वारांची गीते - पाळणा

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


हळूहळू गाई निजरे बाळा । मोठा जटाधारी गोसावी आला । खरचरभूजा जारे फकीरा । निजला माझा पालखीं हीरा । हळूहळू गा० ॥१॥
नको येउंरे बागुलबावा । निजला माझा पालखीं रावा । सगुण गुणाचें बाळक माझें । कोणी दावा हो यासम ये दुजें । हळूहळू गा० ॥२॥
लागली दृष्टि कोण्या पापिणीची । उतरे प्रभा मुखचंद्राची । हालवी कौसल्या प्रेमपान्हा । दास म्हणे आला वैकुंठराणा । हळूहळू गा० ॥३॥
॥ जोजोजोजोरे श्रीरामा । निजसुखगुण विश्रामा । जोजो० ॥ध्रु०॥ ध्याती मुनि योगी तुजलागीं । कौसल्या वोसंगीं । जोजो० ॥१॥
वेदशास्त्रींची मति जाण । स्वरूपीं झाला लीन ॥ जोजो० ॥२॥
चारी मुक्तींचा विचार । चरणीं पाहाती थोर ॥ जोजो० ॥३॥
भोळा शंकर निशिदिनीं । तुजला जपतो मनीं । जोजो० ॥४॥
दास गातसे पाळणा । राम लक्षुमणा ॥ जोजो० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP