मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
दिवा आणि तारा

दिवा आणि तारा

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( शार्दूलविक्रीडित )

तार्‍याला जमिनीवरूनि वदला गर्वें दिवा हें असेंप :---
“ अस्पष्ट द्युति ही कीती तव ! तुझा रात्रौ कितीसा असे ----
लोकाला उपयोग ? मी बघ कसा तेजा निजा पाडितों
अंधारीं ब्यवहार सर्वहि जगीं माझ्यामुळें चालतो ! ”

तारा तो वरुनी दिव्यास वदला गम्भीर शान्त स्वरें ----
“ दीपा ! तूं म्हणतोस तें कवण तो लेखील खोटें बरें ?
जी वस्तुस्थिति ती परंतु बघता आहे जरा वेगळी,
अंधारावर तूझिया मम नसे बा ! योजना जाहली.

“ भांडीं, तों मडकीं, डबे ढकलिसी अंधार यांपासुनी,
बह्मांडास परन्तु मी उजळीतों, गेलीं युगें होउनी;
तेजानें वरुनी दिव्या ! खुलविसी तूं मानवी चेहरे,
आत्मे उज्ज्वल आंतले पण गडया ! होतात माझे करें !

“ ज्ञाते, आणि भविष्यवादीहि, कवी, ते चित्रकतें तसे,
मत्तेजें फिरतात, अन्य जन हे तूझ्या प्रकाशें जसे;
तूझ्यासन्निध जो कवी लिहितसे त्यालाच तूं पूस रे ---
“ दीपाच्या लिहितास तूं द्युतिबलें कीं तारकांच्या बरें ?”

सष्टेंबर १८९२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP