पंचक - गंधपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
पांचांमध्यें जें पाहिलें ।
पाहे तैसेंचि वहिलें ॥१॥
तीं अक्षरीं उच्चार ।
त्यासी माझा नमस्कार ॥२॥
सातां जनाचें शेवटीं ।
आट करितां होती भेटी ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
नवांमाजीं पहिल्या गुणें ॥४॥
॥२॥
पहिल्या गुणें दुसर्‍या पक्षा ।
तेणें लक्षावें अलक्षा ॥१॥
देवाजवळीं चुकला ।
भक्तिभेद भांबावला ॥२॥
पुढें सांपडतां धन ।
वायां करावें साधन ॥३॥
रामदास म्हणे सार ।
येथें पाहिजे विचार ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP