मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|यशवंतराय महाकाव्य| सर्ग तिसरा यशवंतराय महाकाव्य अनुक्रमणिका सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पाचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग एकोणिसावा सर्ग विसावा सर्ग एकविसावा सर्ग बाविसावा सर्ग तेविसावा सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग तिसरा श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले. Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय सर्ग तिसरा Translation - भाषांतर यशवंतराय दोहनसिंगाच्या घरास जाण्याकरितां निघतो - मध्यरात्रीचे वर्णन - दोहनसिंगाचें भाषण - रजपूत लोक यशवंतरायास आपणांमध्यें मुख्य नेमितात - यशवंतरायाचें भाषण - बंडाची तयारी - आठ दिवसांत मोंगलांशी युद्ध सुरू करण्याची तयारी करण्यास यशवंतराय कोट्यांतील लोकांस हुकूम करितो.श्लोक मातृ - पाद यशवंत नमोनि घे । धीट दोहन - गृहास तदा निघे ॥हो जयी कुशल - संयुत बाळका ! । ती वदे स्मर चराचर - पाळका ॥१॥कृष्ण - वर्ण धरि वेष महाबळी । घे कट्यार तरवार सवें भली ॥माय आर्जव करी बहु तो परी । घे न चाकर हि एक बरोबरी ॥२॥सामसूम जिकडे तिकडे गमे । स्वच्छ पाहुन नभाप्रत तो रमे ॥तारका चमकती नभ - मंडळीं । कांति राजप्थिं त्यांचि फांकली ॥३॥पारिजात फुलले सुर - काननीं । हीं फुलें विलसती गमलें मनीं ॥कीं हिरेजडित सुंदर सुंदरी । भूषणें विमल - कांति निशा धरी ॥४॥शांतता त्रिभुवनास लाभली । प्राणिमात्र निजले निजस्थलीं ॥पाहुनी कृपण काढि निर्भय । आपुला गगन रत्न - संचय ॥५॥उंचसा गगन - मंडप थोर हा । बांधुनी रुचिर आवडिनें पहा ॥रात्र पाजळुन दीपक तारका । वाट पाहि पतिची अति उत्सुका ॥६॥दोन बाजुस उभे अचल - स्थिति । राक्षसांसम भयंकर दीसती ॥राज - मार्ग - गत वस्तुंस पाहती । हर्म्य कान जणु देउन ऐकती ॥७॥जें दिनीं गजबजाट करी महा । शांत या समयिं पूर्ण दिसे अहा ! ॥अंधकार - जलधी पसरे वरी । कीं बुडे सकल सृष्टि तदंतरीं ॥८॥श्वान कारण नसून हि भुंकती । भीरू मार्ग - गत लोक चपापती ॥शब्द जो करितसे पद आपुलें । तो भयें श्रवुन अंग थरारलें ॥९॥ज्यांस नाहिं घरदार असे जन । दीन अंध पडतात पथांतुन ॥थंडिनें प्रखर विव्हळ जाहलीं । इंद्रियें, उदरिं भूक धडाडली ॥१०॥व्यर्थ हारविति यौवन ही धन । जातसे वय झरून दिनोदिन ॥तें गणून न मदांध सुखी जन । खेळतात गणिका - सदनांतुन ॥११॥सारमंडळ सतार हि ताउस । वाजतात खुलतो पहिला रस ॥गोड वार - युवती - गृहिं गायन । चाललें परिसतात पथीं जन ॥१२॥यापरी बघत ऐकत चालला । दोहनालय बघे मग थांबला ॥निश्चितार्थ करुनी मग एकदा । ठेवि आंत यशवंत पदा तदा ॥१३॥स्वागता करिति पाहुन आगत । त्यास ते जय - रवें जन गर्जत ॥“ ये सख्या ! पळविं आमुचि काळजी । वाट पाहत असों बसलों तुझी ” ॥१४॥त्यांस दक्ष कमला - सुत पाहुन । विस्मयें स्मित करी मग आपण ॥दिल्लिरें छळियलें अति यास्तव । सूड घेउं जमले नर - पुंगव ॥१५॥द्वेष पूर्व विसरून मनांतले । एक देश - रिपु - वारणिं जाहले ॥निश्चया धरिति संकट ये जरी । घोर, सोडिल कुणी न कुणा तरी ॥१६॥पूर्वजीं श्रम करून मिळीविली । वंशजांसहि अबाधित चालली ॥खान घे वतनवाडि हिरावुनी । कोप यास्तव किती धरिती मनीं ॥१७॥भोगिले अमित भोग परोपरी । संपदा विपुल ती असतां घरीं ॥घान घे लुटुन दीन करी जयां । येति तेथ किति रोष चढे तयां ॥१८॥हिंदु आणि यवनांत सुदुस्तर । जाहला कलह थोर भयंकर ॥पक्षपात करि त्यांत हि दिल्लिर । द्वेष यास्तव कितींस अनावर ॥१९॥आप्त इष्ट जन बाटवुनी मदें । तत्कुलां सतत खान अकीर्ति दे ॥दुःख रात्र्दिन अंतरिं जाचतें । सांगण्यास जमले किति जाच ते ॥२०॥घेतल्या हरून रूपवती सुना । कन्यकाहि कितिंच्या अणि अंगना ॥तत्पती श्वशुर बाप तिथें तसे । येति कीं दुखविले जणु सर्पसे ॥२१॥धीर - मानस उदार दयाकुल । संपदा अतुल थोर जया बल ॥देश मुक्त करूं इच्छिति जे भले । दोहनालयिं किती जण पातले ॥२२॥जाहलीं विपुल ज्यांप्रत कारणें । यावयास, सकलां रिपु वारणें ॥त्या जनास कमला - प्रिय - नंदन । बोलतो करूनियां मग वंदन ॥२३॥“ पाहतों सुदिन आज विलोचनीं । थ्रो हें सुख उचंबळतें मनीं ॥एक होउन करूं कट हा जरी । सत्य देइल यशास तरी हरी ” ॥२४॥भाषण - क्रम करी मग दोहन । मान्य नागरजनां मनमोहन ॥“ मी तुला वदतसें वच तत्वतां । मित्र - संमत सख्या कमला - सुता ॥२५॥हें मनास गमलें अमुच्या तरी । साहसी समर धीर तुझ्या परी ॥एकही क्षण बसेल न मागुती । धीर येइल पुढें धरूनी धृती ॥२६॥न्याय - मार्ग चिर आपण आचरी । काळजी करून रक्षि परोपरी ॥जो प्रजा - जन - हितास्तव भागला । लोक - नाथ म्हणती बुध त्याजला ॥२७॥त्याविरुद्ध जरि आचरिते प्रजा । आपदा वरिल ती प्रभु - कोप - जा ॥पुण्य - शील नृपतीस अशा जन । ताप देति तरि युक्तचि दंडन ॥२८॥मान्य होय जरि तत्पर रक्षणीं । दिल्लिनाथ तरि तो अमुचा धनी ॥मार्ग तो त्यजुनियां छळणा करी । बंधन त्यजुन आम्हि सरूं दुरी ॥२९॥क्रूर हा विसरला नय दिल्लिर । त्रास यास्तव पुरास अनावर ॥आजपासुन तया अरि मानितों । कृत्य हें सकल - संमत जाणतों ॥३०॥थोर जाणुन तुझ्या सकला कृती । सर्व लोक तुज नायक नेमिती ॥तूं कुशाग्रमति शूर गुणी भला । नांव योग्य यशवंत असो तुला ” ॥३१॥यावरी वदतसे कमला - सुत । लोक होउन समुत्सुक ऐकत ॥व्यक्त विस्तृत रसाळ सरस्वती । धन्य होय वदनांतुन वाहती ॥३२॥“ देश - बांधव तुम्ही सगळे मम । देश - मुक्तिकरितां करितां श्रम ॥हेंच पुण्यकर युक्त तुम्हां असे । यास पूर्ण मम संमति येतसे ॥३३॥ज्ञान होय इतिहास - निरीक्षणें । पूर्विचीं भरत - भूमिमधें धनें ॥याच दुष्ट यवनीं हरिलीं वृकीं । एक देशहि न ठेवियला सुखी ॥३४॥आपुले प्रबळ वैरि पठाण जे । लांडग्यांचिच जयां उपमा सजे ॥कां जुलूम करिते विविधापरी ? । साहतों प्रथम तो न भयें जरी ॥३५॥कां आम्हांस अपमान दरिद्रता । क्लेशदुःख अपकीर्तिहि दीनता ॥मूळ मालक असून जमीनिचे । कां न रक्षण करूं शकलों तिचें ? ॥३६॥आळशी बसुन शांत गृहांतरीं । झोंप ही धरिली आज दिनावरी ॥मान आपण च शत्रु करीं दिली । युक्ति एक सुटण्यास न पाहिली ॥३७॥थोर सुंदर गृहें सुख - वाहनें । वैभवीं डुलत संतत राहणें ॥भोगितो सकळ दिल्लिर कां असें ? । मान थोरपण कोठून या असे ? ॥३८॥दिल्लिरेंकपट दुस्तर दाविलें । पाशि या दृढतरीं जन गोंविलें ॥भासली न परतंत्रपणा बिडी । दे अतां परम कष्ट घडोघडी ॥३९॥वाटतें परि सुदैवच हें मला । शत्रु कोण तुमचा झणि जाणिला ॥तन्निवारण - पथाप्रत लागलां । योग्य शूरसम संकटिं वागलां ॥४०॥लाभ यांत भलताहि न योजिला । कार्य हें परि पवित्र गमे मला ॥आसनीं शयनि भोजनि तत्वतां । देश - मूमि - हित होइन चिंतिता ॥४१॥एक होउन उठूं न बसूं क्षण । मारूनी अरि करूं पुर - रक्षण ॥पूर्वजीं कृत पराक्रम आठवूं । दिल्लिला परत दिल्लिर पाठवूं ॥४२॥संकटांतरिं सुखांत रणामधीं । द्याल सोडुन मला न तुम्ही कधीं ॥खातरी करून द्या मजला धरा । जान्हवी - जळ करें शपथा करा ” ॥४३॥या श्रवून यशवंत - वचा तिथें । इच्छिते गमन संमत सत्पथें ॥तत्क्षणींच करिती शपथा करें । घेउनी जल सुपावन जें खरें ॥४४॥“ रक्त - बिंदुहि तनूंत उरेल या । जाउं जोंवरि अम्ही न पुरे लया ॥तोंवरी तुजसवें करूं राहणें । अर्पिली तनु धनें अणखी मनें ” ॥४५॥यावरी पुसतसे कमला - सुत । दोहनास हत - शत्रु - यशाप्रत ॥साधनें किति करूं शकतां जर । प्राप्त होय यवनांसह संगर ॥४६॥तो बोले “ भट पंचवीस शत जे पायीं रणा चालते ।तैसे आठ सहस्र शिक्षित हयी कोणा भया नेणते ॥आणूं आज घडे जरी रण तयां दुष्टांसवें तुंबळ ।आम्हीं दुर्मद दिल्लिरास अमुचें युद्धांत दावूं बळ ॥४७॥हा कोटापुरिं बेत सात महिन्यांपूर्वींच झाला सुरू ।मी माझे प्रियमित्र पूर्ण झटलों साहित्य - सिद्धी करूं ॥‘ सेना द्रव्य अवश्य होय तितुकें मी तें तुम्हां देइन ’ ।ऐसें जोधपुराधिपें हि दिधलें आम्हांस आश्वासन ॥४८॥शेजारचे ही रजपूत राजे । कीर्ती जयांची भुवनीं विराजे ॥देतील धांवून अम्हांस साह्य । आलें जरी संकट दुर्निवार्य ॥४९॥भाट, जोशि, हरिदास, पुराणिक, । धर्मशास्त्र कथणार, सुमांत्रिक ॥धर्म - युद्ध करण्यास्तव पावन । जाउनी उठवितील जवें जन ॥५०॥आहे पहाडीं अजमीर दुर्ग । नेऊं तिथें स्त्रीजन आप्त - वर्ग ॥दुर्गाधिकारी मम मित्र राहे । तो या कटाला अनुकूळ आहे ” ॥५१॥बोले तयास यशवंत सुधी उदार ।जो दूरसा करितसे हृदयीं विचार ॥हा खान दिल्लिर भपाकुल जाहलाहे ।राहे म्हणून सुख - जेय गमे मला हें ॥५२॥साह्यास यास जरि येइल राजसेना ।जिंकावयामग उपाय तया दिसेना ॥येईल लौकर तसा म्हणुनीच आणूं ।युद्ध - प्रसंग पुर घेउं अरींस हाणूं ॥५३॥सवे सैन्य घेऊन जाऊं रणांत । व्यवस्था अशी आठ व्हावी दिनांत ॥म्हणोनी तयासी कराया निघावें । तुम्हीं सर्व ही आपुल्या स्थानिं जावें ॥५४॥परिसुन वच त्याचें जाहला हर्ष फार ।अरिस म्हणति शस्त्रें दाखवूं एकवार ॥कितिक दिन असा हा इच्छिताहों प्रसंग ।चिरतर सुख पावूं खेळुनी रक्त - रंग ॥५५॥दंग्यापासुन खान दीन अपुलें लागे करूं रक्षण ।पश्चात्ताप तया भयातुर मन स्थानी वसे न क्षण ॥तन्नाशा वळले मनीं खवळले क्रोधानळें पेटले ।ऐसे पौर पराक्रमी निज - गृहां जाया पथीं पातले ॥५६॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP