मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ११९ - १२०

क्रीडा खंड - अध्याय ११९ - १२०

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(साकी)

दुःखद वार्ता कळतां तेव्हां सिंधू उदास झाला ।

दुःखी जनका पाहुन सुत दों अळवित ताताला ॥१॥

धृ०॥सुन सुन बा सखया । युद्धकथा ऐकें या ।

अधर्म धर्म हे मागति आज्ञा युद्धाला जाण्याची ।

आज्ञा होतां दलासहित ते निघती रणांत तोंची ॥२॥

सेनानीनें प्रवेश केला असुर-दलीं हननाला ।

सिंधू-सुत हें पाहुन दोघे शिरले सुर-दलनाला ॥३॥

इतुक्यामध्यें सेनानीनें धरिला अधर्म हस्तीं ।

नंतर धर्मा धरिता झाला तैसा दुसर्‍या हस्तीं ॥४॥

गरगर फिरवुनि दोघांनाही धरणीवरि आपटीलें ।

सुत सिंधूचे वधिले तेव्हां पळुनि राक्षस गेले ॥५॥

तिकडे सिंधुस पुत्रवधाची हकिकतही कळली ।

जय जय ऐसें गणपति नामें सुर-सेना वदली ॥६॥

पुत्र-वधाचें वृत्त ऐकुनी पडिला असनाखालीं ।

मूर्च्छा आली परिसुन तेव्हां दुर्गा झडकरि आली ॥७॥

धृ०॥ सुन सुन मित्रमणी । शोक कथाही श्रवणीं ।

पुत्र-वधाचा शोक जाहला दोघांना तो भारी ।

अनीवार हा शोक निवारुनि समजावित जन नारी ॥८॥

चिरंजीव हें नाहीं कोणीं निःसिम-भक्तच वानी ।

बली मारुती व्यास बिभीषण परशुराम हो अवनीं ॥९॥

कृपाचार्य नी अश्वत्थामा हेच चिरायू झाले ।

परिजन भाषण ऐकुन दोघे तदुपरि सावध झाले ॥१०॥

चक्रपाणिही सिंधुस सांगे मुक्त करी देवांसी ।

म्हणजे हितकर मैत्री होइल गणपति देवासी ॥११॥

बापाचाही बोध सिंधुला रुचला नाहीं व्यासा ।

पुत्र-सुडास्तव हयपति होऊन समरीं जाइल खासा ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP