मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
वियोगामुळें

वियोगामुळें

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( शार्दूलविक्रीडित )

कोणी सांप्रत लक्ष्य लावुनि जरा पाहील माझेकडे,
ध्यानाची निरखील पाठ तर तो निस्तेज माझ्या मुखीं;
देव्हार्‍यांत मनाचिया बसुनियां आहेस जी तूं सखी,
त्या तूझ्यावरी तें जडून रुसलें या बाह्य शून्या गडे !

नक्षत्रें, सुमने, सुवर्णनिधिही, मोत्ये, हिर्‍यांचे खडे,
सन्ध्या आणि उषा, नसे रविशशी, विद्युल्लताही निकी,
ऐसे दिव्य पदार्थ जोडुनि तुझ्या रूपास मी पारखीं;
सारेही दिसती फिके !--- तुजहुनी मातें सुधा नावडे !

माझ्या गे स्मरणीं तुझें गुण, मुखीं तीं इक्षुखंडें जशी,
होतीं नीरस तीं परी गुण सदा तुझे गोडीस देती सदा;
ज्या मत्क्लृप्ति तुझ्याविशीं, चघळितों त्या स्वांघ्रिं जैशीं मुलें;
तेणें रक्त मदीय आटत असे, निद्रा न येई मशीं !

उत्कष्ठा ह्रदयीं---मनोज्ञ तव ती पाहीन मूर्ति कदा ?
वेडापीरच जाहलों जिवलगे आहे वियोगामुळें !

१२-११-१८९८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP