घाबरूं नको, बावरूं नको !
भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात
घाबरूं नको, बावरूं नको !
क्षण भीतीनें गांगरूं नको ! ध्रु०
जरि शत्रूंचा अजस्त्र मारा
उलथुनि पाडी जणुं डोलारा
अभेद्य भक्कम किल्ला सारा,
तरि वीरा 'हूं चूं' करूं नको. १
जरी दिशांचे तट ढासळती,
नभ-सौधाचे स्तंभ कडाडति,
हंड्या झुंबर तडतड पडती,
तरि हे वीरा, डगमगूं नको ! २
जरि धुळीनें डोळे मिटती,
ध्रूम्र-मेघ कंठीं घुरघुरती,
सैरावैरा सैनिक पळती.
तरि रणांगणांतुनि फिरूं नको. ३
निर्वाणीचें काढ सुदर्शन,
तळघरांत जें ठेलें लपवुन,
मार नेम रे अचूक रोखुन,
तूं जयश्रीस अंतरूं नको. ४
N/A
कवी - भा. रा. तांबे
जाति - नववधू
राग - दरबारी कानडा
ठिकाण - अजमेर
दिनांक - ६ ऑगस्ट १९२१
Last Updated : October 11, 2012

TOP