मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
माझा अन्त

माझा अन्त

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( वृत्तधैचित्र्य )

मीं पाहिली एक सुरम्य बाला;
वर्णू कसा त्या स्मरसंपदेला ?
वृक्षावरी वीज जघीं पडावी,
त्याच्या स्थितींतचि तिची महती पहावी.

माझी अवस्था बघुनीच तीचें
सौंदर्य सोपें अजमावयाचें;
वस्ताद जी चीज जगीं असावी,
तिचें स्वरूप सगळें परिणाम दावीं.

सौंदर्य पुष्पासम वर्णितात,
झालें मला कंटकसें प्रतीत;
सौंदर्य मानोत सुधानिधान,
तें जाहलें मज परंतु विषासमान !

नेत्रें क्षणीं तारवटून गेलीं,
अंगें ज्वरीं त्या परतंत्र झालीं,
झालों तिला मी बघतां भ्रमिष्ट,
शुद्धि सवेंचि मग होय अहा ! विनष्ट.

माझा असा अन्त अहो जहाला !
‘ कोठूनियां हा मग येथ आला !---’
ऐसा तुम्हां संशय येतसे का ?
मी भूत हें मम असें, नच यांत शंका !

मुंबई, ४ जानेवारी १८९०

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP