वारांची गीते - सेजारती

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ आतीं आरत ऐक्यभावें ओवाळूं । प्रकाश स्वयंज्याती निजतेजें बंबाळूं ॥धृ०॥
परमात्मा श्रीराम महामाया जानकी । विश्रांति पावली गजर न कीजे सेवकीं ॥१॥
स्नेह ना भाजन नाहीं वाती पावक । सबाह्यांतरीं अवघा निघोट दीपक ॥२॥
ऐक्याचे सुमनसेजें आत्मा रघुपति राजाराम रघुपति । वाचा पारुषली शब्द न बोलवे पुढती ॥३॥
राम आणि दास चैतन्य पहुडले रामीं । हेंही बोलाया दुजा नुरे धामीं ॥४॥
रामा रामा रामा रामा रघुनंदना रघुनंदना । रामा रामा रामा रामा कुळभूषणा ॥१॥
रामा रामा रामा रामा जानकीपते जानकीपते । रामा रामा रामा रामा विमळमते ॥२॥
रामा रामा रामा रामा दीनवत्सला भक्तसत्सला । रामदास म्हणे तुझी अगम्य लीला ॥३॥
रामा रामा रामा रामा हो रामा हो । तारी तारी तारी तारी आम्हां हो ॥४॥
तोडी तोडी तोडी तोडी भवपाश भवपाश । अनन्यशरण रामीं रामदास ॥५॥
राम राम राम जप सिताभिराम सिताभिराम । राम राम राम जप सिताभिराम ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP