उपदेशपर पदे - भाग ११

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे


१५३१
( राग-मांड; ताल-दीपचंदी.  )
जना जन पाळिताहे ॥ध्रु०॥
वृद्धा बाळपण बाळा वृद्धपण । अंतर शोधुनि पाहें ॥१॥
श्रेष्ठ कनिष्ठां कनिष्ठ श्रेष्ठां । उसिणें फिटत जाय ॥२॥
जग जगाचें जीवन साचें । कर्ता तो करिताहे ॥३॥
एका पाळितो पाळुनि घेतो । दोंहिकडे फिरताहे ॥४॥
अंतरवासी देव विलासी । दास समजता राहे ॥५॥

१५३२
( चाल-साधुसंतां मागणेम० )
जाणोनि कासया नेणतोसी रे । वायां माझें माझें म्हणतोसी रे ॥ध्रु०॥
माझें माझें म्हणतां सर्व गेलें रे नाहीं ठेलें रे । असंख्यात जन्मले आणि मेले रे काळें नेले रे ॥१॥
मन हें चंचळ आवरेना रे सावरेना रे । दुःख त्या देहाचें सरेना रे विसरेना रे ॥२॥
विद्या वैमव जाईजणें रे दैन्यवाणें रे । येणें चुकेना येणें जाणें रे साधुविणें रे ॥३॥
बोलासारिखें चालावें रे निजमावें रे । हित आपुलें आपण करावें रे उद्धरावें रे ॥४॥
किती सांगणें वारंवार रे भक्तिसार रे । करितां पावे पैलपार रे निरंतर रे ॥५॥
संतसंगें होतसे उपाय रे घरीं सोय रे । दुर्लभ आयुष्य शब्द रे शब्द काय रे ॥६॥
रामदास म्हणे सावधान रे करीं मन रे । बृत्ति  राहतां उदासीन रे करीं समाधान रे ॥७॥

१५३३
( रग-बरवा; ताल-दादरा.  )
नका नका नका चुकों नका रे नका रे । चुकतां बैसेल काळधका रे ॥ध्रु०॥
साधा साधा साधा काळ साधा रे साधा रे । साधितां चुकेल भवबाघा रे ॥१॥
सोडा सोडा सोडा संग सोडा रे संग सोडा रे । दुश्चितपणाचें मूळ तोडा रे ॥२॥
रामदास म्हणे ज्ञान वाड रे वाड रे वाड रे । सावधासीं सांपडे घबाड रे ॥३॥

१५३४
( चाल-ज्या ज्या वेळीं जें जें० )
सार्थक होतें सार्थक होतें दुरित सरत जातें । पुण्यपावन ज्ञानमार्ग हा देवदर्शन होतें ॥ध्रु०॥
शिकली कळा बाहेर मुद्रा अंतर्कळा समजावी । जेणेंकरितां देव पाविजे तेचि द्दढ घरावी ॥१॥
ज्ञानविना ते पशु जाणावे वचन भगवंताचें । अध्यात्मविद्या शोघिलियाविण व्यर्थचि माणुस काचें ॥२॥
दास म्हणे तो आत्मघातकी स्वहित करीना तो । मायाजाळें भ्रमोनि गेला व्यर्थचि मरोन जातो ॥३॥

१५३६
( राग-भीमपलास;  ताल-दादरा. )
समजलें पाहिजे ऐसें समाजलें पाहिजे । संगतिचे जन तरीच सज्जन होउनि राहिजे ॥ध्रु०॥
देव व्यापक तैसा चि सेवक तरीच सार्थंक होतें । संगति आहे गुण न लाहे सकळ व्यर्थचि जातें ॥१॥
देव साक्षपी भक्त आळसी तरीच खायासी मिळेना । कैसें भजावें काय त्यजावें ऐसेंहि कळेना ॥२॥
दास म्हणे संसार जिणें तरि कांहीं कळत नाहीं । सारासार विचारुनि पाहीं निश्चाळ होउनि राहीं ॥३॥

१५३७
( राग-बागेश्री; ताल-धुमाळी. ) जीवाचें जीवन जगज्जीवन हरी । सकळीक जनांचें पाळण करी । पाहतां तयेची अमृत लहरी । तयेसी न पवे देतां दुसरी सरी ॥ध्रु०॥
मनाचें मोहन मनमोहन लीळा । सकळ अंतरीं जाण सकळ कळा । तयाविण आणिक न दिसे जिव्हाळा । सकळीं  असोन रे सकळ कळा । तयाविण आणिक न दिसे जिव्हाळा  । सकळीं  असोन रे सकळां वेगळां ॥१॥
नटकत नाटक नाना वेषधारी । परम सुंदर नाना कळा कुसरी । अनेक चालवी येक बहुतांपरी । येक तनु त्यजी येक सवेंचि घरी ॥२॥
चालत सकळ जन नवल मोठें । तयास  नेणतां त्याचें सकळ खोटें । देवास चुकलें तें माणुस चोरटें । मायबोपेंविणें पोर पोरटें ॥३॥
अमिनव नवल नवला । लटकी च कासया करिसी वळवळ । तुझी च करणी तुजलागीं फळेल । आपदा पावसी तेव्हां मग कळेल ॥४॥
रामदास म्हणे तुम्ही शाहाणे कसे । सकळ चळतें देखतां वळसे । शरीरसंपत्तीचे कोण  भर्वसे । धन्य ते भजक देव ह्र्दईं वसे ॥५॥

१५३८
( राग-काफी; ताल-दीपचंदी; चाल-राजी राखो रे० )
अरे मना घ्यायीं हरी रे किती भरसी भरीं रे ॥ध्रु०॥
लालुच हे जन चंचळ लोचन । व्यर्थ अमिलाष  करी रे ॥१॥
पर अभिलाष विलास मानसीं । हेंचि बरें विवरीं रे ॥२॥
दैन्य वृद्धपण येईल मरण । दास म्हणे विवरीं रें ॥३॥

१५३९
( राग-गौड सारंग; ताल-धुमाळी )
चाल रे मना भेटों जाऊं । सज्जना । तेथें आहे आमुचा रामराणा ॥ध्रु०॥
ऊठ लवकरीं चाल जाऊं झडकरीं । जाऊन रामपायीं सुख घेऊं धणीवरी ॥१॥
भाव दाविला तोहि असे गोंविला । सोडीं काम जावों राम पाहों आपुला ॥२॥
मन चालिलें तेणें मूळ शोधिलें । संत रामदास त्याला सकळ भेटले ॥३॥

१५४०
( राग-बिलावल; ताल-दादरा )
मना सोडीं सोडीं सोडीं नाना खोडी रे । करीं भजन राम जोडी ॥ध्रु०॥
जाणत जाणत नेणतोसी रे । वायां माझें माझें म्हणतोसी रे ॥१॥
गेला रे जन्म गेला रे । अमावें आपुला घात केला रे ॥२॥
शरीरसंपत्ति जाईजणें रे । सावघान होईं दास म्हणे रे ॥३॥

१५४१
( राग-सोहोनी; ताल-धुमाळी चाल-हित गेलें रे०  )
न झांकीं डोळे मना न झांकीं डोळे । सत्य रामेंवीण सुख न मिळे ॥ध्रु०॥
काळव्याळ विषाळवाणा । वदनीं घालून आम्हां गिळित आहे । सावघ पाहे । आक्रंदोनी बाहे ॥१॥
स्वयें नेणसी नायकसी ऐसें करणें काय । सुखाकारणें विषय सेविसी । परि तेथें सुख नोहे ॥२॥
कामनिरयडोहीं बुडिजे आणि । जन धिग धिग म्हणे । रामीरामदासी मिनलियां । तरोनि ध्यन्य होणें ॥३॥

१५४२
( राग-मैरवी; ताल-दादरा. )
सज्जना सज्जन मानी मना । अगणीत गुणगणना ॥ध्रु०॥
गुणीं गुणालय आलय लीळा पाळक  जो भजना ॥१॥
दास हरिजन भ्रमित उदासीन । गळीत  येना स्वघना ॥२॥

१५४३
( राग-जिल्हा; ताल-धुमाळी. )
किती आले येऊनि गेले । मले कीर्तिच ठेऊनि गेले । येक अपकीतींनें ज्याले । रे रे रे रे। सेखीं अवघेंचि मरोनि गेले रे ॥ध्रु०॥
जनीं संसार जाईलणा । जगीं देखतां तरि कां नेणा । अंतकाळीं होइला दैन्यवाणा । रे०। हित आपुलें आपण जाणा रे ॥१॥
वैमवाचे डोंगर केले । किती येक  ते सांडुनि गेले । एक आधींच सावध  जाले । रे०। संतसंगतीनें निवाले रे ॥२॥
इहलोकीं संसार करावाअ । परलोक तोही साघावा  । हळूहळूं ऊगवावा । रे०। नित्यकाळ तो आठवावा रे ॥३॥
दास म्हणे  सावधान । पुढें कळेन व्यवधान । द्यावें निरूपणीं अवधान । रे०। येर तें नाहीं सावधान रे ॥४॥

१५४४
( चाल-नामामध्यें उत्तम० )
तनना तनना म्हणतां जन्म गेला । तन हें आपुलेंचि मानूनि राहिला । अंतकाळीं अवचिता आला घाला । सर्व सांडून एकलाचि निघाला ॥ध्रु०॥
जन्मवरी म्हणतो माझें माझें । वेडें हिंपुटी जालें घेतें ओझें । वेडया मानवा रे काय आहे तूझें । पाहे अंतरीं समजे बरें बूझें ॥१॥
जन्मवरी उदंड स्वार्थ केला । कितीएक जनीं अनथीं घातला । मायाजाळीं बहुत सुखावला ।  पुढें विचारितां दुःखचि पावला ॥२॥
दास म्हणे विचारीं कांहीं हित । देह चालतें तों करावें  स्वहित । देव असतां कां जालासी पतित । ज्ञानें पावन राहावें सर्वातीत ॥३॥

१५४५
( राग-कल्याण; ताल-धुमाळी. )
मज मानत नाहीं तनाना । अर्थप्रबंध कां हो म्हणाना । अभ्यंतर बरें ओळखाना ॥ध्रु०॥
अर्थ घन स्वर पोंचट । अर्थेंवीण शब्द फळकट । विवरतां चुके खटपट ॥१॥
अर्थाकरितां खलित्या मिळती । खलितीनें द्रव्यप्राप्ती । समजतां कळे सप्रचीती ॥२॥
धान्याकरितां भूसचि होतें । भूस पेरितां काय पिकतें । सार घेऊनि असार सांडिजेतें ॥३॥
दास म्हणे हें न कळे जयासी । किती म्हणोनि सांगों तयासीं । समजतां कळे सकळांसी रे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP