पंचक - नीतिपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
कामक्रोधें खवळला ।
तेणें सन्निपात झाला ॥१॥
त्यास औषध करावें ।
पोटी वैराग्य धरावें ॥२॥
कुपथ्य अवज्ञेचें झालें ।
मग तें पुढें उफाळलें ॥३॥
मर्यादेनें निर्बुजलें ।
वारें अभिमानें घेतलें ॥४॥
दडपणाचा घाम आला ।
प्राणी उठोनि पळाला ॥५॥
रामदास म्हणे भले ।
लोक म्हणती पिसाळले ॥६॥
॥२॥
झालें होऊनियां गेलें ।
आतां कैसें होय भलें ॥१॥
यासि सांगतों साधन ।
जेथें होय समाधान ॥२॥
दिवसेंदिवस व्यथा सरे ।
अंगीं आरोग्यता भरे ॥३॥
अनुताप दुरी गेले ।
कांही किंचित उरले ॥४॥
व्यथा हरली विशेष ।
अल्पमात्र उरला दोष ॥५॥
रामदास म्हणे जन्मवरी ।
पुढें विकार नानापरी ॥६॥
॥३॥
मर्यादेचे वाटे जावें ।
अनीति अव्हाटे त्यजावें ॥१॥
एक राम आहे खरा ।
तिकडे गुरुपरंपरा ॥२॥
एकाकडे आहे जन ।
एकाकडे ते सज्जन ॥३॥
पुढें विवेकें वर्तावें ।
मागें मूल सांभाळावें ॥४॥
उदंड झाले समुदाये ।
तरी आदि सोडूं नये ॥५॥
रामीं राम-दास म्हणे ।
जनीं मान्य तें बोलणें ॥६॥
॥४॥
अभक्तांसी निंदी जन ।
गुरूद्रोहीया सज्जन ॥१॥
याकारणें वाटे जावें ।
लागे अवघेंचि करावें ॥२॥
सगुण भजतां ज्ञान मोडे ।
ज्ञानें सगुण आवडे ॥३॥
कमे होतसे उपाये ।
कर्मठपण कामा नये ॥४॥
शब्दें होय समाधान ।
कामा नये शब्दज्ञान ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
किती सांगों मी लक्षणें ॥६॥

॥५॥
धरितां देवासीं अभाव ।
तोंडघशीं पाडी देव ॥१॥
याकारणें वाटें जावें ।
लागे अवघेत्ति रक्षावें ॥२॥
आहे देवासी उपाये ।
गुरुक्षोम कामा नयो ॥३॥
होतां क्रिया अमंगळ ।
त्यासि निंदिती सकळ ॥४॥
एक वैराग्य त्यागितां ।
अंगीं वाटे लोलंगता ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
सर्व नीतीनें करणें ॥६॥

अभंगसंख्या ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP