मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी| खरे कारण मी माझ्याशी निव्वळ भ्रांती गंमत हिशोब अंदरकी बात ही नोकरी आहे विश्वास मी आणि ही सबब एळकोट बारीकसारीक गोष्टीमधचे समर्थन मी कोण ? ही आपली खुशाल हसत आहे ताडी आठवण चोरायचा ? आणि तो कुणाचा ? भलता नाद पाखरे यूसलेस छे, व्यवहार ढोंगी जग सहज बोलणी अगत्य आपली किंमत मुद्दामच ! आपला मार्ग कीस न् कीस अमावस्या ‘ मिस्टिक ’ अनुभव जिवंत जोडपी धड निजूसुद्धा खरे कारण निनावी प्रत्यक्ष त्याच्या वडिलांना विचारले होते आपल्या नाडीचे ठोके टोचणी नको पण - तुलाच कमीपणा पुढे काय ? असे बोलवते तरी कसे ध्येयात्मक वाचन कोण बोलवते ? स्वतःबद्दल स्वतःची कविता बंडखोर पशू भाव महत्त्वाकांक्षेपायी खरे कारण नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे. Tags : diwakarदिवाकरनाट्यछटामराठी खरे कारण Translation - भाषांतर - छेः चुकलेच ते !- पण त्याला काही इलाज नव्हता.- मी म्हणतो दिला असता खांदा. काय बिघडले असते ?- बिघडले नसते काही... पण - चार तर खांदेकरी, बोवा अधिक असते तर काही हरत नव्हती.- ते खरे...- अन् त्या पुढल्या दोघांपैकी एकजण तर किती वाकला होता, अगदी रडकुंडीला आला होता !- रडकुंडीला येईल नाहीतर काय होईळ ! बिचारे सोळा सतरा वर्षाचे तर पोर ! अन् थोडे का लांब जायचे ! - मग इतके असून तू का नाही मला खेचलेस, काही काम नव्हते काही नव्हते.- कामाचे नाही रे ! अन् असते काम तर काय मोठेसे - ! अशा वेळेला नाही उपयोगी पडायचे तर केव्हा पडायचे ?- असे वाटत असून मग का... ? का प्रेत परदेशाचे होते म्हणून ?- नाही तसे नाही ! परदेशाचे, नाही कोणाचेही असले, वेळ पडली तर खांदा हा द्यायलाच पाहिजे.- हेही तूच म्हणतोस, अन् ‘ नको जाऊस ’ हेही तूच म्हणतोस ! तेव्हा आता... हं !- मला वाटते... प्रेताचा विटाळ... आणि ‘ लोक काय म्हणतील ! ’ ह्याचे भय, यामुळेच आपण कचरतो.- इतकेच काही नाही...- आणखी थोडे प्रेताचे भय...- मग मुसलमानांना नाही का वाटत प्रेताचे भय ? ते का... ? - पण प्रेताच्या भयापेक्षा, ‘ खांदा नाही दिला तर लोक काय म्हणतील ! ’ याचे भय अधिक त्यांना वाटत असते ! आणखी त्यांच्यात प्रेताचा विटाळही नाही.- एकंदरीत जगातले वागणे, म्हणजे “ लोक काय म्हणतील ! ”- पण त्याच्याही मुळाशी धर्म आहे !- हो. तेही आहेच.- ‘ रस्त्यात प्रेत चालले असता, त्याला खांदा न देणे म्हणजे महत्पाप, अधर्म आहे ’ अशी समजूत जर आपल्याही हाडीमासी खिळली असती तर आपणही -- म्हणजे बुद्धीला बरे वाईट वाटण्यापेक्षा, धार्मिक सवयीनेच पुष्कळसे जग चालले आहे ?- यात काय संशय ! काही काही धार्मिक सवयीच इतक्या अमोलिक आहेत की, त्यामुळेच माणुसकी, स्वदेशाभिमान, स्वदेशरक्षण, वगैरे...- काय पहा ! मधापासून आपण बोलतो आहो, पण ते प्रेत काही केल्या डोळ्यांपुढून हालतच नाही ! चैनच पडत नाही !जाऊ दे रे !- ‘ तूं खांदा का दिला नाहीस ? तूं खांदा का दिला नाहीस ? ’ असे सारखे विचारीत आहेसे वाटते.- लक्षच देऊ नकोस म्हणजे झाले.- मी मेलो तर... माझे प्रेत एका खांद्यावाचून खोळंबले राहील ! असेच भय... ? N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP