पंचक - वादपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
व्यान विषयाचें तुटावें ।
म्हणुनि हरिकथे जावें ॥१॥
ऐसी हेचि कथा गावी ।
तरि तें धांवणें नागवी ॥२॥
विषयांसीं कंटाळले ।
म्हणुनी हरिकथे आले ॥३॥
विषयध्यान सांडावया ।
आलों कीर्तनाच्या ठायां ॥४॥
काम कोध मजपासीं ।
म्हणोनि आलों हरि-कथेनी ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
वाद सांडा निरूपणें ॥६॥
॥२॥
हरिकथा निरूपणें ।
तेणें लागलें भांडणें ॥१॥
अमृताचें विष झालें ।
हें तों प्रचीतीसी आलें ॥२॥
चिंतामणी चिंता करी ।
परिस जाहला भिकारी ॥३॥
आनंदानें दुखविलें ।
काम क्रोधें नागविलें ॥४॥
कल्पतरूचा फणसा ।
एकाएकीं भरला कैसा ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
हानि घ ली निरूपणें ॥६॥

॥ अभंगसंख्या ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP