मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
वैरिण झाली नदी !

वैरिण झाली नदी !

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


कशि काळनागिणी वैरिण झाली नदी ! ध्रु०

प्राणविसावा पैलतिरावरि, अफाट वाहे मधीं. १

सुखी मीन हे तरति न गणुनी लाटा कोट्यावधी. २

सुखी पांखरें गात चाललीं पार वादळीं सुधी. ३

पापिण खिळलें तिरा, विरह हा शस्त्राविणें वधी. ४

पैलतटिं न कां तृण मी झालें ? तुडविता तरी पदीं ! ५

पैलतटिं न कां कदंब फुललें ? करिता माळा कधीं. ६

प्राणाचें घे मोल नाविका, लावि पार, ने अधीं ! ७

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - समुदितमदन

राग - पिलू

ठिकाण - अजमेर

दिनांक - डिसेंबर १९२१


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP