प्रासंगिक कविता - डफगाणें

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


भोंवतो डोंगराचा फेर । मध्यें देवाचें शिखर । पुढें मंडप सुंदर । नवखणांचा ॥१॥
चहुं खांबांची रचना । वरत्या चोवीस कमाना । कम कटाव नयना । समाधान ॥२॥
नाना तरु आंबे बनें । दोहींकडे वृंदावनेम । वृंदावनें जगज्जीवनें । वस्ती केली ॥३॥
पुढें उभा कपिवर । पूर्वेकडे लंबोदर । खालीं दाटले दरबार । ठायीं ठायीं ॥४॥
दमामे चौघडे वाजती । धडाके भांडयांचे होती । फौजा भक्तांच्या साजती । ठायीं ठायीं ॥५॥
माहीमरातबे निशाणें । मेघडंबेरें सूर्यपानें । पताका छत्र्या सुखासनें । दिंडया विंझणे कुंचे ॥६॥
काहळें कर्णे बुरुंग बांकें । नानाघ्वनीं गगन झाके । बहू वाद्यांचे धबके । परोपरी ॥७॥
टाळ मृदंग उपांग । ब्रह्मविणे चुटक्या चंग । तानमानें माजे रंग । हरिकथेसी ॥८॥
घंटा घंटा शंख भेरी । डफडीं पांये वाजंतरीं । भाट गर्जती नागरी । परोपरी ॥९॥
उदंड यात्रेकरू आले । रंगीं हरिदास मिळाले । श्रोते वक्ते कथा चाले । भगवंताची ॥१०॥
नाना पुष्पमाळा तुरे । पाहों जातां भडगे रंगपुरे । स्वर्गींचा उतरे । ठायीं ठायीं ॥११॥
गंध सुगंध केशरें । उदंड उधळिती धूसरें । जगदांतरें हरिहरें । वस्ती केली ॥१२॥
दिवटया हिलाल चंद्रज्योति । नळे अरडत ऊठती । बाण हवाया झरकती । गगनामध्यें ॥१३॥
उदंड मनुष्यांचे थाटे । दिसताती लखलखाटे । एकमेकांसी बोभाटें । बोलविती ॥१४॥
उदंड उजळिल्या दीपिका । नामघोष करताळिका । कित्येक म्हणती ऐका ऐका । ऐसे शब्द होती ॥१५॥
खिरापतीची वांटणी । तेथें जाहलीसे दाटणी । पैस नाहीं राजांगणीं । दाटी जाहली ॥१६॥
रंगमाळा निरांजनें । तेथें वस्ती केली मनें । दिवस उबावला सुमनें । कोमाइली ॥१७॥
रथ देवाचा ओढिला । यात्रेकरां निरोप झाला । पुढें जावयाचा गलबला । ठायीं ठायीं ॥१८॥
भक्तजन म्हणती देवा । आतां लोभ असूं द्यावा । धन्य सुकृताचा टेवा । भक्ति तुझी ॥१९॥
दास डोगरीं राहतो । यात्रा देवाची पाहतो । देव भक्तासवें जातो । व्यानरूपेम ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP