मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा २०१ ते २५०| धान्य दळणारा माणूस कथा २०१ ते २५० पारधी व साळुंकी मूर्ती वाहणारा गाढव मोठे झाड व लहान झाड नदीतला मासा व समुद्रातला मासा विहीरीत पडलेला कोल्हा एक डोळा असलेले हरिण गाढव, कोल्हा आणि सिंह दोन वाटसरू कबुतरे, घार आणि ससाणा कबुतर व मुंगळा घोडा व गाढव धान्य दळणारा माणूस बोकड आणि कुत्रा बेडूक आणि उंदीर बढाईखोर माणूस गाढव आणि त्याची सावली गरुड आणि मांजर गुराखी आणि मेंढी करडू व लांडगा बोकड आणि खाटीक कोल्हा व सिंह गव्हाणीतील कुत्रा हत्ती व प्राण्यांची सभा लांडगा आणि धनगर मधमाशी व साधी माशी मांजर व उंदीर मुंगी व कोशातला किडा स्वप्न पडलेले प्रवासी गाढव आणि लांडगा अतृप्त गाढव गाढव व कुत्रा गरुड पक्षी व कावळा कुत्रा आणि हंसी बकरीने पाळलेले मेंढरू बेडूक व दोन बैल चिलट व मधमाशी दोन कुत्र्या दोरीवरचा नाच गाढव व माळी कोंबडा व घोडा कुत्रा व त्याचे प्रतिबिंब असंतुष्ट मोर मुलगा व बोरे पारधी व त्याचा शिकारी कुत्रा गोठ्यातील सांबर शेतकरी व त्याचा नोकर शेतकरी व त्याचा कुत्रा शेतकरी व साप सिंह व दुसरे पशु बैल व बेडूक धान्य दळणारा माणूस इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral. Tags : aesop fablesbalkathaइसापनीतीतात्पर्य कथाबालकथा धान्य दळणारा माणूस Translation - भाषांतर लोकांचे धान्य दळून देणार्या एका माणसाने एके दिवशी आपल्या धान्याच्या टोपलीत एक उंदीर पकडला व त्यास आपल्या आवडत्या मांजरास खाऊ घालण्याचा विचार केला. त्यावेळी तो उंदीर दीनवाणें तोंड करून त्याला म्हणाला, 'बाबारे लोकांचं धान्य चोरावं हा माझा धंदा नाही.' लोकांच्या घरातून मी जे अन्न घेतो, ते केवळ पोटापुरतेच घेतो,' ही सबब ऐकून तो माणूस म्हणाला, 'अरे, मी तरी तुला जी शिक्षा करणार आहे, ती सार्वजनिक हितासाठीच करतो आहे, कारण तुझ्यासारख्या चोराला शिक्षा करणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे,' हे ऐकून उंदीर म्हणाला, 'बरं तर, तू आणि मी दोघंही एकाच वर्गात मोडतो याचा विचार कर. आपण दोघेही धान्यावरच आपला चरितार्थ चालवतो. अंतर इतकंच की दळायला आलेल्या धान्यातला एक दाणा जर मी चोरला तर त्यातले हजार दाणे तू चोरतोस.' तो माणूस रागावून त्यावर म्हणतो, 'प्रामाणिक माणसाने शांतपणे ऐकून घेण्याजोगे हे तुझे बोलणे नाही.' व लगेच त्याने त्या उंदरास आपल्या मांजरीस देऊन टाकले. तात्पर्य - ज्या व्यंगाबद्दल आपण दुसर्यास नावे ठेवतो, तेच व्यंग आपल्या अंगी आहे असे दाखवून दिले, तर त्याचा आपल्याला राग येतो, पण हा काही न्याय नव्हे. N/A References : N/A Last Updated : September 22, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP