शुकाख्यान - अभंग १२६ ते १५०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


मग पुसत तूं कोण । येरु ह्मणें मी दशरथ जाण । श्रावणाचें वर्तमान । सांगता झाला ॥१२६॥
आतां उदक श्रावणाविण आह्मीं न घेऊं जाण । ऐसें म्हणोन प्राण । सोडिला त्यांहीं ॥१२७॥
पुत्राकारणें पाही । शोक लागला देहीं । भेटी देऊनि जाई । योगेश्वरा ॥१२८॥
आतां पुत्रपण सत्य करीं । माता पिता मुखी करी । पाहा त्या सगरीं । काय केलें ॥१२९॥
साठीसहस्त्र संवत्सर । युद्ध केलें नृपवरें । सूर्यवंशीं महावीर । पवित्र राजा ॥१३०॥
त्यांनीं अश्वमेध मांडिला । शामकर्ण वारु आणिला । तो पृथ्वीवरी सोडिला । युद्धालागीं ॥१३१॥
ते इंद्रें ऐकिली मात । अश्वमेध करिती सगरसूत । मग मंत्र एक त्वरित । रचिता झाला ॥१३२॥
त्यावरी इंद्रें घोडा चोरिला । अदृश्य रूपें । नेला नेऊनि गुंफेमाजी बांधिला । मुनीचिया ॥१३३॥
पाताळीं कपील मुनी । सगरीं खणिली मेदिनी । अंबरीं जाहली आकाशवाणी । सांभाळारे सांभाळा ॥१३४॥
बृह-स्पति सगराचा मामा । तो म्हणे रे उत्तमा । कां आलासी आश्रमा । या ब्राह्मणाचियां ॥१३५॥
तुह्मी खणाल मेदिनी । येथें आहे कपिल मुनीं । तो भस्म करील शोधोनिं । सांडा गर्व ॥१३६॥
येरुसी न आवरे कोपु  । मेदिनी खणिती थोर मापु । प्रवेशले एकाएक । पा-ताळ भुवनीं ॥१३७॥
ऐकोनि तयाच्या गजरु । डचकला तो ऋषे-श्र्वरू । येरि ह्मणती हाचि तस्करु । धरा वहिला ॥१३८॥
यावरी कोपला महामुनी । तयासी शापिलें वचनीं । सागरु जाले तेच-क्षणीं । भस्म देख ॥१३९॥
वडिलाचें वचन न ऐकती कानीं । आपणचि म्हणती ज्ञानी । तरी मूर्ख ते गांजणी । जाणावे गा ॥१४०॥
एक सहस्त्र वर्षें जाहली सुमित्रा । तयाचे वंशीं जाहला पुत्र । अत्रिनें दिधला एक मंत्र । तयाचा भगिरथ ॥१४१॥
गंगा स्वर्गाहुनी आणिली । ते मंदाकिनी स्वर्गा झाली । पाताळीं प्रगटली । ते भोगावती ॥१४२॥
हिमाचलामाजी लपाली । येतां न देखोचि वहिली । मग बुद्धि विचारिली । तया भगीरथें ॥१४६॥
राजा इंद्र विनविला । तेणें ऐरावतीं दिधला । पर्वत फोडोनि टाकिला । गंगाओघें ॥१४४॥
सगरु जळत होते । विझविले गंगासुतें । ऐसें पुत्रपण तया भगी- रथें । सा़च केलें ॥१४५॥
अरे पुत्रा आमुतें संतोषवीजे । मतापिता उद्धरिजे । डोळे झांकती मग जाइजे । हा धर्म चोख ॥१४६॥
पुत्र कष्ट झाले गा थोर । मातेचें गाजिलें बा शरीर । अद्यापि कां निषुर । बोलसीना ॥१४७॥
ऐसें ऐकतां नेटकें । शुक-देव पुढें चमके । यावरि दृष्टि देखे । वनस्थळीं ॥१४८॥
शुक्र-देव अदृश्य झाला । व्यास त्वरित धरणीं पडला । थोर दु:खें आक्रंदला । व्याकुळ प्राण तयाचा ॥१४९॥
पुत्राविणें संसारु । तो केवळ भूमिभारु । माझें उतरावयाचें तारूं । दूरि गेलें ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP