प्रासंगिक कविता - राजधर्म

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


नमो मंगळमूर्ति विघ्रहरू । सरस्वतीस नमस्कारू । सद्नुरु संत कुलेश्वरू । दाशरथी ॥१॥
श्रोतीं मानेल तरी घ्यावें । अथवा दाटूनि सांडावें । प्रपंचाकारणें स्वभावें । बोलिलों मी ॥२॥
सावधपणें प्रपंच केला । तेणें सुखचि पावला । दीर्घ प्रयत्ने मांडला । कार्यभाग साधे ॥३॥
आधी मनुष्य ओळखावे । योग्य पाहूनि काम सांगावें । निकामी तरी ठेवावे । एकीकडे ॥४॥
पाहोन समजोन कार्य करणें । तेणें कदापि नये उणें । कार्यकर्त्याच्या गुणें । कार्यभाग होतो ॥५॥
कार्यकर्ता प्रयत्नीं जाड । कांहीएक असला हेकाड । तरी समर्थपणें पाठवाढ । केली पाहिजे ॥६॥
अभर्याद फितवेखोर । यांचा करावा संहार । शोधिला पाहिजे विचार । यथातथ्य ॥७॥
मनुष्य राजी राखणें । हींचि भाग्याचीं लक्षणें । कठीणपणें दुरी धरणें कांहीं एक ॥८॥
समयीं मनुष्य कामा येतें । तयाकारणे सोशिजे तें । न्याय सांडितां मग तें । सहजचि खोटें ॥९॥
न्यायसीमा उल्लंघूं नये । उल्लंघितां होतो अपाय । न्याय नसतां उपाय । होईल कैंचा ॥१०॥
उपाधीस जो कंटाळला । तो भाग्यापासूनि चेवला । समयीं धीर सांडिला । तोही खोटा ॥११॥
संकटीं कंटाळों नये । करावे अत्यंत उपाय । तरी मग पाहतां काय । उणें आहे ॥१२॥
बंध बांधावे नेटके । जेणें करितां चतुर तुके । ताब न होतां फिके । कारभार होती ॥१३॥
धुरेनें युद्धासी जाणें । अशीं नव्हेत कीं राजकारणें । धुराच करोनि सोडणें । कित्येक लोक ॥१४॥
उदंड मुंडे असावी । सर्वही एक न करावीं । वेगळालीं कामेम घ्यावीं । सावधपणें ॥१५॥
मोहरापेटला अभिमाना । मग तो जिवास पाहेना । मोहरे मिळवनि नाना । वरी चपेते करी ॥१६॥
देखोनि व्याघ्राचा चपेटा । मेंढरें पळती बारा वाटा । मस्त जो तो रेडा मोठा । काय करावा ॥१७॥
रायांनीं करावें राजधर्म । क्षत्रीं करावे क्षात्रधर्म । ब्राह्मणीं करावे स्वधर्म । नाना प्रकारें ॥१८॥
तुरंगशस्त्र आणि स्वार । पहिला पाहावा विचार । निवटूं जातां थोर थोर । शत्रु पळती ॥१९॥
ऐसा प्रपंचाचा विवेक । स्वल्प बोलिहों कांहीं एक । एका मनोगते स्वामी सेवक असता बरें ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP