वारांची गीते - कौल

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्लोक ॥
दिली भेटि भर्तासि उत्साह गाजे । रघूराज राज्याभिषेकीं विराजे । पहाया सुखें लोक भूपाळ आले । रघूराज आज्ञें महीपाळ गेले ॥१॥
नमस्कार केला सुरेंद्रें महेन्द्रा । प्रभूनें अनुज्ञा दिली देव इंद्रा । पुजामान पावूनी संतुष्ट झाले । सवें देव तेतीस कोटी मिळाले ॥२॥
तया रावणाचे भयें लोक गेले । सुवर्णाचळाचे दरीं वास केले । पथीं देखिलें दैन्यवाणें प्रजाशीं । उभा राहिला इंद्र सांगे तयांशीं ॥३॥
प्रजाही पळाल्या जयाच्या भयानें । तया रावणा मारिलें राघवानें । सुरांच्या बळें फोडिल्या बंदिशाळा । गुढी रामराज्यीं जना सौखबेळां ॥४॥
पटीं बैसला राम कल्याणराजा । दुराही फिरे रे गरीबा नवाजा । अरे लोकही जाहली एक छत्री । रघूराज राजा विराजे धरित्रीं ॥५॥
जनाची पिडा पाप संता प गेला । प्रभूराम हा भाग्यसूर्यो उदेला । खडाणा* गऊ जाहल्या कामधेनू । वनीं वेलि कल्पतरू काय वानूं ॥६॥
खडे सर्व चिंतामणी तेचि गोटे । मला देखतां थोर आश्चर्य वाटे । प्रजा हो तुम्हीं शीघ्र आतांचि जावें । समस्तांसि कल्याण राजा पहावें ॥७॥
तुम्हीं भोगिले कष्ट आरण्यवासीं । तयासीं फळें प्राप्त झालीं त्वरेशीं । अपेक्षेहुनी आगळें सर्व जें जें । सुखें रामराजीं जना सामरा जें ॥८॥
महोत्साह उत्साह पाहोनि आलों । अयोध्यापुराहूनि आतां निघालों । समस्तां जनां थोर आनंद झाला । सुरीं मानवीं जयजयोकार केला ॥९॥
अरे लोक क्लेश सांडूनि द्यारे । रघूराजपादांबुजीं जा पहारे । स्थळा आपुल्या इंद्र सांगोनि गेला । गुरे वासुरें लोक सैरा निघाला ॥१०॥
प्रजा कष्टल्या चालिल्या शीण सांगो । अयोध्याधिशा राघवा कौल मागों । गुरें वासरें लेंकरें गर्द झाला । अयोध्यासमीपे बहू लोक आला ॥११॥
रघूनाथजी सांगती दूतवार्ता । प्रजालोक बाहेर आले समर्था । रघूनायकें सर्वही आणवीले । सभामंडपीं ते असंभाव्य नेले ॥१२॥
प्रभू देखिल जय्‍जयोकार केला । नमस्कार साष्टांग घालूं निघाला । कृपासागरें पाहिलें त्या प्रजांशीं । उठारे उठा राम बोले तयांशीं ॥१३॥
रघूराज सिंहासनीं सौख्यदाता । प्रजा कौल मागावया त्या उदीता । प्रभू बोलिला रे अपेक्षीत मागा । नका हेत ठेवूं समस्तांसि सांगा ॥१४॥
बहू कष्टलों पावलों जी स्वदेशा । प्रजा बोलती कौल दे राघवेशा । भुमीनें कदा पीक सांडूं नयेरे । वदे राम लक्षूमणा हें लिहीं रें ॥१५॥
मनासारिखी मेघवृष्टी न व्हावी । जया पाहिजे ते प्रसंगीं पडावी । समर्था प्रभू रोगराई नको रे । वदे राम लक्षूमणा हें लिहीं रें ॥१६॥
पिके देखतां सर्व चिंता निवाली । असावीं गृहीं संग्रहीं पेंव पालीं । बिजें बीज कोणाशिं मागूं नये रे । वदे राम लक्ष्‍० ॥१७॥
मनाची अपेक्षा गुरें बौल गाडे । घरीं दूभती कामधेनूच पाडे । रघूनाथजी भाग्य येथेष्ट देरे । वदे राम लक्ष‍० ॥१८॥
मनासारिखीं पुत्रकन्याकलत्रें । अभीवृद्धि वाढो पवित्रें । सखीं पारखीं सोयरीं प्रीति देरे । वदे राम लक्ष्० ॥१९॥
कुरूपी विरूपी कदांही नसावें । नको वृद्ध काया तरूणी असावें । दिनानाथजी सर्व सौख्यास देरे । वदे राम लक्ष्० ॥२०॥
नको दु:ख आम्हां नको शोक आम्हां । तुझें राज्य तों मृत्यु नकोचि आम्हां । रघूनाथजी शक्ति ऊदंड देरे । वदे राम लक्ष्० ॥२१॥
ग्रह सर्व रासीं शुभाईक व्हावे । सखे मित्र तैसेचि तेही असावे । दिनानाथजी विघ्रवार्ता नको रे । वदे राम लक्ष्० ॥२२॥
सदा वासना धर्मपंथीं असावी । दयाशीळ चातुर्यता श्रेष्ठ द्यावी । समर्था प्रभू पापबुद्धी नको रे । वदे राम लक्ष्० ॥२३॥
प्रितीनें प्रजा पाळि रे रामराया । नको दैन्यवाणें करीं दिव्य काया । शरीरीं कदा रोगराई नको रे । वदे राम लक्ष्० ॥२४॥
कुडें खोडि कापटय कांहीं नसावेम । सबाह्य शुचिष्मंत तैसें असावें । तुझ्या दर्शना आडकाठी नको रे । वदे राम लक्ष्० ॥२५॥
प्रभू क्लेश घेऊनि विश्रांति द्यावी । देहे तोंवरी भक्ति तूझी घडावी । विणी स्वामिणी कौल ऐसाचि देरे । वदे राम लक्ष्० ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP