मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|यशवंतराय महाकाव्य| सर्ग अठरावा यशवंतराय महाकाव्य अनुक्रमणिका सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पाचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग एकोणिसावा सर्ग विसावा सर्ग एकविसावा सर्ग बाविसावा सर्ग तेविसावा सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग अठरावा श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले. Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय सर्ग अठरावा Translation - भाषांतर यशवंतरायास भिल्ल होळकरापुढें घेऊन जातात - दोघांची भेट व संभाषण - यशवंतरायाचा आईस निरोप.श्लोक मग यावया जनन - भूमिला निघे । यशवंत तो फिरून मागुती बघे ॥नच त्या स्थळा त्यजुन दूर जाववे । विष - तुल्य तें विरह - दुःख जाणवे ॥१॥शिरिं घेउनी भरियले जलें घट । फिरती पुढें कितिक सुंदरी झट ॥बलिपुष्ट ही धरि दिशेस दक्षिण । गमला तदा अशुभही सुलक्षण ॥२॥म्हणतो मनीं “ शकुन चांगले असे । दिसती पुढें न कळतें घडे कसें ॥खल बांधुनी परि वध - स्थळाकडे । मज नेति हें दिसत थोर सांकडें ” ॥३॥मन सांवरे श्रवुन योगि - भाषण । स्थिर शांतता वसलि तेथ येउन ॥लव राहिलें न भय मृत्युचें तया । न करो हि होळकर वा करो दया ॥४॥“ जरि सोबती सुटति संकटांतुन । खरचीन या समयिं मी स्व - जीवन ॥खपले बळें झटुन तीन मास जे । नच यावया अरि जयांपुढें धजे ॥५॥मिळवो पुर प्रियकर स्वतंत्रता । किति या हठें सतत भांडलों स्वतां ॥म्हणुनी न होळकर कोप टाकिल । पुरताच या समयिं सूड घेइल ॥६॥स्मरतें पुन्हा वदत योगि जें वच । भलतें घडे गमतसे कधीं नच ॥असतात जे सुजन बुद्धि - संयुत । व्यवहार ते आति पूर्ण जाणत ॥७॥बघतां नरा विषय संकटामधें । करि सांत्वना विबुध गोंडसें वदे ॥परि त्यागुनी अधिक योगि बोलला । जवळील हा मजसिं आप्त भासला ” ॥८॥दिवशींच त्या नगरिं भिल्ल पोंचती । जंव पावला तपन अस्त - पर्वतीं ॥पडली मराठि बघतात छावणी । सुखि होय होळकर जेथ राहुनी ॥९॥यशवंत तो हळु पुढें करी गती । खल भोंवते मिळुन भिल्ल चालती ॥ रजपूत त्या बघति खिन्न होउनी । परि काय ते करिति शक्ति त्यां उणी ॥१०॥धरिला बळीहि यशवंतराय हा । अशि बातमी सुखद होय जी महा ॥पसरे त्वरें श्रविति दक्ष दक्षणी । भरितात ते गगन सिंह - गर्जनीं ॥११॥यशवंत सद्गुण - गणीं विराजित । जन - मान्य होळकर युद्ध - पंडित ॥बघती कसे निरखुनी परस्परां । म्हणती मनीं नर ‘ सुधन्य तूं खरा ! ’ ॥१२॥नगरी तया समयिं एक देवळीं । यशवंत होलकर भेटले बळी ॥दुसराच हा समय भेटिचा अहा ! । परि भिन्नता किति दिसे तिये पहा ! ॥१३॥बहु आदरें सुखवि पेशवा जया । मिळवून जो रणिं विराजतो जया ॥जन - मान्य होळकर आसनीं वसे । गगनांत कीं रविच कांतिनें दिसे ॥१४॥इकडे तया पुढति पौर - नायक । रजपूत - लोक - मनिं सौख्यु - दायक ॥दिसला पराजित बलाढ्यही निका । निज कांतिनें रहित चंद्रसा फिका ॥१५॥मग शूर होळकर कोप - निर्भरें । करि भाषणाप्रत कठोरशा स्वरें ॥“ यशवंत तूं म्हणवितोस आपणा । यश कायसें मिळविलेंस दुर्जना ॥१६॥कृति ज्याचिया सुजन - भव्य - दायक । प्रभु दिल्लिचा तव दयाळु मालक ॥उठलास त्यावर असें हि जाणुन । स्वजनीं अम्हावरहि शोक आणुन ॥१७॥करणी तुझीच सकळांस भोंवती । जगसी सुखें अजुन केंवि दुर्मती ॥इतुक्या जिवांप्रत तुवांच नाशिलें । फळ भोग बा स्मरून कर्म आपुलें ॥१८॥नय - मार्ग - तत्पर नृपा न मानिते । स्वजनावरी अतुल दुःख आणिते ॥तव तुल्य दुर्मद जगांत येउन । पर - वांचनें अयश जाति घेउन ॥१९॥घटल्या तुझ्या खटपटी जरी किती । धरि जन्म - भू अधिक दुःखदा स्थिती ॥नृप - कोप हा अनल - तुल्य पेटला । शलभापरी पडसि त्यांत दुर्बळा ! ॥२०॥तुज दोहना हि तव मित्र मंडळा । झणि धाडितों करून बद्ध दिल्लिला ॥तुज भेटणें निज सुहज्जना जरी । दवडीं वृया समय हा न तूं तरी ॥२१॥झगडून तूं सतत तीन मास ते । बहु नाशिसी स्वजन दुःख वाटतें ॥किति पावले विलय वीर कीं हिरे । धन खर्चिलें गणित त्यास कायरे ! ॥२२॥असुनी असे हि यशवंटराजया । मज वाटतें उचित दाखवूं दया ॥असतां तया समयिं कोटियामधें । मन दाविसी सरळ थोर सौख्य दे ॥२३॥उठलास ज्यावर हत्यार घेउन । अतिरुष्ट त्या नृपतिचें असे मन ॥बचिं गुंतलों म्हणुन त्याचिया न ये । तुज मोकळें करूं अकीर्तिच्या भयें ॥२४॥परि होति ज्या खटपटी तयांत मी । न करीं उणे तुजसिं सोडवूं श्रमीं ” ॥यशवंत ही मग तयास बोलला । परिसून होळकर डोलतो भला ॥२५॥“ छाळिलें पुरा अरि - जनीं परोपरी । किति पावलों म्हणुन दुःख अंतरीं ॥रजपूत मीं जमविले लढावया । अपराध तूं म्हणसि त्यास कासया ? ॥२६॥पति दिल्लिचा अति बलाढ्य तो जरी । करूनी कृपा नृपति - धर्म आचरी ॥तरि कायसी गरज होय संगरा । क्षण हा मनीं कर विचार तूं खरा ॥२७॥शिव भूपती स्वजन - सौख्य - वर्धन । करि साहसी झटुन शत्रु - मर्दन ॥पथ योग्य मीं धरियला असून तो । तुज काय बा म्हणुन कोप आणितो ! ॥२८॥जुलमी अशा नृपतिशीं लढावया । उठलों बळें यश दिगंतिं न्यायया ॥पुरवूं मधें पडसि तूं स्वहेतुला । अपराधि यास्तव म्हणेन मी तुला ॥२९॥भुवनीं मराठि सरदार झुंजती । यवनासवेंच परि वैर बांधिती ॥निज धर्म त्यां सतत वाढवूं मती । करणी तुझी उलट त्यांत जाण ती ॥३०॥करितास तूं न जरि चाल या पुरीं । धन - वासनाच पुरवावया खरी ।नगरांत या समज सर्वही जन । असतों बलाढ्य धन - धान्य - वर्धन ॥३१॥तव दुर्नयेंकरून मृत्यु पावतों । परि खेद यास्तव मला न वाटतो ॥किति मारिले असति लोक तूं बळें । अपराध ज्यां न शिवलाहि ते भले ॥३२॥जरि दंडणें तुजसिं होय नागरां । तव दंड तो मजवरी पडो बरा ॥जन अन्य ते निरपराधि जाणणें । वधितोस त्यां धरून काय कारणें ? ॥३३॥सकळांस मीं उठविलें म्हणोनियां । तरवरि भेटुत गळ्यास माझिया ॥तव कोप - वन्हिंत पडेन आहुती । जन सर्व जाउत घरास मागुती ॥३४॥समरांत आजवर वीर थोरसे । पडले अनाथ जन अन्य ही तसे ॥मग रक्त शिंपडुन भूमिच्या तळा । इतरांस रक्षण करीन दुर्बळां ॥३५॥अनयें तुझ्या मुकति लोक जे जिवा ! करिती मलीन तव कीर्ति - वैभवा ॥सरशील काय अजुनीहि मागुती ? । पुरली न घातकर हांव काय ती ? ” ॥३६॥यशवंत शांत गुणवंत यापरी । वदुनी उभा असुन मौन तो धरी ॥मग त्यास होळकर दूर न्यावया । कथितो मनीं उपजली जरी दया ॥३७॥जवळीच वास - गृह जें उभारिलें । जन पौर बांधुन जियेहि ठेविले ॥तिकडे शिपाइ यशवंत याप्रत । झणि नेति ते विजय - दुर्मदोद्धत ॥३८॥निज मित्र दोहन हि मान सागर । यशवंत पाहत अनेक नागर ॥दृढ शृंखला चरण - हस्त - बंधन । जखमा शरीरिं बहु आतळे मन ! ॥३९॥झुजणार मर्द करणार कीर्तिला । अतिशूर जाणति न मृत्यु - भीतिला ॥बसले तिथे अचल काय पर्वत । करि इंद्र ज्या समयिं पक्ष खंडित ॥४०॥रडले तया बघुन दुःख पावले । जणु जीव बाहिरच जाउं धांवले ! ॥यशवंत सांत्वन करी मृदु - स्वरें । सुखवी क्षणैक निज मित्र ते खरे ॥४१॥तंव येउनी म्हणत एक चाकर । “ असला हुकूम जरि कांहि तो कर ॥उपजून त्वद्गृहिंच पूर्ण वाढलों । पदरीं तुझ्या वसुन सौख्य पावलों ॥४२॥तुजसारखे न ममाताळु मी धनी । बघणार यास्तव मरेन हें मनीं ॥म्हणुनीच शेवटिल भेट घ्यावया । बसलों इथे मजवरी करी दया ! ” ॥४३॥यशवंत सेवक जनांत भक्तिला । बघुनी अशा गहिंवरास पावला ॥पडतांच संकट सुमित्र सोडिती । म्हणतात ते जन असत्य बोलती ॥४४॥“ सखया खुशाल द्घरिं जा सुखें रहा । सुख - होय जेंवि जननीस तें पहा ॥हत - भाग्य पुत्र नसतां तिला कसें । तुजसारख्याविण सुखास येतसे ? ॥४५॥प्रिय माय पुष्ण्य - चरिता वसे घरीं । तिस सांगतों कळविं नीट यापरी ॥मीनं तत्पदें स्मरून सौख्य मानितों । परि नेत्र केंवि निववूं ? न जाणतों ॥४६॥तव पुत्र मी चरणिं नम्र होउनी । करिं शेवटील विनंती धरीं मनीं ॥उदरीं तुझ्या जननि जन्म घेउन । नच कांहिं केलि करणीं ह्मणे मन ॥४७॥मज हौस फार रणशूर होइन । तरवार गाजविन कीर्ति घेइन ॥परि इष्ट होय जगदीश्वरा न तें । म्हणुनी चरित्र मम खुंटतें इथे ! ॥४८॥ह्मणवूं सुधन्य वदनांतुनी तव । करणी अचाट करितों जगीं नव ॥जरि कांहिं काळ जगतों महीवरी । परि हाय ! हें घडतसे कसें तरी ! ॥४९॥मजपासुनी सुख तुला किती मिळे । जननी अभाग्य तनुजास हें कळे ॥परि पुत्र - वत्सल दया - नदोद्भव । करिसी कृपा धरिसि थोर गौरव ॥५०॥मम नाश दिल्लि - पति चिंतितो जरी । तरि काय होळकर तो कृपा करी ॥फिरलें समस्त मम दैव हें असें । म्हणुनी निराश मम जीवनीं वसें ॥५१॥मम मृत्यु - शोक लव ही न तूं करी । न उदास - वृत्ति किमपी हि तूं धरीं ॥झुरणीस लावुन न देह शोषणें । न च दुःख ० शकुं हृदयांत पोषणें ॥५२॥मज एकदा जननि बोलसी अतां । करिं सत्य वागुन तसेंच तूं स्वतां ॥कुळ उच्च त्या उचितसें च वागणें । प्रभु - रोष बैसुन निमूट सोसणें ॥५३॥जरि पौर ते मजसिं दोष देतिल । तरि त्यांस सांग जरि रुष्ट होतिल ॥झटलों तया हित करूं मनांतुन । मरतों करून मम देह अर्पण ॥५४॥धन फार जें किसनदास मेळवी । गरिबांस दे सकल त्यांस तोषवीं ॥तव दुःख जीर्ण तनु तींत शोक हा । खिळवूं नको दृढ सुशांत तूं रहा ॥५५॥जन्मास येउन सुखांतच नित्य राहे ।कोणी असा न नर या भुवनांत आहे ॥दुःखें सुखें सकल भेटति जीव - मात्रा ।आई ! विचित्र जगिं या परि लोक - यात्रा ” ॥५६॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP