोणासी ॥११२॥न सोसे सत्समाग मवारें ॥ डळमळितां जाय त्वरें ॥ ऐकें दुर्योधना सादरें ॥ सुपुत्राचीं लक्षणें हीं ॥११३॥शरीर व्यर्थ प्राणा विण ॥ तारुण्याविण पंचबाण ॥ दये विण व्यर्थ ज्ञान ॥ शांती विण वैराग्य पैं ॥११४॥संपत्ति व्यर्थ धर्मा विण ॥ पंडिता विण सभा शून्य ॥ हरिणी विण व्यर्थ ॥ कानन ॥ दीपा विण सदन जेवीं ॥११५॥वेदांतज्ञानावांचून ॥ कोरडी व्युत्पत्ति व्यर्थ शून्य ॥ कीं सत्पात्र विण दान ॥ स्नेहा विण बंधु जैसा ॥११६॥जळा विण वापिका ॥ नृपा विण नगर देखा ॥ नासिकावांचूनि मुखा ॥ शोभा जैसी न येचि ॥११७॥फळा विण तरुवर ॥ नाम स्मरणा विण मंदिर ॥ तैसा सत्पुत्रा विण पवित्र ॥ वंश सर्वथा नव्हेचि ॥११८॥परमचतुर सुंदर ॥ मदना ऐसा व्हावा पुत्र ॥ जो प्रचंड प्रतापशूर ॥ ज्यासी जगत्रय धन्य म्हणे ॥११९॥जैसी वेदाज्ञा प्रमाण ॥ तैसे वंदी मातृपितृचरण ॥ निजांगें सेवा करी अनुदिन ॥ तो पुत्र धन्य संसारीं ॥१२०॥अपूर्व जी कां वस्त ॥ मातापित्यांसी आणूनि देत ॥ जोदिलें द्र्व्य न वेंचीत ॥ तो पुत्र धन्य संसारीं ॥१२१॥माझीं माता पिता वृद्ध केवळ ॥ वांचोत ऐसींच बहु काळ ॥ मानी जैसीं उमाजाश्वनीळ ॥ तो पुत्र धन्य संसारीं ॥१२२॥माता पिता गुरु देव ॥ येथें ज्याचा समान भाव ॥ नित्य नूतन आवडी अभिनव ॥ तो पुत्र धन्य संसारीं ॥१२३॥शुक्तिकेचे पोटीं मुक्ताफळ ॥ रंभागर्भीं कर्पूर निर्मळ ॥ गिर्युदरीं हिरा तेजाळ ॥ तैसा सुपुत्र संसारीं ॥१२४॥धन्य त्या पुत्राची जननी ॥ जिची कीर्ति मिरवे त्रिभुवनीं ॥ तेचि सर्वैश्वर्य खाणी ॥ ऐसा पुत्र प्रसवे जे ॥१२५॥इतरा शूकरी श्वानी देखा ॥ अपवित्र त्या निपुत्रिका ॥ पुढें भोगितील महानरका ॥ नाहीं सुटका तयांसी ॥१२६॥माता पिता घाली बाहेरी ॥ श्वशुरवर्ग सांठवी घरीं ॥ जो स्त्रीलंपत ॥ दुराचारी ॥ त्याचे भारें दुःखी धरा ॥१२७॥व्यर्थ काय करावे बहु सुत ॥ जैसे एक दांचि पडती जंत ॥ जो परम अविचारी उन्मत्त ॥ त्याचे भारें दुःखी धरा ॥१२८॥दारा कुमारां सर्व देत ॥ माता पिता यांसी दरिद्र भोग वीत ॥ कुशब्द बाणें ह्रदय भेदीत ॥ त्याचे भारें दुःखी धरा ॥१२९॥आपुली वस्तु पिता मागे ॥ त्यावरी डोळे फिरवी रागें ॥ म्हणे मी काय तुमचें ऋण लागें ॥ त्याचे भारें दुःखी धरा ॥१३०॥पिता सांगे हितावह बोधा ॥ म्हणे हा सन्निपात झाला वृद्धा ॥ ह्र्दय पोळे ऐशा बोले शब्दा ॥ त्याचे भारें दुःखी धरा ॥१३१॥म्हणे पिता माझा शतमूर्ख ॥ त्याहूनि मी अधिक चतुर देख ॥ मातेसी म्हणे करंटी शंख ॥ त्याचे भारें दूःखी धरा ॥१३२॥माता पिता दोघें जण ॥ मेलीं करितां अन्न अन्न ॥ मग करूं धांवे गया वर्जन ॥ याचे भारें दुःखी धरा ॥१३३॥असतां न बोले धड वचन ॥ करविलें नाहीं उदक पान ॥ मग लोकांसी दावी करूनि तर्पण ॥ त्याचे भारें दुःखी धरा ॥१३४॥पुर्वीं केला अपमान ॥ मग श्रीद्धीं शत ब्राह्मण भोजन ॥ लटकें लोकां रडोन ॥ त्याचे भारें दुःखी धरा ॥१३५॥पितृवचनीं उपजे त्रास ॥ कुशब्द बोले मातेस ॥ सद्नुरूशीं करी द्वेष ॥ त्याचे भारें दुःखी धरा ॥१३६॥पितृवचनीं मानी दुःख ॥ मातेसी म्हणे कर्कशा देख ॥ स्त्रियेसी देत अत्य़ंत सुख ॥ तो अल्पायुष जाणावा ॥१३७॥सत्पुरुषाची करी निंदा ॥ अपमानी जो ब्रह्म वृंदा ॥ विद्या बळें प्रवर्ते वादा ॥ तो अल्पायुष जाणावा ॥१३८॥भक्त देखतां करी उपहास ॥ साधूंसी लावी नसते दोष ॥ सद्नुरूहूनि म्हणे मी विशेष ॥ तो अल्पायुष जाणावा ॥१३९॥निंदी सदा तीर्थक्षेत्रें ॥ असत्य मानी हरिहरचरित्रें ॥ निंदी वेद पुराणें शास्त्रें ॥ तो अल्पायुष जाणावा ॥१४०॥कायावाचामनें ॥ परपीडा हिंसा करणें ॥ भूतद्रोह करी जारण मारणें ॥ तो अल्पायुष जाणावा ॥१४१॥निंदी महापुरुषांचे ग्रंथ ॥ नसते काढी कुतर्कार्थ ॥ विद्यागर्वें सदा उन्मत्त ॥ तो अल्पायुष जाणावा ॥१४२॥माझे गुणा नुवादाचें कीर्तन ॥ अव्हेरी जो न करी श्रवण ॥ टाकी विष्णु भक्ति उच्छेदून ॥ त्यासी अधःपात सुटेना ॥१४३॥मी विष्णु भक्त मोठा ॥ म्हणेनि निंदी नीलकंठा ॥ तपखी देखोनि करी चेष्टा ॥ त्यासी अधःपात सुटेना ॥१४४॥म्हणवूनि शिव भक्त निर्मळ ॥ जो विष्णुनिंदा करी चांडाळ ॥ नसते कुमार्ग स्थापी खळ ॥ त्यासी अधःपात सुटेना ॥१४५॥होतां साधूचा अपमान ॥ संतोष वाटे मनांतून ॥ करी वृद्धांचें मान खंडन ॥ त्यासी अधःपात सुटेना ॥१४६॥सभेमाजी दुरुक्ति बोले ॥ जेणें भल्याचें ह्रदय उले ॥ जे सदा मत्सर विष्ठेनें माखले ॥ त्यांसी अधःपात सुटेना ॥१४७॥निर्नासिक आर शांत न पाहे ॥ तोंवरीच रूपा भिमान वाहे ॥ म्हणे माझ्या रूपासी तुलना न ये ॥ रतिवरही शोधितां ॥१४८॥असोत आतां हे बोल ॥ जो पितृवचन न करी सफळ ॥ तो अभागी केवळ ॥ महाखळ जाणावा ॥१४९॥ऐसीं दुर्जनांचीं लक्षणें ॥ म्हणोनि वर्जिलीं सज्जनें ॥ तयांसी रौरव वसति स्थानें ॥ निर्मिलीं असती चंद्रार्कवरी ॥१५०॥म्हणेनि ऐकें दुर्योधन ॥ समजावीं जाऊनि पंडुनंदनां ॥ घेऊनि येईं आपुले सदना ॥ धन्य त्रिभुवना माजी म्हणती ॥१५१॥ते तुम्ही बंधु मिळोन ॥ जिंका उर्वी हे संपूर्ण ॥ तूं कर्ण शकुनि दुःशा सन ॥ यांची बुद्धि ऐकूं नको ॥१५२॥त्या भीमाचा पुरुषार्थ ॥ ऐकिला कीं तुवां अत्युद्भुत ॥ हिडिंब बक किर्मीर बळवंत ॥ कीचक शत मारिले ॥१५३॥एकल्या अर्जुनें जाऊन ॥ अग्नीस दिधलें खांडव वन ॥ एकलेनें केलें गोग्रहण ॥ द्रौपदी एकलेनें जिंकिली ॥१५४॥एकलेनें गंधर्वां पासून ॥ तुम्हां आणिलें सोडवून ॥ निवात कवच मारून ॥ शक्रादि देवां तोषविलें ॥१५५॥ऐसें ते बल संपन्न ॥ त्यांसी तुम्हीं सख्य़ करून ॥ आणावें गृहा बोलावून ॥ एक होऊन सुख भोगा ॥१५६॥भीष्म म्हणे सुयोधना ॥ चित्त देईं श्री कृष्ण वचना ॥ घरा आणूनि पंडूनंदनां ॥ कुंभिनी सर्व जिंकावी ॥१५७॥बोलती शारद्वत द्रोण ॥ दुर्योधना तूं सुजाण ॥ न मोडीं भगवंताचें वचन ॥ कुलरक्षण करीं आतां ॥१५८॥विदुर म्हणे वडिलांचे वचना ॥ चित्त देईं दुर्योधना ॥ माय बाप दोघां जणां ॥ वृद्ध पणीं दुःख नेदीं ॥१५९॥युद्ध करूं नको यावरी ॥ दीन होतील धृतराष्ट्र गांधारी ॥ वृद्धपणीं कोणाचे द्वारीं ॥ लोळतील सांग पां ॥१६०॥अंध पक्षी पक्षहीन ॥ तैसीं दोघें होतील दीन ॥ तों धृतराष्ट्र बोले वचन ॥ ऐकें चतुरा सुयोधना ॥१६१॥श्रीकृष्णाची पूजा करून ॥ रिघें तयासी अनन्य शरण ॥ तुझी पाठी अर्जुनाहून ॥ रक्षील श्रीकृष्ण निर्धारें ॥१६२॥एकाचे खांडां एक हात घालून ॥ हिंडा कौरव पंडुनंदन ॥ एकचित्त मिळोन ॥ राज्य करा दोघेही ॥१६३॥श्रीकृष्णासी म्हणे दुर्योधन ॥ तयांनीं राज्य हारविलें खेळोन ॥ पुढें करूनि तिंहींच पण ॥ वनवासाप्रति गेले ॥१६४॥तूं त्यांचा पाठिराखा पाहीं ॥ आम्ही कवणा सही भीत नाहीं ॥ तूं मजला ठायीं ठायीं ॥ भेडसाविसी कासया ॥१६५॥सुईच्या अग्रीं मृत्तिका जाण ॥ तितुकी नेदीं मी युद्धा विण ॥ माझी सेना पहा दारुण ॥ क्षणांत आटीन पांडवां ॥१६६॥पांडव अत्यंत बलहीन ॥ स्त्री गांजिली सभे आणून ॥ क्षत्रिय असते तरी रण ॥ तेचि वेळे माज विते ॥१६७॥माझा अन्याय कांहीं ॥ मज सर्वथा वाटत नाहीं ॥ तुम्ही वृद्ध मिळूनि सर्वही ॥ मज कां देखों शकाना ॥१६८॥ऐसें ऐकतां वनमाळी ॥ आरक्तता नयनीं उदेली ॥ दुर्योधनासी ते वेळीं ॥ बोलता जाहला श्रीवल्लभ ॥१६९॥अरे मूढा बुद्धिहीना ॥ तुझा अन्याय तुज वाटेना ॥ सभेसी आणिली पांडवललना ॥ हा न्याय कीं अन्याय ॥१७०॥विष घालूनि मारिला भीम सेन ॥ लक्षा गृहीं लाविला अग्न ॥ घोषयात्रेच्या मिषें करून ॥ दरोडा घालूं पातलासी ॥१७१॥हा न्याय कीं अन्याय पाहीं ॥ साक्ष येते कीं तुझे ह्र्दयीं ॥ जेव्हां एकाएकीं पडसी पाहीं ॥ राज्य ते समयीं देसील ॥१७२॥कपिवर ध्वज देखसी नयनीं ॥ गांडीव ओढील पाकशा सनी ॥ तेव्हां आपणचि देसील मेदिनी ॥ न मागतां पांडवांसी ॥१७३॥गदा घेऊनि भीम सेन ॥ दुःशासनाचें ह्रदय करील चूर्ण ॥ शोषील कंठींचें रुधिर उष्ण ॥ राज्य जाण मग देसी ॥१७४॥भीष्म पहुडेल शरपंजरीं ॥ कर्णाचें शिर उडेल अंबरीं ॥ तेव्हां देसील हे सर्व धरित्री ॥ पंडुपुत्रांतें सहजचि ॥१७५॥दुर्यो धन आणि दशमुख ॥ देखिले अत्यंत शतमूर्ख ॥ गोग्रहण आणि वनभंग देख ॥ दखोनि सावध न होती ॥१७६॥अनिवार अर्जुनाचे बाणीं ॥ देह ठेवाल जेव्हां धरणीं ॥ मग आठवाल माझी वाणी ॥ प्राण त्याग कराल तेव्हां ॥१७७॥ दुःशा सन म्हणे दुर्योधना देख ॥ हे सभेचे सर्व जाहले एक ॥ अंध हा आमुचा जनक ॥ तोही मिळाल कृष्णकडे ॥१७८॥मी तूं शकुनि आणि कर्ण ॥ चौघांसी क्षणांत आकळून ॥ देतील पांडवांहातीं बांधोन ॥ हें वर्तमान दिसे पुढें ॥१७९॥क्रोधयुक्त दुर्यो धन ॥ कालसर्पापरी क्षोभला दारुण ॥ आपुले दुर्जन संगें घेऊन ॥ सभेमधून ऊठला ॥१८०॥गंगात्मज म्हणे हा चांडाळ ॥ कुल संहारिलें येणें सकळ ॥ श्रीकृष्ण म्हणे हा बुडेल ॥ स्वकुल राज्या समवेत ॥१८१॥हे चौघे दुर्जन बांधोन ॥ ठेवावे पांडवांपुढें नेऊन ॥ क्षत्त्यासी म्हणे अंविकानंदन ॥ जा सौबलीस घेऊन ये ॥१८२॥क्षण न लागतां गांधारी ॥ विदुरें आणिली सभेभीतरी ॥ दुर्योधन तिणें ते अवसरीं ॥ माघारा आणिला सभेतें ॥१८३॥गांधारी म्हणे सुयोधना ॥ ऐकें श्रीकृष्णा चिया हितवचना ॥ स्वकुल वांचवीं सुजाणा ॥ पांडुनंदनां बोलावूनी ॥१८४॥माझें न ऐकसी वचन ॥ तरी बंधू सहित पावसी मरण ॥ माझें अन्यथा नव्हे भाषण ॥ आठविसी प्राण त्यागितां ॥१८५॥न मानिसी वडिलांचें वचन ॥ न रिघसी श्रीकृष्णासी शरण ॥ तरी जय आणि कल्याण ॥ प्राप्त नाहीं तुम्हांसी ॥१८६॥अव्हेरूनि मातेचें वचन ॥ पुढती दुर्योधन जाय उठोन ॥ मिळोनि चौघे दुर्जन ॥ गुज बोलती एकांतीं ॥१८७॥या कृष्णासीच धरून ॥ करावें एथें द्दढ बंधन ॥ मग पांडव बलक्षीण ॥ शरण येतील आम्हांतें ॥१८८॥त्या चौघांचें अंतर्ज्ञान ॥ सात्यकीस कळलें वर्तमान ॥ जैसा तरु सुमनावरून ॥ चतुर नर ओळखिती ॥१८९॥चंचल द्दष्टीवरून ॥ जाणिजे जारतस्करांचें चिन्ह ॥ कीं स्वाद घेतां रस पूर्ण ॥ चतुर जेवीं ओळखे ॥१९०॥कृतवर्म्यासी सात्यकी सांगत ॥ सेना सिद्ध करीं तूं त्वरी त ॥ सभाद्वार धरूनि समस्त ॥ चौघे दुर्जन धरितों मी ॥१९१॥धृतराष्ट्र भीष्म विदुर ॥ अवघ्यांसी कळला समाचार ॥ यावरी स्वर्धुनी पुत्र पुण्य पवित्र ॥ गर्जोनि बोले तेधवां ॥१९२॥घुंघुर्डें कोपोनि म्हणत ॥ सगळाचि ग्रासीन आतां पर्वत ॥ वृश्चिक स्वपुच्छें त्वरित ॥ ताडीन म्हणे खदिरांगारा ॥१९३॥हा श्रीकृष्ण तमालनील ॥ तोषलिया सर्व करी मंगल ॥ कोपल्या होय प्रलयानल ॥ भस्म करील ब्रह्मांड हें ॥१९४॥श्रीकृष्ण चंडाशु देख ॥ त्यासी धरूं पाहे दुर्योधन मशक ॥ श्रीरंग भुजंग भयानक ॥ त्यासी हा मूषक आकळूं पाहे ॥१९५॥श्रीकृष्ण म्हणे दुर्योधना ॥ मशका दुर्जना खळा मलिना ॥ तुज सहित तुझी पृतना ॥ एथेंचि जाळीन क्षणार्धें ॥१९६॥खद्योत आपुल्या तेजें करूनी ॥ पाडीन म्हणे वासरमणी ॥ कीं सिंहापुढें येऊनी ॥ मार्जारें उड्डाण मांडिलें ॥१९७॥रासभें ब्रीद बांधोन ॥ तुंबरू पुढें मांडिलें गायन ॥ तैसा तूं दुर्योधन ॥ धरूं इच्छिसी आम्हांतें ॥१९८॥धृतराष्ट्र म्हणे विदुरा ॥ आणीं त्या दुर्योधना पामरा ॥ तेणें धांवोनि सत्वरा ॥ पित्या जवळी आणिला ॥१९९॥धृतराष्ट्र म्हणे दुर्योधना ॥ तुवां हें कर्म आणिलें मना ॥ तूं कृष्ण महिमा नेणसी दुर्जना ॥ महामलिना निष्ठुरा ॥२००॥जेणें बाळपणीं खेळतां खेळ ॥ दैत्य मारिले परम सबळ ॥ मुष्टिक चाणूर कंसादि शिशुपाळ ॥ संहारिले क्षणार्धें ॥२०१॥सत्रा वेळ जेणें राज संध ॥ धरोनि बांधिला सुबद्ध ॥ भौमा सुर मर्दिला प्रसिद्ध ॥ ललना षोडश सहस्त्र वरियेल्या ॥२०२॥स्वयंवरीं रुक्मिया विटंबून ॥ युद्धीं सोडिला जर्जर करून ॥ त्या श्रीकृष्णासीं द्वेष धरून ॥ तूं काय करिसी पामरा ॥२०३॥श्रीरंग म्हणे दुर्योधना ॥ सहपरिवारें ऊठ मलिना ॥ एकलाचि मी एथें जाणा ॥ आटीन सर्वां क्षणार्धें ॥२०४॥श्रीकृष्णा कडे पाहे दुर्योधन ॥ तों स्वरूप देखिलें देदीप्यमान ॥ सकल देवताचक्र मिळोन ॥ अवय वरूपें ॥२०५॥हस्ताचे ठायीं दिसे इंद्र ॥ अंतःकरणीं उभा उपेंद्र ॥ अहंकाररूपें रुद्र ॥ देदीप्या मान देखिला ॥२०६॥नेत्रीं दिसती द्वादश मित्र ॥ मनोरूप दिसे रोहिणीवर ॥ दंतदाढा सूर्य पुत्र ॥ सहपरिवारें दिसतसे ॥२०७॥मुखीं भासे प्रल्याग्न ॥ जिव्हा रूप दिसे वरुण ॥ बुद्धीच्या ठायीं चतुरानन ॥ देदीप्य मान देखिला ॥२०८॥दुर्योधन पाहे न्याहाळून ॥ तों पाठीसीं उभे पंडुनंदन ॥ गांडीव गदा घेऊन ॥ भीमार्जुन सक्रोध ॥२०९॥छप्पन्न कोटी यादववीर ॥ साठ लक्ष कृष्ण कुमार ॥ शस्त्रें घेऊनि महाशूर ॥ पाठीसी उभे देखिले ॥२१०॥एकादशा रुद्र द्वादश मित्र ॥ अष्टौ लोक पाल त्रिदश समग्र ॥ गंधर्वां सहित कुबेर ॥ उभे किन्नर शस्त्रांशीं ॥२११॥श्रीकृष्णाचे नेत्रांमधून ॥ ज्वाला निघती अतिदारुण ॥ झांकले सकळांचे नयन ॥ दुर्योधन मूर्च्छना पावला ॥२१२॥भीष्म द्रोण शारद्वत विदुर ॥ हेचि पाहती स्वरूप सादर ॥ वरकडांचे झांकले नेत्र ॥ शक्ति न होय पहावया ॥२१३॥देव दुंदुभि वाजविती ॥ दिव्यपुष्पवर्षाव होती ॥ ऋषी कर जोडूनि उभे ठाकती ॥ स्ववन करिती वेदोक्त ॥२१४॥विदुरमुखें वर्तमान ॥ धृतराष्ट्रें श्रवण करुन ॥ उभा ठाकोनि करीत स्तवन ॥ देईं नयन मज हरी ॥२१५॥तुज पाहीन धणीभरी ॥ ऐसें ऐकतां कंसारी ॥ दिव्य नयन ते अवसरीं ॥ धृतराष्ट्रासी दीधले ॥२१६॥अंधत्व जाऊनि उघडले नयन ॥ आश्चर्य करिती सभाजन ॥ धृतराष्ट्र पाहे विलोकून ॥ तेज अद्भुत मुकुंदाचें ॥२१७॥ज्या तेजामाजी निश्चितीं ॥ चंद्र सूर्य बुचकळ्य़ा देती ॥ सहस्त्र चपलांचे भार लपती ॥ एकएका नखांकुरीं ॥२१८॥कोटयनुकोटी मीनकेतन ॥ सांडणें होत नखांवरून ॥ मुकुट तेजें करून ॥ ब्रह्मांड हें उजळलें ॥२१९॥ऐसें धृतराष्ट्रासी दाखवून ॥ मागुती झांकिले त्याचे नयन ॥ जैसें ज्ञान ॥ प्रकटतां मायावरण ॥ साधकांवरी बळें पडे ॥२२०॥पूर्ववत जाहला जगन्नायक ॥ कृतवर्मा आणि सात्यकी देख ॥ त्यांचे कर धरूनि कमलोद्भव जनक ॥ तेथून उठोनि चालिला ॥२२१॥नारदादि ऋषि जन ॥ तेथेंचि पावले अंतर्धान ॥ एकचि कोल्हाळ जाहला पूर्ण ॥ बैसे श्रीकृष्ण रथावरी ॥२२२॥पृथेंचे गृहा जाऊन ॥ सांगितलें सर्व वर्तमान ॥ म्हणे पांडवांहातीं अंधनंदन ॥ सहारितों यापुढें ॥२२३॥खगवरकेतन यावरी ॥ गेला हस्तिनापुरा बाहेरी ॥ दुर्योधनासी ते अवसरीं ॥ धृतराष्ट्र क्रोधें बोलत ॥२२४॥पायीं ज्योतिर्लिंग ताडिलें ॥ कीं अमृतें संमार्जन केलें तैसें दुर्जना त्वां केलें ॥ गर्वमदेंकरूनियां ॥२२५॥असो भीष्म द्रोण शारद्वत ॥ गेले श्रीकृष्णासी बोळवीत ॥ चौघे वेगळे करोनि समस्त ॥ श्रीरंगामागें धांवती ॥२२६॥सकळांसी म्हणे श्रीपती ॥ देखिली कीं येथींची रीती ॥ यावरी बोल नाहीं आम्हां प्रती ॥ साक्ष समस्तीं असावें ॥२२७॥दुर्योधनें पाठविला कर्ण ॥ नगरा बाहेर गेला कृष्ण ॥ तेथें भीष्म द्रोण अवघे मिळोन ॥ विचार करिती काय पहा ॥२२८॥तों भीष्मद्रोणादि सर्व भूभुज ॥ यांसी निरोप देत अधोक्षज ॥ कर्णासी खुणावूनि यादवराज ॥ बैसवीत आपुले रथीं ॥२२९॥यावरी तो रुक्मिणीपती ॥ कर्णाशीं विचार करील एकांतीं ॥ ते कथेची कौतुकरीती ॥ पुढील अध्यायीं परिसिजे ॥२३०॥भारती कथा सुरसा बहुत ॥ पंढरीनाथ पुरविता साहित्य ॥ परिसोत ज्ञानी पंडित ॥ अत्यादरें करोनियां ॥२३१॥पांडवप्रताप ग्रंथ प्रयाग ॥ भक्ति ज्ञान आणि वैराग्य ॥ हेचि त्रिवेणी सांग ॥ प्रवाहरूपें जातसे ॥२३२॥प्रेममाघमासीं साचार ॥ एथें स्नानास येती सभाग्य नर ॥ स्नानदान करितां अपार ॥ भस्म होती पातकें ॥२३३॥अठरा पर्वांत साचार ॥ उद्योगपर्व सुरस फार ॥ बोलिल सत्यवती कुमार ॥ वैशंपायनाचे मुखें ॥२३४॥या ग्रंथाचा कर्ता निश्चित ॥ स्वयें असे पंढरीनाथ ॥ तो जे जे शब्द सांगत ॥ ते ते एथें लिहिले म्यां ॥२३५॥तो सांगेल तेंचि करावें ॥ बोलेल तेंचि पत्रीं लिहावें ॥ तो न सांगे तरी बैसावें ॥ उगेंचि लेखनी धरोनियां ॥२३६॥ब्रह्मानंदा पंढरीनाथा ॥ पुढें बोलवीं रसाळ कथा ॥ लोक वदती तुज तत्त्वतां ॥ श्रीधरवरद म्हणोनी ॥२३७॥आदिमध्यावसानीं अभंग ॥ अवघा तूंचि श्रीरंग ॥ ब्रह्मानंदा अव्यंग ॥ श्रीधर बालक तुझें कीं ॥२३८॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ उद्योगपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकुणचाळिसाव्यांत कथियेला ॥२३९॥इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे उद्योगपर्वणि श्रीकृष्णशिष्टाईवर्णनं नाम एकोनचत्वारिंशाध्यायः ॥३९॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥शुभं भवतु ॥॥ श्रीपांडवप्रताप उद्योगपर्व एकोनचत्वारिंशाध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP