मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कपिल गीता| श्लोक ३१ ते ४० कपिल गीता श्लोक १ ते १० श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ७० श्लोक ७१ ते ८० श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ६६ श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० अध्याय चवथा - श्लोक ३१ ते ४० कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात. Tags : gitakapilकपिलगीता अध्याय चवथा - श्लोक ३१ ते ४० Translation - भाषांतर जलस्नानं मलत्यागि भस्मस्नाद्वहि: शुचि: ॥मंत्रस्नाच्छुचिश्वान्तर्ज्ञानस्नानात्परं पदं ॥३२॥जलस्नानाने अंग शुद्ध होते, भस्मस्नानाने त्वचा शुद्धि होते, मंत्रस्नानाने अंत:शुद्धि होते आणि ज्ञानस्नानाने परमवद प्राप्ति होते॥३२॥अंत:स्नानघिहिनस्य बहि:स्नानेन किं फलं ॥मलयाचलसंभूतो न वेणुश्चन्दनायते ॥३३॥ज्याने अंत:स्नान केले नाही त्याच्या बहीस्नानाचा काय उपयोग. मलयगिरीवर उगवलेला वेळु चंदन होत नाही ॥३३॥मंत्रस्नानाच्छुष्ध्दचित्त: स चांत:शुद्धिमाप्नुयात् ॥अंतर्बाह्य शुद्धयार्थ ज्ञानस्नानं च मोक्षदं ॥३४॥मंत्रस्नानाने चित्तशुद्धि होते हे खरे पण त्यामुळे बाह्य शुद्धिचा लाभ होत नाही, यास्तव अंतर्बाह्यशुद्धी करिता ज्ञानस्नानच मोक्ष देणारे आहे ॥३४॥वटबीजेऽपि सूक्ष्मेऽपि मायया गुणयुक्तया ॥यदस्ति सर्वता वृक्ष: कुत आधाति तद्वद ॥३५॥वटबीज अतिसूक्ष्म असते परंतु त्या बीजांत - पुढे होणारा अवाढव्य वृक्ष असतो याचे कारण माया ही गुणयुक्त आहे. तसे नसते तरपुढे होणारा तो वृक्ष त्या बीजापासून उत्पन्न झालाच नसता ॥३५॥तथैवाम्यंतरे शुद्धे बहि:शुद्ध्यंति तत्क्षणात् ॥बीजवॄटक्षादिन्यायन सर्वत्रैक्याच्छुविर्भयेत् ॥३६॥त्याचप्रमाणे वटबीज वृक्ष न्यायाने बहि:शुद्धीपेक्षा अंत:शुद्धीचीच योग्यता अधिक आहे. अभ्यंतर शुद्धिने बहि:शुद्धि आपोआप तत्कालहोते. कारण वरील न्यायाने बाह्याभ्यंतराचे ऐक्य आहे ॥३६॥ नैकततवस्वरूपं चेदुत्पन्नं ज्ञानमच्चति ॥अहं ममेती चाज्ञानभ्रमतो ह भ्रमेद्वुथा ॥३७॥एका तत्वस्वरूपाचे जर ज्ञान झाले नाही तर शाब्दिक ज्ञान विफल होते. मी आणि माझे ह्या भ्रमांत प्राणि व्यर्थ गुरफटला जातो ॥३७॥दुर्लभो विषयत्यागी दुर्लभं तत्वदर्शनं ॥बुर्लभा सहजावस्या सद्गुरो: करूणां विना ॥३८॥विषयांचा त्याग करणारा पुरुष किंवा तत्दर्शन ही जशी दुर्लभ आहेत त्याचप्रमाणे सद्बुगुरुंच्या कृपेवाचून सहजावस्थाप्राप्त होणे दुर्लभ आहे ॥३८॥ऋषिसिद्ध उवाच ।कथं भगवतो ज्ञानं शुद्धमत्यन्तमुद्भवेत् ॥तत्रोपायं मुने ब्रूहि मयि तेऽनुग्रहो यदि ॥३९॥ऋषिसिद्ध म्हणतात:- हे मुने, माझ्यावर जर आपला अनुग्रह असेल तर अत्यंत शुद्ध असे भगवंतांचे ज्ञान कसे उद्भवेल त्याचामला उपाय सांगा ॥३९॥कपिल उवाच ।जाग्रत्स्वप्नसुषुप्त्यादिप्रपंचो यत्प्रकाशित: ॥तद्वह्याहमिति ज्ञात्वा सर्वबंधात्प्रमुच्यते ॥४०॥कपिल म्हणतात - जाग्रत्, स्वप्न आणि सुषुप्ति इत्यादी अवस्थामय प्रपंच ज्याच्याकडून प्रकाशित होत तेंच ब्रम्ह होय असें जाणल्याने प्राणी सर्वं बंधातून मुक्त होतो. ॥४०॥ N/A References : N/A Last Updated : January 01, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP