प्रासंगिक कविता - सावधता प्रकरण

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


एके समयीं आपलें सर्व राज्य स्वामीस अर्पण करावें असें मनांत आणून
त्याप्रंमाणें कागदपत्र केले आणि महाराजांनीं ते स्वामी भिक्षेस आले असतां
त्यांच्या झोळींत टाकलें, त्या वेळीं केलेला बोध
कोणाचा भरंवसा न धरावा । आपुला आपण विचार पहावा ।
तकवा उदंड धरावा । हर एक विषयीं ॥१॥
देहदु:खें कदरों नये । उदंडचि करावे उपाय ।
मग सर्व सुखाला काय । उणें आहे ॥२॥
एकांतीं चाळणा करावी । धारणा उदंड धरावी ।
नाना विचारणा करावी । अरिमित्रांची ॥३॥
प्रयत्नीं चुकों नये । सुखवासी कामा नये ।
सुचावे नाना उपाय । अनेक विषयीं ॥४॥
धुरेनें धीर सोडूं नये । मुख्य प्रसंग चुको नये ।
उद्योगरहित कामा नये । पशू जैसे ॥५॥
उपाधीस कंटाळा । विचाराचा आळस आला ।
म्हणजे जाणावा चेवला । बुद्धीपासूनी ॥६॥
खबरदारी आणी वेगीं । तेणें सामर्थ्य चढे अंगीं ।
नानाप्रसंगें कार्यभागीं । अंतरचि न पडे ॥७॥
कार्यकर्ते दूरी करावे । प्रसंगीं सवेंचि हातीं धरावे ।
परंतु शोधोनि पाहावे । कपटाविषयीं ।
जेथें बहु विचार । तेथें ईश्वरअवतार ।
मागें झाले थोर थोर । धके चपेटे सोसोनी ॥९॥
आपुल्या मनासी रोधावें । परांतर शोधावें ।
क्षणक्षणां सांभाळावें । बदलेल म्हणूनी ॥१०॥
पाहिलेंचि पाहावें । केलेंचि करावें ।
शोधि-लेंचि शोधावें । राज्यकारण ॥११॥
इशारतीचें बोलतां नये । बोलायाचें लिहूं नये ॥
लिहावयाचें सांगू नये । जबाबीनें ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP