श्रीकेशवस्वामी - भाग ३०

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.

 


श्री केशवस्वामींबद्दल बर्‍याच संतकवींनी आदरार्थी उद्रार काढले आहेत;

त्यापैकीं श्रीसमर्थ रामदासांचा एक श्र्लोक व शहाबेग यांचे एक पद देत आहे.

वर पृ. २७१ यांत श्रीकेशवस्वामींनी श्रीसमर्थांस पत्र लिहिलें त्याच्या उत्तरांत श्रीसमर्थ म्हणतात.

पदातीत वाक्यार्थ शोधी समाधी ।

स्वरूपींच जो निर्विकल्पाव बोधीं ॥

जय ऊगमी जन्म नाहीं जिवासी ।

मिळे दास त्या संगमीं केशवासी ॥

० पद ८५७ वें

कां बा बैसलें अति निसुर । भजना होतसे अति उशिर ॥

अति गर्वे निद्रिस्त जालें नर । घरोघरीं मांडलें करकर जी जी

जी जी ॥ध्रु॥

मी दंडी गाना सांगतों जागा । नाहीं तरी होइल फार नागा ॥

पहा बहुतीं खादलें येथ दगा । हित सांगतों शरण संतां जागा जी जी जी जी ॥१॥

काळ पसरुनि मुख विशेष । आला खात त्रैलोक्य केलें वोस ॥

उठा पळा जंव आहे अवकाश । नाही तरी करील एक ग्रास जी जी

जी जी ॥२॥

काळापासुनि सोडवी पाहे । तोचि सखा बंधु बाप माय ॥

ब्रह्मादिकां दुर्लभ ज्याचे पाय । पायीं राहिल्या मग भय काय जी ॥३॥

केशवस्वामी केवळ सौख्यराशी । मनोभावें शरण रिघा त्यासी ॥

पदो पदीं सहज जोडे काशी । म्हणे शाबेग समाधी अनयासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP