मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ४५ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ४५ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ४५ वा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ जो सच्चिदानंद कमलापती ॥ तो जाहला पार्थाचा सारथी ॥ जो निजभक्तांचे मनोरथीं ॥ बैसोनि सूत्रें हालवी ॥१॥मारोनियां भगदत्त ॥ विजय विजयी जाहला अद्भुत ॥ यावरी समसप्तकांकडे रथ ॥ चाल विला त्वरेनें ॥२॥मिळाले त्रिगर्त समसप्तक ॥ सुशर्मा त्यांत असे मुख्य ॥ वेगळें युद्धबंड देख ॥ अनर्थकारक ओढवलें ॥३॥युद्धास गोंविला अर्जुन ॥ इकडे काय जाहलें वर्त मान ॥ चक्रव्यूह गुरु द्रोण ॥ रचिता जाहला अद्भुत ॥४॥सुपर्णव्य़ूह पांडव रचीत ॥ धर्मासी अवघेचि रक्षीत ॥ युद्ध मांडलें अद्भुत ॥ द्रोणा आणि भीमाशीं ॥५॥नकुल सहदेव पांचाळ ॥ अवघे युद्ध करिती तुंबळ ॥ परी चक्रव्य़ूह भेदावया बळ ॥ कोणा सही दिसेना ॥६॥धर्म म्हणे असता पार्थ ॥ तरी हा व्यूह भेदिता निश्चित ॥ तों पुढें येऊनि सुभद्रासुत ॥ अभिमन्यु विनवीतसे ॥७॥ताता मज आज्ञा द्याल जरी ॥ तरी हा व्य़ूह भेदीन निर्धारीं ॥ धर्म म्हणे ते अवसरीं ॥ तूं बाळक सुकुमार ॥८॥मग बोले पार्थनंदन ॥ आम्हां क्षत्रियांचें रण तेंचि धन ॥ ताता तुमचे दयें करून ॥ व्यूह फोडून जाईन ॥९॥परम सुंदर सुभद्रा सुत ॥ रूपासीं तुळितां उणा मन्मथ ॥ दुसरा कृष्णचि मूर्तिमंत ॥ विराटजा मात तो होय ॥१०॥घनश्या मवर्ण राजीव नयन ॥ आजा नुबाहु सुहास्य वदन ॥ जो पांडवांसी प्राणांहून ॥ आवडता पांचां सही ॥११॥ऐसा तो उत्तरावर ॥ रथावरी चढला सत्वर ॥ उदयाद्रीवरी दिनकर ॥ तैसा सुंदर दिसतसे ॥१२॥केला धर्मासी नमस्कार ॥ युद्ध निघाला पार्थ कुमार ॥ तों एकशत राज पुत्र ॥ व्यूह पूर्ण रक्षिती ॥१३॥व्य़ूह भेदीत जाय सौभद्र ॥ दहा सहस्त्र मारिले कुंजर ॥ एक अयुत महावीर ॥ अश्वांसहित पाडिले ॥१४॥एक अयुत महारथी ॥ तत्काळ पाडी उत्तरा पती ॥ जेथें शंभर राज पुत्र रक्षिती ॥ त्या स्थळासी पातला ॥१५॥दळासमवेत राज कुमार ॥ एकल्यावरी सोडिती शर ॥ परी तो आनकदुंदुभीकन्या कुमार ॥ तितुके तोडी क्षणमात्रें ॥१६॥तितुक्यांचेंही बाण जाळ ॥ एका शरें छेदी सुभद्रा बाळ ॥ जैसें उगवतां सूर्य मंडळ ॥ भगणें सर्व लोपती ॥१७॥एक उठतां विनायक ॥ असंख्य संहरी दंदशूक ॥ कीं सुटतां चंडवात देख ॥ जलद जाल वितुळे पैं ॥१८॥कीं विष्णुनामें करून ॥ असंख्य दुरितें जाती जळोन ॥ कीं चेततां कृशान ॥ असंख्य वनें दग्ध होती ॥१९॥कीं मूढाचें वाग्जाळ समस्त ॥ एकाचि शब्दें खंडी पंडित ॥ एक सिंह गज बहुत पाडती गतप्राण होऊनि ॥२०॥ह्रदयी प्रकटतां बोध ॥ सहपरिवारें पळती काम क्रोध ॥ कीं प्रत्यया येतां ब्रह्मानंद ॥ क्षुद्रानंद विरघळती ॥२१॥तैसा एकलाचि धनंजय कुमार ॥ परी सैन्य केलें अवघें जर्जर ॥ कोणी वरी उचलितांचि कर ॥ शस्त्रा सहित भुजा छेदी ॥२२॥दुर्योधन पुत्र जो लक्ष्मण ॥ त्यासीं युद्ध केलें निर्वाण ॥ घेतला तत्काळ प्राण ॥ शिर उडवून पाडिलें ॥२३॥पृथक् पृथक् युद्ध केलें ॥ शतही राज पुत्र पाडिले ॥ अष्ट कौरव मारिले ॥ सुयोधनाचे बंधु पैं ॥२४॥बाण सोडीत धांवला कर्ण ॥ तों दों बाणीं भेदिले त्याचे कर्ण ॥ अंग टाकूनि भानुनंदन ॥ पळता जाहला एकीकडे ॥२५॥दश बाणीं सुयोधन खिळिला ॥ द्रोण पंच बाणीं विंधिला ॥ जयद्रथ पळविला ॥ एकाचि बाणें करूनी ॥२६॥अश्वत्थामा कृपाचार्य ॥ हेही पळती गतवीर्य ॥ देखोनि अभिमन्य़ूचें शौर्य ॥ द्रोण मस्तक डोलवी ॥२७॥पूर्ण होय हा प्रत्यर्जुन ॥ ऐसें बोले गुरु द्रोण ॥ तों क्रोधें संतप्त दुर्योधन ॥ आचार्या प्रति बोलत ॥२८॥जैसा मदें मातला सूकर ॥ जिव्हेनें चोखितां छेदी जिव्हार ॥ तैसा तूं आमुचा हितकर ॥ पहसी क्षुद्र सर्वदा ॥२९॥माझा प्रिय पुत्र लक्ष्मण ॥ येणें मारिला न लागतां क्षण ॥ अजूनि काय पाहतां निर्वाण ॥ घ्यावा प्राण आजि याचा ॥३०॥व्य़ूहीं सांपडला पार्थ कुमार ॥ तों सहा जण महावीर ॥ सोडिते जाहले निर्वाण शर ॥ एकलिया बाल कावरी ॥३१॥सुकुमार तो सौभद्र ॥ एकल्या हाणिती महावीर ॥ चहूंकडे पाहे तो सुंदर ॥ आपुलें कोणी दिसेना ॥३२॥असता जरी पिता अर्जुन ॥ तरी साह्य करिता येथें पूर्ण ॥ जयद्रथ असे व्य़ूहद्वार धरून ॥ शिववरद तो नाटोपे ॥३३॥आकांत झाला पांडवदळीं ॥ जवळी नाहीं पार्थ वनमाळी ॥ व्यूह फोडी ऐसा बळी ॥ कोणी नाहीं पांडवांत ॥३४॥युद्ध करितां अभिमन्य ॥ कर्णें सोडिले निर्वाण बाण ॥ हातींचें धनुष्य तोडून ॥ बाण भाता छेदिला ॥३५॥सारथी घोडे ते वेळे ॥ द्रोणाचार्यें मारिले ॥ मग अभिमन्य़ूनें खडग घेतलें ॥ रथावरूनि उतरला ॥३६॥जैसी वीज लवूनि जाये ॥ तैसा अभिमन्य़ु तळपताहे ॥ तों दुर्यो धनें लवलाहें ॥ खडग छेदिलें हातींचें ॥३७॥मग गदा घेऊनि पार्थसुत ॥ अमित वीरांतें पाडीत ॥ तों दुःशासनें त्वरित ॥ गदा छेदिली हातींची ॥३८॥मग घेतलें रथचक्र ॥ तळपतसे सुभद्रा कुमार ॥ जैसा श्रीकृष्ण चक्रधर ॥ तैसा वीर दिसतसे ॥३९॥कर्ण द्रोण दुर्योधन ॥ सोडिती बाणा पाठीं बाण ॥ हातींचें रथचक्र जाण ॥ अश्वत्थाम्यानें छेदिलें ॥४०॥तों दुःशासन पुत्र दौःशासनी ॥ वेगें आला गदा घेऊनी ॥ अभिमन्य़ूनें तये क्षणीं ॥ गदा घेतली दूसरी ॥४१॥दोघीं गदायुद्ध मांडिलें ॥ सकलीं बाण जाळ घातलें ॥ दौःशासनीस केलें ॥ अभिमन्यूनें मूर्च्छित ॥४२॥सवेंचि दूःशासन सुतें ॥ हाणीतलें अभिमन्य़ूतें ॥ दोघेही पावले मूर्च्छेतें ॥ गदाघातें एक मेकां ॥४३॥मूर्च्छा सांवरोनि दौःशासनी ॥ वेगें आला गदा घेऊनी ॥ विकल सौभद्र पडला रणीं ॥ त्याचें मस्तकीं घातली ॥४४॥तेणें चूर्ण जाहलें शिर ॥ पडला पडला पार्थ कुमार ॥ तों आकाशवाणी वदे उत्तर ॥ धर्म युद्ध नव्हे हें ॥४५॥सकळ दळभार एकवटला ॥ भोंवता पहावया पाळा पडला ॥ त्यांत जय द्र्थें हाणीतला ॥ अभिमन्यु लाथेनें ॥४६॥द्रोणें धिक्कारिलें जय द्र्था ॥ दुर्जना वीरासी हाणिसी लत्ता ॥ त्या अभिमन्य़ूनें बाण सोडितां ॥ पळालासी त्वरेनें ॥४७॥कौरव गेले समस्त ॥ अभिमन्यु घायें विलपत ॥ श्रीहरीचें नाम स्मरत ॥ वाट पाहात पार्थाची ॥४८॥पांडवदळीं आकांत दारुण ॥ धर्म राज करी रोदन ॥ आतां येईल अर्जुन ॥ त्यासी वदन काय दाखवूं ॥४९॥दिवस गेला अस्तमानासी ॥ वधोनि येतां समसप्तकांसी ॥ अपशकुन पार्थासी ॥ मार्गीं येतां बहुत होती ॥५०॥धर्मा जवळी आला अर्जुन ॥ अवघे बैसले अधोवदन ॥ पार्थ पुसे कोठें अभिमन्य ॥ कां उत्साह मंदिरीं दिसेना ॥५१॥धर्म बैसला अधोवदन ॥ कां मौन धरी हो भीमसेन ॥ म्हणती संसार माया त्यागून ॥ अभिमन्यु गेला स्वर्गातें ॥५२॥रथाखालीं पडला अर्जुन ॥ पुत्रशोकें करी रोदन ॥ मग ॥ श्रीकृष्णें सांवरून ॥ सावध केलें पार्थातें ॥५३॥अर्जुन अवघ्यांसी धिक्कारीत ॥ जळो जळो रे तुमचा पुरुषार्य ॥ इतुके असतां माझा सुत ॥ कां पाठविला संग्रामा ॥५४॥अहो धर्म भीम माद्री सुत ॥ धिक् जळो तुमचा पुरुषार्थ ॥ हे विराट पांचाळ भूभुज समज ॥ धिक् जीवित हिंडतां ॥५५॥उपलव्य नगराहूनी ॥ उत्तरा सुभद्रा द्रौपदी धांवोनी ॥ येत्या जाहल्या तेचि क्षणीं ॥ ह्र्दय पिटिती अतिदुःखें ॥५६॥सुभद्रेनें आपुलें शरीर ॥ पृथ्वीवरी टाकिलें न धरवे धीर ॥ माझा अभिमन्यु सुकुमार ॥ दाखवा एकदां पाहीन मी ॥५७॥हे अभिमन्यो कमललोचना ॥ हे सौभद्रा चंद्रा वदना ॥ हे कोमलांगा मृदुभाषणा ॥ येवो नियां मज भेटें ॥५८॥हे बाळा घनश्यामवर्णा ॥ हे अभिमन्यो प्रत्यर्जुना ॥ महावीरा सुहास्य वदना ॥ ये धांवोनि मज भेटें ॥५९॥ हे मातुललक्षणा आकर्णनेत्रा ॥ हे आजा नुबाहु कोमल गात्रा ॥ हे यादवपांडव प्रिय करा ॥ वीरा उदारा धांवें कां ॥६०॥द्रौपदी म्हणे अभिमन्या ॥ हे वत्सा सद्नुणनिधाना ॥ तरुण तुझी बा अंगना ॥ उत्तरा आतां करील काय ॥६१॥हे किशोरा परमोदारा ॥ समरधीरा प्रतापशूरा ॥ पांडवकुलदीपा सुंदरा ॥ केली त्वरा सर्वां आधीं ॥६२॥सुभद्रा द्रौपदी शोक करीत ॥ उत्तरेच्या गळां मिठी घालीत ॥ तें देखोनि पार्थ रमाकांत ॥ शोकार्णवीं बुडाले ॥६३॥संसारमाया परम दुस्तर ॥ जो जगद्नुरु जगदुद्धार ॥ त्यासही दाटला गहिंवर ॥ सुभद्रादेवी देखोनि ॥६४॥पुर्ण ब्रह्म सनातन ॥ मायातीत शुद्ध चैतन्य ॥ परी समयाचा अभिप्राय पूर्ण ॥ नारायण दावीतसे ॥६५॥बोले सुभद्रा वेल्हाळ ॥ सांपडला व्यूहामाजी बाळ ॥ इतुके वीर ॥ असतां सबळ ॥ पाठी कोणी न राखेचि ॥६६॥विकल पडतां माझा किशोर ॥ जय द्रथें दिला लत्ता प्रहार ॥ धिकू गांडीव धिक् गांडीव धिक् तूणीर ॥ धिक् यदुवीर पार्थ पैं ॥६७॥यांही वेगळा अपरिमित ॥ धर्माचे शोकासी नाहीं अंत ॥ तों व्यास आणि ब्रह्म सुत ॥ नारद स्वामी प्रकटले ॥६८॥सर्वांचेंही समाधान ॥ करीत सत्यवती ह्रदय रत्न ॥ म्हणे सुभद्रे तूं सुजाण ॥ भगिनी होसी हरीची ॥६९॥वीर पत्नी वीर जननी ॥ वीर कुमारी यदुवीर भगिनी ॥ अभिमन्यु पडला समरां गणीं ॥ शोक न करीं तयाचा ॥७०॥व्रतें तपें तीर्थें करिती ॥ जे योग यागादि दानें देती ॥ त्यांहूनि या वीरा उत्तम गती ॥ वेदशास्त्रीं बोलिलीसे ॥७१॥विधियुक्त कोटी गोदान ॥ पर्व तातुल्य दिलें सुवर्ण ॥ समरीं वीर त्यजितां प्राण ॥ गति त्याहून तयासी ॥७२॥प्रयागीं आजन्म स्नाना ॥ करिती कुंभिन प्रदक्षिणा ॥ समरीं वीर त्यजितां प्राणा ॥ गति त्याहूनि तयासी ॥७३॥ऐका धर्म भीमार्जुना ॥ शोक करितां कोण्य़ा कारणा ॥ हे अवघी ब्रह्मांडरचना ॥ लया जाईल कल्पांतीं ॥७४॥आकारा आले जे जे पदार्थ ॥ तितुके माया मय नाशिवंत ॥ मिथ्या माया स्वन्पवत ॥ दीर्घद्दष्टीं विचारा ॥७५॥शुक्ति केवरी दिसे रजत ॥ स्थाणु असतां तस्कर दिसत ॥ दोर असतां भुजंग भासत ॥ मिथ्या भूत सर्वही ॥७६॥बहुतीं भोगिली हे जगती ॥ तितुकेही गेले मृत्यु पंथीं ॥ आतां आहेत पुढें होती ॥ सर्वही जाती चुकेना ॥७७॥गृह धन सुत वल्लभा ॥ दास दासी स्वजन प्रभा ॥ भास्कराची जलांत शोभा ॥ मिथ्या मय लटकीच ॥७८॥संसार हा दीर्घ स्वन्प ॥ व्यर्थ मी माझें म्णोन ॥ सावध व्हा उघडा नयन ॥ निज मानसीं विचारा ॥७९॥असो व्यासें सांगूनि बहुत कथा ॥ सावधान केलें कुंती सुतां ॥ नारद आणि श्रीशुकपिता ॥ अंतर्धान पावले ॥८०॥मग सुभद्रेसी म्हणे पार्थ ॥ उद्यांचि वधीन जय द्रथ ॥ कौरव दळ समस्त ॥ तृण वत सर्व जाळीन मी ॥८१॥हें जरी नव्हे माझेनी ॥ तरी व्यर्थ प्रसवली पृथा जननी ॥ डाग लागला कुरुवं शाला गोनी ॥ कृष्ण दास्य वृथा गेलें ॥८२॥कोठें पडला रणीं बाळ ॥ तो पहावया पार्थ घन नीळ ॥ निघते जाहले तत्काळ ॥ निशी माजी तेधवां ॥८३॥रथ वेगें चाल विला ॥ चंद्रज्योतीचा प्रकाश पडला ॥ रण शोधूं निघाला ॥ पार्थवीर तेधवां ॥८४॥अभिमन्यूनें रण पाडिलें देखोन ॥ आश्चर्य करिती कृष्णार्जुन ॥ बहुत केलें रन शोधन ॥ परी बाळ कोठें न सांपडे ॥८५॥तों मंजुळ श्रीहरीचें स्मरण ॥ ऐकता जाहला अर्जुन ॥ हे जगन्निवास मन मोहन ॥ मधु सूदन श्रीहरे ॥८६॥कृष्णा गोविंदा नारायणा ॥ अच्युता अनंता जगज्जीवना ॥ रमारमणा आनंद घना ॥ जना र्दना सर्वेशा ॥८७॥क्षीरसागर विहारा ॥ शेषशायी विश्वंभरा ॥ भक्त विसांविया श्रीधरा ॥ करुणा करा धांवें कां ॥८८॥ऐसे अभिमन्यूचे शब्द कोमळ ॥ अर्जुनें ओळखिले तत्काळ ॥ रथारूढ पार्थ घन नीळ ॥ आले जवळ धांवोनी ॥८९॥अभिमन्य़ूनें नेत्र उघडिले ॥ पार्थें अंग धरणीस घातलें ॥ अभिमन्य़ूस पोटाशीं धरिलें ॥ पार्थें मांडिलें शोकातें ॥९०॥अरे माझिया सुकुमारा ॥ बाळा अभिमन्या सुंदरा ॥ मजवांचूनि राज कुमारा ॥ कां आलासी रण भूमीं ॥९१॥अभिमन्यु स्मरत नामावळी ॥ जवळी आले कृष्ण वन माळी ॥ उकसा बुकसीं ते वेळीं ॥ पार्थ वीर स्फुंदत ॥९२॥पार्था चिया कानीं ॥ हळूचि अभिमन्यु बोले वाणी ॥ मी पडिलों घोर रणीं ॥ याचा खेद मज नाहीं ॥९३॥मी निश्चेष्टित पडिलों येथें ॥ मज लत्ता प्रहार केला जय द्रथें ॥ तेणें सर्वांग तिडकतें ॥ माझें कांहीं न चालेचि ॥९४॥ऐसें ऐकूनि वचन ॥ संबोखूनि बोले अर्जुन ॥ तुझें उसणें मी घेईन ॥ कांहीं खेद न आठवीं ॥९५॥बा रे सुकुमारा परियेसीं ॥ उद्यां जरी न मारीन जय द्रथासी ॥ तरी अग्निकाष्ठें भक्षीन निश्चयेंसीं ॥ तुझीच आण अभिमन्या ॥९६॥न्याहळीत श्रीकृष्ण वदन ॥ मुखें करीत हरि स्मरण ॥ अभिमन्य़ूनें सोडिला प्राण ॥ कृष्ण आपण पाहातसे ॥९७॥अंतरीं हरीचें ध्यान ॥ वदनीं करीत नाम स्मरण ॥ हरिपद अभिमन्य ॥ पावला पूर्ण निर्धारें ॥९८॥असो कृष्णें पार्थ संबोखिला ॥ रथीं बैसवूनि शिबिरा नेला ॥ निद्रा न ये अवघ्या ॥ चिंताग्नींत पडियेलें ॥९९॥पार्थें प्रतिज्ञा केली दुर्धर ॥ ते सिद्धी पाववील यादवेंद्र ॥ आपुले शिबिरा प्रति श्रीधर ॥ जाता जाहला तेधवां ॥१००॥पार्थ प्रतिज्ञा चित्तीं देखा ॥ निद्रा न ये विश्वव्या पका ॥ तों श्रीकृष्ण परम सखा ॥ दारूका प्रति बोलत ॥१०१॥उदयीक निर्वाण पण ॥ कैसा सिद्धीस नेईल अर्जुन ॥ धनंजय केवळ माझा प्राण ॥ मज त्याविण न गमेचि ॥१०२॥दारुका ऐकें एक वचन ॥ उद्यां सिद्ध करीं माझा स्यंदन ॥ घोडे चार जुंपून ॥ शैब्यसुग्रीवादि श्रृंगारीं ॥१०३॥सतेज आयुधें परम ॥ शंख चक्र गदा पद्म ॥ वरी ठेवूनि उत्तमोत्तम ॥ सिद्ध स्यंदन असों दे ॥१०४॥पार्थासी जाहलिया विपरीत ॥ तुज मी दावीन संकेत ॥ मनोवेगें आणीं रथ ॥ बैसावयासी मज तेव्हां ॥१०५॥सोडोनियां सुदर्शन ॥ संहारीन कौरव दुर्जन ॥ ऐसें सांगोनि जगन्मोहन ॥ पार्था जवळ पातला ॥१०६॥केशवासी म्हणे पार्थ ॥ म्यां जी केली द्दढ शपथ ॥ ती तुजविण समर्थ ॥ सिद्धीस कोण पावविता ॥१०७॥भक्त कैवारिया माधवा ॥ पण आतां सिद्धीस न्यावा ॥ दीनबंधो करुणार्णवा ॥ ब्रीद आपुलें सांभाळीं ॥१०८॥द्विजेंद्र वहना क्षीराब्धिनिकेतना ॥ गरुड ध्वजा दुर्जन वन दहना ॥ वाढ विलें आम्हां जगज्जी वना ॥ मधु सूदना लाज राखीं ॥१०९॥अद्यापि काष्ठ न बुडवी जीवन ॥ आपण वाढ विलें हा अभिमान ॥ पांडवपालक हें ब्रीद संपूर्ण ॥ ब्रह्मांडोदरीं गाजतसे ॥११०॥काष्टें कोरीत भ्रमर ॥ परी कमल न फोडी अणुमात्र ॥ आम्हां रक्षिता मुरहर ॥ त्याचिपरी सर्वस्वें तूं ॥१११॥मागील उपकार आठवितां ॥ पृथ्वी न पुरे यश लिहितां ॥ विश्वव्यापका अच्युता ॥ ऋणाइता आमुच्या पैं ॥११२॥यावरी उठोनि प्रातःकालीं ॥ स्नानादि सत्कर्में सारिलीं ॥ दोन्ही द्ळें सिद्ध जाहलीं ॥ घाई लागली वाद्यांची ॥११३॥धर्में य़ेऊनि त्वरितगतीं ॥ मन्मथतात स्तविला प्रीतीं ॥ अर्जुनासी धरो नियां हातीं ॥ श्रीकृष्ण करीं दीधला ॥११४॥जय वेद बुडाला कौरव सागरीं ॥ तो काढीं मत्स्यरू पिया श्रीहरी ॥ शंखा सुर हे पूतनारी ॥ जय द्रथ मारीं कां ॥११५॥पांडवलज्जा हे कुंभिनी ॥ बुडते सांवरीं पृष्ठी देऊनी ॥ कूर्मद्दष्टि करूनी ॥ विलोकीं आजि बाल कांतें ॥११६॥असो दशावतारलीला ॥ एथें दाखवीं घननीळा ॥ जन कजननी गोपाळा ॥ तूंचि आमुची सर्वस्वें ॥११७॥धर्में ह्रदयीं धरिला अर्जुन ॥ म्हणे लवकर येईं विजयी होऊन ॥ कृष्णार्जुन धर्मासी नमून ॥ रथावरी बैसले ॥११८॥ते वेळे पार्थ क्रोधाग्नी ॥ न मावेचि ब्रह्मांड भुवनीं ॥ जैसा ऊर्मिलानाथ पडतां रणीं ॥ भूमि जावर संतापला ॥११९॥अर्जुनें केली द्दढ शपथ ॥ जय द्रथ मनीं भयभीत ॥ दुर्योधनासी निरोप मागत ॥ मी देशत्याग करितों आतां ॥१२०॥द्रोण म्हणे व्यूह करून ॥ तुज आम्ही रक्षितों पूर्ण ॥ मग सहा गांवें लंबाय मान ॥ शकटव्यूह रचियेला ॥१२१॥शकट व्य़ूहावें मध्य कमळ ॥ त्या माजी जे केशर स्थळ ॥ भ्रमरप्राय जय द्रथ केवळ ॥ संकोचूनि बैसला ॥१२२॥इकडे रण माजलें अपार ॥ पुढें आला पार्थ वीर ॥ लागला वाद्यांचा गजर ॥ भूगोल तेणें कांपतसे ॥१२३॥ध्वजीं जन कजाशोकहरण ॥ सत्राणें केलें घोर गर्जन ॥ आरोळ्या पिटिती दारुण ॥ भोंवतीं भूतें तेधवां ॥१२४॥पांच जन्य देवदत्त ॥ उभय कृष्ण वाजवीत ॥ घडघडला विजय रथ ॥ दोन्ही दळें विलो किती ॥१२५॥अर्जुनासी म्हणे मन मोहन ॥ तूं आधीं सोडीं सवेग बाण ॥ मग मी धांवडितों स्यंदन ॥ पुढें कोण जात पाहूं ॥१२६॥धनंजयें सोडिला शर ॥ रथ धांवडी याद वेंद्र ॥ बाण टाकूनि रहंवर ॥ गेला पुढें चपलत्वें ॥१२७॥कौरव भार फोडूनि रथ ॥ मनोवेगें माघारा येत ॥ तों रथा पुढें अकस्मात ॥ बाण येऊनि पडियेला ॥१२८॥पार्थें ओळखिला आपुला बाण ॥ म्हणे हे जगन्निवास भक्तरक्षण ॥ अश्वांमाजी वेग पूर्ण ॥ ऐसा कैसा परमात्मया ॥१२९॥त्या तुरंगांचा अंतरात्मा ॥ तूं जाहलासी मेघश्यामा ॥ भक्तकामकल्पद्नुमा ॥ तुझा महिमा कोण जाणे ॥१३०॥पार्थासी म्हणे इंदिरावर ॥ आजि ऐसाचि चालवीन रहंवर ॥ छेदीं तूं जय द्रथाचें शिर ॥ विजय ध्वज उभारीं ॥१३१॥द्रौपदी सुभद्रा उत्तरा ॥ यांसी सुख देईं महावीरा ॥ निर्दोष यशाचा तुरा ॥ खोंवीं मुकुटीं आजि पां ॥१३२॥व्यूह पाहे अर्जुन ॥ तंव द्वारीं उभा असे गुरु द्रोण ॥ पार्थें टाकिला दंडवत बाण ॥ सव्य घालून चालिला ॥१३३॥महावीरांसी ऐसें वाटत ॥ पार्थ नव्हे हा आला कृतान्त ॥ अवघे म्हणती मांडला अंत ॥ सेना तत्त्वतां उरेना ॥१३४॥तों पुढें धांवला दुःशासन ॥ वर्षता जाहला अमित बाण ॥ गजभार चालती दारुण ॥ महागिरिवर ज्यापरी ॥१३५॥सव्यसाची नामा भिधान ॥ दोन्ही हातांचें समसंधान ॥ अलातचक्रवत सायकासन ॥ ओढितेवेळीं दिसतसे ॥१३६॥विद्युल्लते ऐसे दिव्य शर ॥ अंगीं रुपताती अपार ॥ केला दुःशासन जर्जर ॥ पळे सत्वर एकीकडे ॥१३७॥एक एक दारुण ॥ घेत पांचसातांचा प्राण ॥ गजकलेवरें फोडून ॥ पर्वत प्राय पाडिलीं ॥१३८॥तों वर्षत शर ॥ आचार्य आला समोर ॥ नमूनि बोले महावीर ॥ मी तुझा पुत्र गुरुवर्या ॥१३९॥मज आशीर्वाद देईं ये अवसरीं ॥ प्रतिज्ञा माझी करीं खरी ॥ य़ुद्धलाघव क्षणभरी ॥ द्रोणासी तेथें दाख विलें ॥१४०॥द्रोणासी म्हणे पार्थ वीर ॥ तुम्हां आम्हां नाहीं वैर ॥ मग प्रदक्षिणा करूनि सत्वर ॥ करीत संहार चालिला ॥१४१॥देशोदेशींचे नृपवर ॥ एकदांचि धांवती समग्र ॥ सोडिती बाणांचा पूर ॥ अर्जुनावर एकलिया ॥१४२॥सर्वांचेही शर तोडून ॥ शरीं खिळिले राव संपूर्ण ॥ जैसा मेघ मंडप देखोन ॥ पिच्छें शिखी पसरिती ॥१४३॥कृतवर्मा धांवला समोर ॥ सोडीत शरापाठीं शर ॥ चतुराचे मुखांतूनि सत्वर ॥ शब्द जैसे निघती पैं ॥१४४॥कृतवर्म्याचें ह्रदय लक्षून ॥ पार्थें सोडिले पांच बाण ॥ कीं पंचसौदामिनी येऊन ॥ ह्रदया माजी संचरल्या ॥१४५॥तेव्हां कृतवर्मा मूर्च्छा येऊन ॥ ध्वज स्तंभीं टेंकला जाण ॥ सूतें काढूनियां स्यंदन ॥ नेला तेव्हां एकीकडे ॥१४६॥पार्थाचे पाठिराखे तिघे जण ॥ आले दळा सह धांवोन ॥ सात्यकी आणि युधामन्य ॥ उत्तमौजा तिसरा पैं ॥१४७॥रणीं राखिती जे पाठी ॥ तेचि मित्र धन्य ये सृष्टीं ॥ त्यांसी देखोनि जग जेठी ॥ ह्र्दया माजी संतोषे ॥१४८॥श्रुतायुध जो वरुण पुत्र ॥ कौरवांचा परम मित्र ॥ तो रथा रूढ सत्वर ॥ बाण सोडीत धांवला ॥१४९॥त्यासी प्रसन्न होऊनि वरुण ॥ अस्त्रें शस्त्रें देत संपूर्ण ॥ आणि एक गदा देऊनि निर्वाण ॥ पुत्रा प्रति बोलिला ॥१५०॥शस्त्र धर जो परम योद्धा ॥ त्यावरीच सोडीं हे गदा ॥ निःशस्त्रियावरी हे कदा ॥ सहसाही सोडूं नये ॥१५१॥यद्यपि सोडिशील जाण ॥ तरी परतोनि घेईल तुझा प्राण ॥ तों श्रुतायुध बाणें करून ॥ समरीं खिळिला धनंजयें ॥१५२॥पार्थाचे रथीं वैकुंठ पती ॥ रथ चाल वीत पवन गती ॥ श्रुतायुध कोपोनि चित्तीं ॥ गदा प्रेरिली हरीवरी ॥१५३॥ती विजे ऐसी गदा आली ॥ जना र्दनाचे ह्रदयीं आदळली ॥ सच्चिदानंद मूर्ति सांवळी ॥ नाहीं ढळली रथा वरूनी ॥१५४॥ते वरुण गदा परम दारुण ॥ मेरु मंदार करील चूर्ण ॥ जो षड्विकार रहित भगवान ॥ तेणेंचि ह्र्दयीं सोशिली ते ॥१५५॥परी निःशस्त्र कंसांतक जाण ॥ गदा फिरली मनोवेगें करून ॥ श्रुतायुधावे ह्र्दयीम भरोन ॥ घेतला प्राण तयाचा ॥१५६॥उभय दळीं आश्चर्य जाहलें ॥ म्हणती हें अद्भुत वर्तलें ॥ आपुलें आपण शस्त्र परतलें ॥ कोणी हातीं न धरितां ॥१५७॥मग जे भोज पुत्र सुदक्षिण ॥ श्रुतायु अच्युतायु तिघे जण ॥ अपार म्लेंच्छ भार घेऊन ॥ विजया वरी धांवले ॥१५८॥तितुक्यांचींही शिरें ॥ पार्थें छेदिलीं क्षण मात्रें ॥ तें देखोनि प्रज्ञाचक्षूचे ज्येष्ठ पुत्रें ॥ द्रोणा प्रति म्हणितलें ॥१५९॥कीं आजि रक्षावा जय द्रथ ॥ वासरमणि पावतां अस्त ॥ अग्निकाष्ठें भक्षील पार्थ ॥ टळेल अनर्थ इतुकेनि ॥१६०॥मग द्रोण म्हणे व्य़ूहद्वार ॥ मी रक्षितों द्दढ साचार ॥ तुम्हीं मिळूनि समस्त वीर ॥ जय द्रथ रक्षावा ॥१६१॥तों इकडे विंदानु विंद दोघे जण ॥ अवंती देशींचे राजे दारुण ॥ धनंजयें सोडूनि बाण ॥ शिरें त्यांची छेदिलीं ॥१६२॥शिव दत्त कवच अभेद्य जाण ॥ द्रोणें लेव विलें दुर्यो धना ॥ ज्वावरी शस्त्र रुपेना ॥ कोणा चेंही कल्पांतीं ॥१६३॥त्या कवचबळें करून ॥ युद्ध करी दुर्यो धन ॥ पार्थें टाकिले निर्वाण बाण ॥ परी कवच न भेदे ॥१६४॥जो मधुमुर विनाशक पूर्ण ॥ तो युक्ति सांगे पार्था लागून ॥ कीं हस्त आणि चरण ॥ उघडे बाणीं खिळीं ते ॥१६५॥मग चरण आणि मण गटें दोनी ॥ पार्थें फोडिलीं तीक्ष्ण बाणीं ॥ त्याचि भयें करूनी ॥ दुर्यो धन पळाला ॥१६६॥इकडे धर्म भीम सहदेव नकुळ ॥ पांचाळीचे पांचही बाळ ॥ द्रोणावरी बाण जाळ ॥ घालिते जाहले तेधवां ॥१६७॥सोडूनि सात्यकीनें शर ॥ मारिला व्याघ्रदंत महावीर ॥ अलंबुष नामा असुर ॥ घटोत्कचें संहारिला ॥१६८॥रुक्मिणी ह्रदयींचें जें रत्न ॥ तो धर्मासी रक्षी प्रद्युम्न ॥ जल संध गजा रूढ होऊन ॥ सात्यकीशीं युद्ध करी ॥१६९॥परम लाघवी सात्यकी वीर ॥ परी जल संधें आटिलें दळ अपार ॥ मग सात्यकीनें सोडूनि निर्वाण शर ॥ छेदिलें शिर जल संधाचें ॥१७०॥तयाचे कैवारें भूरिश्रवा ॥ सात्यकीवरी धांवला जेव्हां ॥ कर्ण आणि भीम तेव्हां ॥ सीमेरहित भीडती ॥१७१॥भूरिश्रव्याचें शिर तेथें ॥ सात्यकीनें उडविलें पुरुषार्थें ॥ चिंता सागरीं अंधसुतें ॥ पेणें केलें तेधवां ॥१७२॥पार्थें वीर संहारिले अपार ॥ वेग करीं म्हणे सर्वेश्वर ॥ दिवस आला दोन प्रहर ॥ तृषाक्रांत वारू जाहले ॥१७३॥धनंजय जाहला तृषाक्रांत ॥ अश्वही विकळ जाहले बहुत ॥ कौरव देखोनि म्हणत ॥ इतुक्यांत पार्थ जिंकावा ॥१७४॥अर्जुनें बाण धाडोनि पाताळा ॥ काढिलें भोगावतीच्या जळा ॥ अक्षोभ सरोवर भरला ॥ भोंवते वृक्ष विराजती ॥१७५॥विशाळ सरोवर शीतळ जळ ॥ तीरीं विराजती मराळ ॥ सुवर्ण कमलां वरी अलिकुल ॥ रुंजी सदा घालिती ॥१७६॥कौरव दळ विस्मित पाहात ॥ म्हणती धन्य धन्य वीर पार्थ ॥ अर्जुन उदक सेवीत ॥ घोडे सोडीत श्रीकृष्ण ॥१७७॥मग वारूंचे वाग्दोरे ॥ हातीं धरिले रमावरें ॥ सच्चिदानंद सर्वेश्वरें ॥ चाबूक माथां खोंविला ॥१७८॥हयमुखींची लाळ ॥ स्वकरें धूत तमाल नीळ ॥ अंगींचे बाण उपटूनि सकळ ॥ हस्त फिरवी परमात्मा ॥१७९॥जो ह्स्त फिरावया माथां ॥ इच्छिती शिव पुरंदर विधाता ॥ तो हस्त हयांसी लागतां ॥ क्षतें सर्व बुजालीं ॥१८०॥अश्वांचे अंगींचा कंडू सकळ ॥ नखें करूनि निववी गोपाळ ॥ अंजलि भरूनि सलिल ॥ वेळोवेळां वरी घाली ॥१८१॥तुरंग होतांचि चंचळ ॥ हो हो म्हणे वैकुंठपाळ ॥ त्रिभुवन ॥ विस्मित सकळ ॥ पांडव भाग्य वर्णिती ॥१८२॥इतुक्यांत कौरव बाण जाळ ॥ विजया वरी घालिती सकळ ॥ पार्थासी म्हणे घननीळ ॥ बाण जाळ छेदीं हें ॥१८३॥रथा खालीं उभा अर्जुन ॥ गांडीवचाप चढवून ॥ अपार सोडूनि मार्गण ॥ बाण जाळ छेदिलें ॥१८४॥अश्व धुवोनि गज ज्जीवन ॥ रथीं योजी न लागतां क्षण ॥ अर्जुनासी हात देऊन ॥ रथावरी आरूढ विली ॥१८५॥बाप बाप बोलोनि तेव्हां ॥ थापटी तुरंगांच्या ग्रीवा ॥ सादर होऊनि मघवा ॥ विलोकीत प्रेम भरें ॥१८६॥माझा पुत्र सभाग्य परम ॥ नीच कर्में करी पुरुषोत्तम ॥ आनंदाश्रु उत्तम ॥ शक्राचे नयनीं लोटले ॥१८७॥घोडे धुऊनि आणिले ॥ स्थंदनीं जे वेळे जुंपिले ॥ सरोवर तत्काळ आटलें ॥ युद्ध मांडलें पुढती पैं ॥१८८॥उभय कृष्ण एके रथीं ॥ पवनवेगें वारू जाती ॥ कौरव दळींचे सारथी ॥ विलो किती कौतुकें ॥१८९॥सव्यसाची क्रोधाय मान ॥ वाम सव्य समसंधान ॥ पार्था त्वरा करीं म्हणोन ॥ खगकेतन बोलतसे ॥१९०॥सहा गांवें व्यूह रचिला ॥ जिंकितां तिसरा प्रहर ॥ जाहला ॥ प्रहर एक दिवस उरला ॥ कृष्ण विचारी मानसीं ॥१९१॥कीं दिवस उरला किंचित ॥ असाध्य आतां जय द्रथ ॥ प्राण त्यजील माझा पार्थ ॥ मग दीनानाथ काय करी ॥१९२॥सुदर्शन आड घातलें ॥ दिनकरासी लपविलें ॥ अर्जुनासी तें न कळे ॥ वीरश्रियेचेनि माजें ॥१९३॥घे घे म्हणे अर्जुन ॥ मग बोले जग ज्जीवन ॥ सरलें सरलें दिन मान ॥ आलें रे मरण तुजलागीं ॥१९४॥अर्जुनें सूर्याकडे पाहिलें ॥ तों सूर्य बिंब मावळलें ॥ गांडीव हातींचें ठेविलें ॥ कुंड रचिलें तेधवां ॥१९५॥अग्निकाष्ठें भक्षावया अर्जुन ॥ सिद्ध जाहला जाणोन ॥ धर्म भीम सकल सैन्य ॥ शोक करिती तेधवां ॥१९६॥कौरवांसी हर्ष थोर अनायासें मरतो पार्थ वीर ॥ मग पहावया समग्र ॥ पांडव कौरव पैं आले ॥१९७॥कुंडी धडाडला तेव्हां अग्नी ॥ अर्जुन आला स्त्रान करोनी ॥ मग श्रीकृष्णासी नमोनी ॥ तीन केल्या प्रदक्षिणा ॥१९८॥पहावया आले आले समस्त ॥ चोरूनि पाहे जय द्रथ ॥ तें देखोनि श्रीकृष्ण नाथ ॥ काय बोलत पार्थासी ॥१९९॥स्त्री भ्रतारासवें जाय ॥ तैसा अग्नि प्रवेश न करिसी काय ॥ आपुलें धनुष्य बाण ॥ लवलाहें ॥ समागमें घेईं कां ॥२००॥धनुष्यासी बाण चढवून ॥ कुंडासी करीं प्रदक्षिण ॥ मग तैसेंचि करी श्वेतवाहन ॥ कौरव सर्व पाहती ॥२०१॥चोरूनि पाहे जय द्रथ ॥ देखोनि कौरव समस्त ॥ म्हणती तुजसाठीं हा होतो अनर्थ ॥ तूं कां येथें आलासी ॥२०२॥जय द्रथ म्हणे बरें जाहलें ॥ अर्जुनासी तों मरण आलें ॥ आतां पांडव एकेचि वेळे ॥ उद्यां सर्व जिंकीन ॥२०३॥इकडे प्रदक्षणा करी अर्जुन ॥ धनुष्य ओढूनि आकर्ण ॥ तों हळूचि कानीं सांगे जग ज्जीवन ॥ पैल जय द्रथ पाहें पां ॥२०४॥इतुक्यांत काढिलें सुदर्शन ॥ तों अर्धघटिका दिवस पूर्ण ॥ पार्था हा सूर्य तो जय द्रथ दुर्जन ॥ सोडीं बाण वेगं पैं ॥२०५॥ऐसें बोलतां जग ज्जीवन ॥ निमेष न लागतां गेला बाण ॥ जय द्रथाचें शिर छेदून ॥ आकाशपंथें उडविलें ॥२०६॥ज्याचे हस्तीं हें पडेल शिर ॥ त्यासी तत्काल मृत्यु साचार ॥ अर्जुनासी म्हणे सर्वेश्वर ॥ शिर वेगें उडवीं पां ॥२०७॥सिंधुराज जय द्रथाचा पिता ॥ पश्चिम समुद्रीं तप करीत होता ॥ संध्या वंदनीं अर्घ्य देतां ॥ शिर पडिलें तया हातीं ॥२०८॥तेणें हातींचें टाकिलें शिर ॥ तों तेथेंचि मृत्यु पावला नृपवर ॥ सूत्रधारी तो यदुवीर ॥ नाना कौतुक दावीतसे ॥२०९॥दिनमणि पावतां अस्त ॥ इतुक्यांत मारिला जय द्रथ ॥ विजय वाद्यें वाजवीत ॥ पार्थ तेव्हां परतला ॥२१०॥दुर्धर पण साधिला देख ॥ कौरवांसी दिलें महा दुःख ॥ शोकें विव्हळ सकळिक ॥ भ्रमले विवेक समजेन ॥२११॥दुःशीला दुर्यो धनाची भगिनी ॥ ते जय द्रथाची होय गृहिणी ॥ गांधारी धृतराष्ट्र ऐकोनी ॥ जामात दुःखें विव्हळती ॥२१२॥धर्मासी सांगती दूत ॥ कीं रणीं मारूनि जय द्रथ ॥ पैल कपिवर ध्वज झळकत ॥ शिबिरा प्रति येतसे ॥२१३॥विजय वाद्यांचे गजर ॥ पांडवदळीं होती अपार ॥ पुष्प वृष्टि वारंवार ॥ पुरंदर करीतसे ॥२१४॥रथा खालीं उतरतां कृष्णा र्जुन ॥ धर्म राज पुढें येऊन ॥ श्रीरंगाचे चरणीं नमन ॥ करूनि स्तवन करी तसे ॥२१५॥म्ह कुंती उदरीं नूतन ॥ आजि जन्मला हा अर्जुन ॥ जनक जननी बंधु स्वजन ॥ तुजविण कोण श्रीहरी ॥२१६॥कृतांताचे मुखांतून ॥ आजि त्वां पार्थ काढिला ओढून ॥ सर्वांगाची छाया करून ॥ प्रर्हाद जैसा रक्षिला ॥२१७॥विजयासी विजयी करून ॥ हरि त्वांचि दिधला आणून ॥ थोर पणा सकल सांडून ॥ घोडे आजी धूतले ॥२१८॥यदुकुल कमल विलास भास्करा ॥ पद्मजात जनका पद्माक्षीवरा ॥ पद्मनाभा पद्मधरा ॥ नाहीं उपकारा मिति तुझ्या ॥२१९॥हे जग ज्जनका विश्वसंभूत ॥ समर भूमीसी होसी सूत ॥ आणि होऊनि आमुचा दूत ॥ शिष्टाई करूं गेलासी ॥२२०॥पांडवकुल पालका पांडुरंगा ॥ ब्रह्मा नंदा न विटें अभंगा ॥ श्रीधर ह्रदयाञभृंगा ॥ उभा अव्यंगा विटेवरी ॥२१२॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ द्रोणपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ पंचेचाळिसाव्यांत कथियेला ॥२२२॥इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे द्रोणपर्वणि चक्रव्य़ूह भेदनो नाम पंचचत्वारिंशाध्यायः ॥४५॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP