मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|यशवंतराय महाकाव्य| सर्ग अकरावा यशवंतराय महाकाव्य अनुक्रमणिका सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पाचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग एकोणिसावा सर्ग विसावा सर्ग एकविसावा सर्ग बाविसावा सर्ग तेविसावा सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग अकरावा श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले. Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय सर्ग अकरावा Translation - भाषांतर दिल्लिरखान यशवंतरायास ठार मारण्याकरितां बादल या नांवाच्या भिल्लास पाठवितो - तो भिल्ल यशवंतरायास गांठतो - द्वंद्व युद्ध - बादल जखमी लागून पडतो - तो मरतांना कृतकर्माबद्द्ल पश्चात्तप दाखवितो - जुनी ओळख - यशवंतराय भिल्लास आश्वासन देतो - प्राणोत्क्रमण - विलक्षण मसलत - दिल्लिरखानास ठार मारण्याकरितां यशवंतराय बरोबर कांहीं निवडक लोक घेऊन निघतो - चांदण्या रात्रीचें वर्णन - मराठ्यांच्या छावणींत प्रवेश - दिल्लिरखानाचा वध - मोगलांची धांदल. श्लोक कोटापुराभोंवतिं नित्य यापरी । मल्हार तो युद्ध हळू हळू करी ॥वार्ता घडे एक पुरांत अद्भुत । पौराग्रणी शौर्य जयांत दावित ॥१॥सारून रात्रीं यशवंत भोजन । आला महालीं अपुल्या जिन्यांतुन ॥टाकी हळू तो पद हिंडतो सुखें । स्तोत्रें पवित्रें म्हणतो तिथे मुखें ॥२॥होता दिवा एकच टांगला वरी । जो भोंवतीं अंधकशी प्रभा करी ।तींतून चाले यशवंतराय तों । येतां तिथे एक मनुष्य पाहतो ॥३॥होती जया उंच भयाण आकृती । नेत्रीं हिरे कीं जणु दोन शोभती ॥अंगें कठोरे बहु - शक्ति - संयुत । कोणी असा दुष्ट मनुष्य भासत ॥४॥आला पुढें तो तरवार सांवरी । मुद्रा तयाची दिसण्यांत बावरी ॥बोले कठोर - स्वर काय भाषण । आश्चर्य दावी यशवंत ऐकुन ॥५॥“ आयुष्य - तंतू तुटणार या स्थळीं । मी हा तुझा नाश करीतसे बळी ॥रक्षावया देवहि होय न क्षण । जाशील कोठें न करांतुनी मम ॥६॥आयुष्य कांहीं क्षण शिष्ट राहिलें । तूं ईश्वराचीं स्मर त्यांत पावलें ॥जो बुद्धि देतो मजला करावया । हें कर्म कीं प्राण तुझे हरावया ” ॥७॥बोलूनियां दृष्ट पुढेंच धांवला । अत्यंत कोपा यशवंत पावला ॥“ माझ्याच हातें मरणें तुवां असें । दुष्टा कपाळीं लिहिलें तुझ्या असे ” ॥८॥उड्डाण मारी वर हात ठेवुन । तो जागच्याजागिं उभाच राहुन ॥जी गुप्त होती तुळईंत ठेविली । एका क्षणीं ती तरवार काढिली ॥९॥बोले - “ तुझा नाशक मी असें उभा । ये तूं पुढें पूर्ण तुला असे मुभा ॥त्वत्तुल्य आले जरि वैर ते दहा । मी लोळवीतों इतक्यांतही पहा ॥१०॥पाणी दिलें या तरवारिला नवें । त्याची परीक्षा करण्यास आठवे ॥चाले शरीरीं तव चांगली जरी । कारागिरा देइन मोल मी तरी ! ” ॥११॥ते दोनही मंडळ घेउं लागती । संधी कराया मग वार पाहती ॥जैशा विजा त्या तरवारि नाचती । होतो तिथे शब्द खणाखणा किती ॥१२॥संक्षेप विक्षेप शरीर - दृष्टिला । प्रक्षेप शास्त्रां चिर तेथ चालला ॥क्रोधामधें ते मणिबंध चावितो । आकाशपृथ्वी करूं एक पाहती ॥१३॥जों जों घडे चापल शस्त्र - संगरीं । प्रत्येक उत्साह मनीं नवा धरी ॥प्रत्येक ते अद्भुत डाव दाविती । आलाच हातींनिज शत्रु भाविती ॥१४॥जें आवडे शस्त्र तया तया मिळे । दोघांस होतीं बहु योग्यशीं स्थळें ॥प्रत्येक मोठा आपणास मानितो । झाला चमत्कार कथील कोण तो ! ॥१५॥त्या काळिं कोट्यामधिं खङ्ग घेइल । दावील मोठें कमला - सुता बळ ॥होता न कोणी नर धन्य यापरी । ज्यापास्नी तो यशवंत भी धरी ॥१६॥तेव्हां चमत्कार मनास वाटला । धास्तीहि कांहीं यशवंत पावला ॥आहे तरी कोण उभा पुढें असा । जो घात पाहे करण्यास काळसा ॥१७॥तारूण्य उत्साह सुहस्त - कौशल । अंगांतलें थोरहि मूळचें बळ ॥तें जागच्या जागिंच सर्व राहिलें । येऊन हें संकट थोर कोसळे ॥१८॥द्यायस धापा यशवंत लागला । शक्ती गळूं लागलि फार भागला ॥बिंदू कपाळावर घाम सांठुन । व्यायाम तो हस्तपदांस होय न ॥१९॥बोलावुं कोणास सहाय काय मी ? । झालों असें या समयास मी श्रमी ॥वाटे असें मान - धनास त्या पुन्हा । तो एकटा साह्य नसोच आपणा ॥२०॥अंगी पुन्हा हिंमत एकदा धरी । चालून गेला मग तो अरीवरी ॥ऐसा करी एकच वार कीं बळें । जेणें जणो डोंगर वैरि कोसळे ॥२१॥मारेकरी तो पडला महीवर । येऊन मूर्च्छा पसरूनियां कर ॥डावे कुशी वार असाध्य जाहला । त्यांतून तों रक्त पडे भळाभळा ॥२२॥पौरेश आश्चर्यभरें बघे पुढें । मारेकरी दृष्टिस त्याचिया पडे ॥ठेवून खङ्गावर हात ओणवे । पोटीं दया पाहुन शत्रु जाणवे ॥२३॥धांवून आलीं वर कांहिं माणसें । तों त्यांस मूर्च्छागत वैरि तो दिसे ॥राहे न्यहाळीत तया उभा धनी । आश्चर्य हें पाहुन होतसे मनीं ॥२४॥बोले दयार्द्रांतर काय चाकरां । “ व्हाहो पुढें सावध त्याजला करा ! ॥त्या बापुड्या कांहिं असेल बोलणें । बोलो सुखें त्यास न यांत वांचणें ॥२५॥जाणावया उत्सुकता असे जरी । दुष्टास या प्रेषण कोण तो करी ? ॥जाणाल तेंही पुरवाच हेतु हा । होईल तो सावध कीं पहा पहा ! ” ॥२६॥हळू हळू सावध दुष्ट जाहला । स्वनेत्र पाहूं उघडून लागला ॥मुखांतुनी अस्फुट शब्द काढितो । बघून दैन्यें जल पूर्विं मागतो ॥२७॥जाऊन बैसे जवळी धरी कर । बोले हळू तो यशवंत सुस्वर ॥“ मीं काय केला अपराध थोरसा । आलास घ्याया जणु सूड तूं असा ” ॥२८॥मारेकरी तो करि नेत्र खालते । काढी प्रयत्नें मग खोल शब्द ते ॥“ मी क्रूर - कर्मा अति दुष्ट बादल । घ्याया नसें योग्य तुझ्या घरीं जल ॥२९॥दिल्लीर धाडी मज मारण्या तुला । आलों मनीं दुष्ट धरून हेतुला ॥भिल्लांतला नायक मीच बादल । ज्याचे भयें ऐकुन कांपती बळ ” ॥३०॥हे ऐकतां विस्मय फार जाहला । मोठ्या स्वरानें यशवंत बोलला ॥“ तूं काय तो बादल ? नांव ऐकुनी । होतें पहावें तुजला असें मनी ॥३१॥भिल्लामधें नायक तूंच काय तो ? । कीर्ती जयाची जन सर्व जाणतो ॥राजे हि होते तुज भीत बापुड्या ! । आलास कर्मेंच दशेस येवढ्या ॥३२॥तू वाटमार्या बसणार काननीं । पांथस्त लोकां लुटणार हाणुनी ॥या देशिं कोणी नव्हता तुझा अरी । जो खङ्ग - युद्धास तुझ्या सवें करी ॥३३॥अंगीं असोनी गुण ते सहस्रशा । कामांत आला नसतास तूं अशा ॥होतास मोठा चढतास योग्यते । आयुष्य गेलें तव व्यर्थ वाटते ! ॥३४॥जगन्नियंत्या परमेश्वरास हें । नराधमा ! कर्म तुझें कसें सहे ? ॥म्हणोन मेलास करींच माझिया । पराभवातें वरिताय कासया ? ॥३५॥शत्रुत्व संपादुनि दिल्लिरासवें जो लाजवी होळकरा पराभवें ॥आहें अस अमी तुज हेंच ठाउक । मी कोण ही देइन आज ओळख ॥३६॥चोवीस वर्षे घडलीं कथेस या । तो काळ तूं आठव टाकुनी भया ॥होतास तेव्हां मद - मत्त यौवनें । हत्तीपरी हिंडत घोर तीं वनें ॥३७॥क्रूरा ! तुझें शौर्य अचाट संगरीं । नाहीं दयेचा परि लेश अंतरीं ॥घेसी जनांचीं लुटुनी धनें किती ! । तूं मारिसी जीव तयां नसे मिती ॥३८॥एका प्रसंगीं निज सेवकांसह । जातां पथीं भोगित दुःख दुस्सह ॥कोणी अशी स्त्री कमलाख्य सुंदरी । ती बापुडी सांपडली तुझ्या करीं ॥३९॥हा लाभ मोठा तुज वाटला खरा । होतास तूं जात पळून तस्करा ॥तों वीर आला जगदेव सद्गुणी । तो सोडवी तीस तुझ्या करांतुनी ॥४०॥युद्धांत मेले बहु भिल्ल सोबती । तेव्हां तुला वार हि फार लागती ॥झाले न तेव्हां परिपूर्ण शासन । आला असे हा म्हणुनीच कीं दिन ? ॥४१॥माझा पिता तो जगदेव सन्मती । माता हि माझी कमला महासती ॥ ती गांजिली त्वां अबला म्हणूनियां । मी पुत्र तीचा तव शत्रु निर्दया ” ॥४२॥बोले तदा स्फुंदत बादल स्वयें । “ माझी तुला काय म्हणून कींव ये ? ॥पापी जगीं हा परिणाम पावलों । दुष्कीर्तितें संतत पात्र जाहलों ॥४३॥औदार्यशाली स्वजनांत तूं हिरा । रक्षावया पाहसि या पुरा बरा ॥द्यावें तुला साह्य म्हणून घ्यां जरी । दुर्मार्ग दावी धनलोभ हा तरी ॥४४॥आलों जरी मी नसतो पुरांत या । देतों तुला संधि न सूड घ्यावया ॥यावा मला मृत्यु इथे तुझ्या करें । हें ईश्वरें इच्छित वाटते खरें ॥४५॥पाहून देवा ! गहना तुझ्या कृती । वाटे मना विस्मय गुंगते मनी ॥जो पातकी घातक मातला खळ । दंडावया त्या तुज मार्ग पुष्कळ ! ” ॥४६॥ऐसें वदे श्वासहि टाकि दीर्घसा । लावी वरी बादल दृष्टिला तसा ॥दुःखांत मोठ्या गत - गोष्टि आठवी । तो जन्म - भूमीप्रत चित्त पाठवी ॥४७॥आयुष्य हा मार्गच थोर चालुन । विश्रांति घेणार इथेच जाणुन ॥मागें बघे तों स्वचरित्र चित्रसे । राह एपुढें त्या भिववीतसे जसें ॥४८॥लक्षावधी लोक भिकेस लागले । याच्याच हातें किति मृत्यु पावलें ॥ मूर्ती तयांच्या दिसतात येउन । भीती उरीं जाय तदा धडाडुन ॥४९॥जो स्वर्ग या भूमि - तलावरी खरा । त्या सौख्यदायी स्मरतो मनीं घरा ॥भार्या सुगात्री तरुणी धरी मनीं । तो बाळ ही सुंदर धाकुटा गुणी ॥५०॥आणून अश्रू नयनांत बोलत । आर्त स्वरें तो कमला - सुताप्रत ॥“ कोपानळीं मी तव दग्ध जाहलों । जें कर्म केलें फळ नीट पावलों ॥५१॥विज्ञापना यास्तव नम्र मी करीं । आहेत जीं कीं मम माणसें घरीं ।त्या दुर्बळीं आग नकोच पाखडूं । घेईन मी सूड असें नको वदूं ” ॥५२॥पौरेश बोले “ भलतीच कल्पना । कां बादला येत असे तुझ्या मना ? ॥या वेळिं तूं होउन शांत चिंतणें । श्रीशंकराचींच पदें सुपावनें ” ॥५३॥तेव्हां वदे बादल काय भाषण । आतां असे निर्मळ शांत मन्मन ॥‘ हे राम ! हे राम ! ’ वदेन मी मुखें । सोडून जाईन महीतळा सुखें ” ॥५४॥नाडी हळू चालुन बंद राहिली । बर्फाप्रमाणें तनु गार जाहली ॥तों प्राण ही सोडि तनूस नश्वर । गेला असा बादल तो भयंकर ॥५५॥ये आंत तों धांवत वीर दोहन । द्वारांतुनी बोलत लोक - मोहन ॥“ मित्रा ! उदारा ! भय थोर येतसे । आला पुरीं बादल ऐकिलें असें ॥५६॥वृत्तांत माझे मज दूत सांगती । घ्याया तुझा प्राण पठाण पाहती ॥त्यांनींच हा बादल धाडिला पुरीं । जीवांस जो दुष्ट असंख्य संहरी ” ॥५७॥मित्रास तेव्हां यशवंत बोलला । “ ये हा पुढें बादल पाहिं पाडिला ॥माझ्याच हातें अति नीच तो मरे । हें मेळवीलें यश थोर मत्करें ” ॥५८॥ऐकून हें दोहन धांवतो पुढें । आश्चर्य - दृष्टी बघतो तयाकडे ॥हा बादलाचा बघुनी पराभव । तो थोर मानी यशवंत - वैभव ॥५९॥कृत्यें खळाच्या बहु कोपला भला । पौराधिकारी यशवंत बोलला ॥“ दिल्लीर हा दुष्ट मदांध सर्पसा । नाशूं अम्हांला न बघेल तो कसा? ॥६०॥हा खान राहील जिवंत जोंवर । विश्रांति चित्ता नच आमुच्या तर ॥मारावया यास सुयुक्ति काढिजे । हा पूर्ण झाला मम हेतु पाहिजे ” ॥६१॥प्रत्युत्तरा दोहनसिंग देतसे । त्याच्या मनीं एक विचार येतसे ॥तो साम्य साधारण पाहतो बळी । आकार उंची यशवंतबादलीं ॥६२॥“ शौर्याकरा ! नागर - लोक - संमता ! । घेशील याचा जरि वेष तूं स्वतां ॥गोटांत जाऊं अरिच्या सुसावध । दिल्लीरखाना ठकवूं करूं वध ” ॥६३॥ती युक्ति या मानवली बरें म्हणे । “ साधीन मी वेष असा पहा पणें ॥पोषाक काळा तनु वर्ण सांवळा । डोकीवरी मंडिल यास हा निळा ॥६४॥दाढी मिशा थोर मुखासभोंवतीं । गालीं कपाळावर वार दीसती ॥हें सर्व साधेल अशाचसारखें । होईन मी बादल सांगतों निकें ॥६५॥दिल्लीर घातास नसेल शंकत । भेटूं तया आपणही अकल्पित ॥ही रात्र आहे उमंगूं न आपण । श्वानास मारूं चल जाउं ओढुन ॥६६॥तूं शौर्यशाली भट मान सागर । वेषांतरें आज चला बरोबर ॥पन्नास घेऊं जन साहसी सवें । ज्यां भीति ऐशा समयीं न जाणवे ॥६७॥ते छावणीपासुनियां उभे भले । होतील कीं दोन हजार पावले ॥ठेवूं उभे एक हजार नागर । नानास्थळीं सावध अंतरावर ” ॥६८॥झाली तयारी घटकेंत चांगली । मार्गास ते लागति उत्सवें बळी ॥वेशींतुनी बाहिर येति जों पहा । तो रात्र झाली घटका तिथे दहा ॥६९॥भासे नभा निर्मळ रंग सांवळा । कीं घोंटुनी साफच केलि हे शिळा ॥शोभे मधें सुंदर रात्रि - नायक । कांती तयाची अति हर्ष - दायक ॥७०॥मोडी करी जो भुवना क्षणामधीं । दुग्धांबुधी तो घुसळी स्वयें विधी ॥हा ठेवितो काढुन यत्न - पूर्वक । आकाश - पात्रीं नवनीत - गोलक ॥७१॥या बंदुका घेउन सुंदरा अशा । खेळे विलासें जणु पूर्व ती दिशा ॥क्रीडेंत हा आपटतां जमीनिला । आकाश - मार्गी वर नीट चालला ॥७२॥फांके मही मंडळिं शुभ्र चांदणें । दुग्धेंचा जें सारवितें जगा क्षणें ॥मैदान झाडें अणि टेंकड्या धरें । दृष्टीस येतात पदार्थ पांढरें ॥७३॥पाटांतुनी निर्मळ पाणि वाहते । त्यांतून चंद्र - प्रतिबिंब शोभतें ॥डोळ्यावरी अद्भुत तेज तों पडे । पाराच हा लोळत चालला पुढें ॥७४॥मैदानही शांत समस्त भासतें । वारा सुटे गार हळू हळू तिथे ॥पानें फुलें हालति वृक्षिंचीं हळू । भीतात येईल कुणा जणो कळूं ॥७५॥वेळीं अशा तो यशवंत चालला । सर्वांपुढें, सत्वर टाकि पावलां ॥घालूनियां मान उगाच खालती । नानापरी आंत विचार चालती ॥७६॥क्रूराकृती बादल - युद्ध त्यासवें - । तो जिंकिला वैरि सुवीर्य - गौरवें ॥तोंडांतुनी जें वच त्याचिया पडे । तें राहिलें सर्व अनुक्रमें पुढें ॥७७॥या वेळपर्यंत जशीं महाभयें । आलीं बळानें तरलों तयां स्वयें ॥सर्व स्वकार्यें सुरळीत चाललीं । शक्ति स्वशत्रूंप्रत पूर्ण दाविली ॥७८॥होणार कैसें न कळे पुढें परी । विश्वास या साहींस कोण तो धरी ? ॥मारीन मी दिल्लीरखान काय तो ? । कीं मृत्यु येतो मज ? कोण जाणतो ? ॥७९॥जों जों पुढें जाति बघून छावणी । तों कर्णमार्गीं पडतो महा - ध्वनी ॥तंबूंतला नीट उजेडही दिसे । तीं स्पष्ट येती नजरेस माणसें ॥८०॥मागें स्ववीरां यशवंत ठेवुन । संगें तिघेही सरदार घेउन ॥चाले पुढें किंचित थांबुनी तसा । ऐके बघे भोंवति सावकाशसा ॥८१॥रात्रीं मराठे करणार रक्षण । तेथें उभे जे न विसंबती क्षण ॥दृष्टी चुकावूनच संकटा तरे । रस्त्यांत एका शिरला पुढें सरे ॥८२॥पाहे किती बैसुन चांदण्यामधें । जेवीत होते सुख तेंच त्यांस दे ॥गोष्टी किती सांगति हांसती तिथे । स्वच्छंद ते खेळति नाचती कुठे ॥८३॥तंबू तयाला मग एक दीसला । येऊन दारीं क्षण एक थांबला ॥होते उभे अंगणि शस्त्रधारक । त्या दिल्लिराचे बहु सज्ज सेवक ॥८४॥एकास बोले यशवंत सादर । “ जागा असे आंतच काय दिल्लिर ? ॥सांगा तया बादल मी इथे असें । इच्छा मनीं त्यास पहावया वसे ” ॥८५॥तो बोलला “ बादल शौर्य - सागर । येवो सुखें दाविन वाट सत्वर ॥माझा धनी उत्सुक त्या पहावया । आधीं पुढें जाउन सांगतों तया ” ॥८६॥आला क्षणें हात धरून नेतसे । निर्धास्त मागें यशवंत जातसे ॥ते दोहनादी थबकून राहती । लावूनियां सावध कान ऐकती ॥८७॥कोंचावरी खान खुशाल बैसला । हुक्का मुखा लावुन ओढितो भला ॥तोंडीं धुराचे धरि लोळ सोडितो । जातां वरी देउन चित्त पहातो ॥८८॥तों मद्य - पानें बहु धुंद दिल्लिर । पाहे पुढें बादल जोडुनी कर ॥जायास सांगे स्वजनांस बाहिर । हा एकटा मात्र असो बरोबर ॥८९॥बोले - “ प्रिया ! संगर - धीर बादला ! । दे सौख्य वृत्तांत कथून आपुला ॥तो सांपडे काय तुझ्या करीं अरी ? । आलास तूं साधुन कार्य कीं पुरीं ? ” ॥९०॥प्रत्युत्तरा कृत्रिम - बादलें दिलें । “ मोठ्या प्रयत्नें तव कार्य साधिले ॥गेलों तिथे जाउन गुप्त बैसलों । चिंतेंत मी पाहत संधि राहिलों ॥९१॥त्याच्या घरीं जाउन गांठिलें तया । झालों पुढें टाकुन मी भया दया ॥खंजीर पोटीं खुपसून पाडिला । स्वर्गास वेगें यशवंत धाडिला ” ॥९२॥ऐकून हें खान मदांध बोलतो । रंगांत येऊन खुशाल डोलतो ॥“ कां आणिलें नाहिंस शत्रु चें शिर ? । झालें मला जें असतें सुखाकर ॥९३॥स्वच्छंद मी त्यावर वा न नाचलों । नाहीं स्वलोकीं स्तुति - पात्र जाहलों ॥मीं पाठवीलें असतें तया शिरा । भाल्यास टोंचून सुखें दिगंतरा ! ” ॥९४॥हें ऐकुनी क्रोध मनांत नावरे । डोळे करी तो यशवंत बावरे ॥मारी उडी सिंहासमान दिल्लिरा । पाडूनियां लावि कट्यार तो उरा ॥९५॥दाबूनियां तोंड उरावरी बसे । दिल्लीर या वेळिं सुटूं पाहतसे ॥पौरेश शस्त्रें दुसर्या क्षणीं करी । निर्जीव दिल्लीर बलाढ्य तो अरी ॥९६॥बाहेर तेव्हां यशवंत धांवला । एका क्षणीं मित्रजनांत पावला ॥बाहेर गोटांतुनि धांवती बळें । वाटे न वारा इतुक्या जवें पळे ॥९७॥मारेकरी येउन आंत शीरले । मारून खानास पळून चालले ॥वार्ता अशी सर्व जनास ठाउक । झाली क्षणें फारचि भीति - दायक ॥९८॥‘ अल्लारहीम बिसमिल्ला ’ असा करिति गिल्ला समस्त यवन ।मल्लां चढे स्फुरण हल्ला करूं म्हणति कल्लाच जाय उडुन ॥सल्लालन - प्रमति - बल्लाळ - भूप - भल्लांस घालिति कर ।सल्लाभ मानुनिच सल्ला विचारिति न मल्हार घे पथकर ॥९९॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP