प्रासंगिक कविता - रामरूपी भूत

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


पद.
होतें वैकुंठींचे कोनीं । शिरलें अयोध्याभुवनीं । लागे कौसल्येचे स्तनीं । तेंचि भूत गे माय ॥१॥
जातां कौशिकाराउळीं । अवलोकितां भयंकाळीं । भयंकाळीं । ताटिका ते छळोनि मेली । तेंचि भूतo ॥२॥
मार्गीं जातां वनांतरीं । पाय पडला दगडावरी । पाषाणाची झालीं नारी । तेंचि भूतo॥३॥
जनकाचे अंगणीं गेलें । शिवाचें धनु भंगिलें । वैदेहीअंगीं संचरलें । तेंचि भूतo ॥४॥
जेणें सहस्रार्जुन वधिला । तो हा तत्काळचि भ्याला । धनु देऊनि देह रक्षिला । तेंचि भूतo ॥५॥
पितयाचे भाकेशीं । कैकेयीचे वचनासी । मानुनि गेलें अरण्यासी । भूतo ॥६॥
चौदा संवत्सर तापसी । अखंड हिंडे वनवासी । सांगातें भुजंग पोसी । भूतo ॥७॥
सुग्रीवाचें पालन । वाळीचें निर्दालन । तारी पाण्यावरी पाषाण । भूतo ॥८॥
रक्षी मरणीं बिभीषण । मारी रावन कुंभकर्ण । तोडी अमरांचें बंधन भूतo ॥९॥
वामींगीं स्रियेला धरिलें । धांवुनी शरयुतीरा आलें । तेथें भरतासी भेटलें । भूतo ॥१०॥
सर्वां भूतांचें हदय । नाम त्याचें रामराय । रामदास नित्य गाय । भूतo ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP