उद्गार - ८७१ ते ८७४
निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.
Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.
८७१
संतीं सांगितलें मज । आपुलिये गुज अंतरींचे ॥१॥
म्हणती आठवीं पंढरीनाथा । सांडीं वार्ता इतरांची ॥२॥
नको विसबों तूं यासी । अगाध सुखासि पावशील ॥३॥
निळा म्हणे सेवा आतां । हेचि प्रसन्नता आमुची ॥४॥
८७२
संती ठेविलें निश्चळ ठायीं । चित्त हें पायीं आपुलीये ॥१॥
तेणें समाधन वृत्ती । नव्हेचि स्थिति पालट ॥२॥
अखंडिता राहिले ध्यान । होउनी उन्मन मनाचें ॥३॥
निळा म्हणे कृपा केली । जाणों आली या अर्थ ॥४॥
८७३
संतांचिया समागमें । गाऊं नामें आवडी ॥१॥
काय आमचें करील काळ । कळीचे मळ नातळतां ॥२॥
हरीच्या नामें शुचिर्भूत । वाचा पुनीत करचरण ॥३॥
निळा म्हणे घडीं घडीं । करुं हे जोडी नीच नवी ॥४॥
८७४
श्रोते वक्ते होती सुखी । अध्यात्मविखीं भाविक ॥१॥
ऐसा केला प्रसंग हरी । आरुष वैखरी वदवूनी ॥२॥
साबडेंचि परी रुचे ऐसें । केलें सौरसें आपुलिया ॥३॥
निळा म्हणे आपुला भक्त गुणीं । केली वोवणी अक्षरां ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : August 23, 2026

TOP