मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन| सुधारणा अपरिहार्य वाटण्याची चिन्हे ऐतिहासिक पर्यालोचन सावर्ण्यचर्चा विराट पुरुष चातुर्वर्ण्याची स्थापना आनुवंशिकतेची इच्छा साहजिक व क्षम्य आनुवंशिक की गुणधर्मानुसारी पध्दती श्रेष्ठ ? संस्कार पध्दती व तिची निकृष्ट स्थिती आनुवंशिक पध्दती अस्वाभाविक ग्रहाची होय संस्कारपध्दतीवर परिणाम गुणकर्मव्यवस्था अस्वाभाविक नव्हे कारणास्तव वर्णव्यवस्थेत फेरबदल आनुवंशिक वर्णपध्दती मागाहूनच झाली ’ जन्मना जायते० ’ वचनाचा सरळ अर्थ गुणकर्मपध्दतीवर अनवस्था प्रसंग व त्यास उत्तर दोन्ही पध्दतींचा विरोध, दुसर्या पध्दतीतील गोष्टी भिन्नदेशीयांशी अगर भिन्नराशीयांशी विवाहसंबंध विवाहसंबंधची मनुषजातीपर्यंत व्यापकता स्त्रीपुरुषांचे विवाहस्वातंत्र्य विवाहस्वातंत्र्यास अडचणी व प्रतिकार मनूच्या मते जबाबदारी व स्त्रीस्वातंत्र्याचा योग या योगाचा फायदा बहुतेक अशक्यच कन्यास्वयंवर व कुटुंबाच्या धनावर कन्येचा हक्क कन्याशुल्काबाबत कायद्याची मदत स्त्रीपुरुषांचे विवाहोत्तर स्वातंत्र्य घटस्फ़ोट, काडीमोड टाळण्यास कायद्याची मदत स्त्रीसमाज सुधारणेस तयार नाही सुधारणा अपरिहार्य वाटण्याची चिन्हे स्त्रीपुनर्विवाह पुनर्विवाहास वेदाधार आहेत पराशरस्मृतीचे महत्त्व धर्मशास्त्राच्या वादांतील लपंडावाची ठरीव पद्धती ‘ नष्टे मृते० ’ वचनात झालेला लपंडाव या लटपटीत रूढिपक्षाचे मुद्दे कित्येक कोटिक्रम, व त्यांची उत्तरे पुनर्विवाहेच्छू स्त्रीचे गोत्र कोणते व दानाधिकारी कोण ? गोत्राचा निर्णय ग्रंथांवरून पाहिजे पोटविभागांचा क्रमश: विचार दानाधिकारी पूर्वीप्रमाणेच स्त्रीधन इत्यादी विषय सुधारणा अपरिहार्य वाटण्याची चिन्हे प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : astrologyjyotishमराठीवधूवर सुधारणा अपरिहार्य वाटण्याची चिन्हे Translation - भाषांतर स्त्रीवर्गाची सामान्यत: आता वर्णिल्या प्रकारची स्थिती आहे, व ती आपणास जुलुमाची अगर दु:सह वाटते अशी त्यांच्याकडून जर फ़िर्याद अगर कुरकुर नाही, तर समाजसुधारणेच्छू लोकांनी तरी त्यांच्याबद्दल हा नसता उपद्वयाप काय म्हणून करीत राहावे ? सामाजिक सुधारणेस प्रतिकूल असलेल्या मंडळीकडून आता लिहिल्या प्रकारचा प्रश्न पुष्कळ प्रसंगी विचारण्यात येतो, व तो प्रश्न वावगा अगर खोटा आहे असे प्रत्यक्ष सुधारणावाद्यांच्यानेही म्हणवणार नाही.गोष्ट खरी, तथापि हाच प्रश्न प्रतिकूल पक्षाकडून दहा पंधरा वर्षांपूर्वी जितक्या जोराने विचारण्यात येत असे, तितक्या जोराने आज ते तो विचारू शकत नाहीत, हे लक्षात आणिले, म्हणजे त्या पक्षाच्या मनाचीदेखील चलबिचल झाली आहे, व स्त्रीवर्गासंबंधाने अजून काही थोडी वर्षेपावेतो विचार करण्याचे लांबणीवर टाकिले, तरी पुढेमागे हा प्रश्न आपोआपउचल खाल्ल्याशिवाय राहावयाचा नाही, ही गोष्ठ त्या पक्षासही थोडीबहुत जाणवू लागली आहे असे म्हटल्याशिवाय गत्यंतर राहात नाही.देशात उत्तरोत्तर दारिद्र्य वाढत चालल्यामुळे असो की इतर निराळ्या कारणांमुळे असो, निदान पुरुषवर्गापुरती तरी बालविवाहाची प्रवृती पुष्कळ अंशांनी कमी होत चालली आहे यात संशय नाही. स्त्रीविवाहाची मुदत अद्यापि रजोदर्शनकालाच्या जवळ जाऊन भिडली नाही, तथापि तिची गती त्या कालाच्या बाजूकडेच आहे हे कोणीही मनुष्य सामान्य निरिक्षणाने जाणू शकेल. अशा रीतीने उत्तरोत्तर सुधारणा होतेच आहे, व ती होणे अनिष्ट नाही, म्हणून नुसते कालप्रतीक्षण करीत राहण्यापेक्षा त्या दिशेने उद्योग होणे अधिक श्रेयस्कर वाटत. कोणास वाटत नाही, किंवा वाटत असले तरी कित्येक लोक तटस्थ वृत्तीने राहतात, - एवढेच काय ते खरे अंतर आहे. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP