मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|अवतार वाणी|

अवतारवाणी - भजन संग्रह ३२

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


एक तूं ही निरंकार (३११)

नाम दवा सार्‍या रोगाची सर्वही दःखे मिटवी नाम ।

बलशाली प्रभुनाम असूनी काम बिघडले बनवी नाम ।

ज्ञानदृष्टी ज्यापाशी नाही मार्ग तया दाखविते नाम ।

स्वर्ग रूप ते बनुन जाते घरात ज्याच्या राहे नाम ।

पूरा सदगुरु जगी लोकही नामाचा व्यापार करी ।

नाम असे याचे निरंकार जो जाणे तो निरंकारी ।

*

एक तूं ही निरंकार (३१२)

जन्म मरण या फेर्‍यामाजी मानवास फिरणे लागे ।

मोह मायेतच, भुलुन गेला प्रीत नसे देवा संगे ।

निज सामर्थे प्रभु ना मिळे आणि कधी नाही मिळणार ।

हृदय कमले सदगुरु वाचोनी ना फूलले नाही फुलणार ।

नाही मरण तो अमर जाहला ज्याचे हरि सवे नाते ।

पूर्ण वचन 'अवतार' असे हे समज गुरुकरवी येते ।

*

एक तूं ही निरंकार (३१३)

तीर्थे फिरूनी प्रभु ना मिळे मिळे न भस्म लाविण्याने ।

जप तप संयम करूनी मिळे ना मीले न पूजा पाठाने ।

हांक तुझी ऐकणार नाही उंच स्वरे गाणे गाता ।

खुष ना होई स्तुती ऐकूनी आणि दुजाला ऐकविता ।

जो येई सदगुरुच्या चरणी प्रभु तयास मिळू शकतो ।

'अवतार' म्हणे भवसागरातूनी बेडा पार करू शकतो ।

*

एक तूं ही निरंकार (३१४)

मधूर वाणी आणि नम्रता सदगुरु हेची शिकवीतो ।

जगताचे हित ठेवा हृदयी सदगुरु हेची शिकवीतो ।

माना मंगल प्रभु इच्छेला सदगुरु हे समजावीतो ।

चुकलेल्यांना नित्य सदगुरु प्रभुच्या संगे मिळवीतो ।

पोहोचलो आता निजधामी जन्म मरण माझे चुकले ।

'अवतार' गुरुचे वचन मानीता प्रभुचे दर्शन मिळविले ।

*

एक तूं ही निरंकार (३१५)

चंद्र सूर्य आज्ञेने कुणाच्या गगनी उदय अस्त होती ।

कोणाच्या आज्ञेने अंबरी तारे चमचम करताती ।

कोण आम्हांला देतो सर्वही अन्न वस्त्र वापरण्याला ।

श्रवण वदन हे कोणी दिधले ऐकण्यास ऐकविण्याला ।

जे जन येती सदगुरुपाशी ज्ञान प्रभुचे करवीतो ।

'अवतार' म्हणे विरही जीवांना सदगुरु प्रभुशी भेटवीतो ।

*

एक तूं ही निरंकार (३१६)

देह मानवा ब्रह्म नसे हा वास अंतरी ब्रह्माचा ।

स्वंये नाचवी सर्व जगाला आड राहूनी मायेच्या ।

घरांत आपण स्वंये राहूनी द्वार तेही आपण खोली ।

नश्‍वरामध्ये वसुनी दाता सत्याचा सौदा तोली ।

सत्यच्या शोधार्थ हा मानव असत्यात धोका खातो ।

म्हणे 'अवतार' गुरु तो पुरा जो आवरणा हटवितो ।

*

एक तूं ही निरंकार (३१७)

ज्याने प्रभुने दर्शन केले सात्कार तयाचा तुम्ही करा ।

घटातूनी त्या ईश्‍वर बोले वंदन तुम्ही तयास करा ।

जड देही या चेतन शक्ती तिला जाणूनी प्रेम करा ।

जीवनाचे या महत्व जाणुनी सार्थक हा नर जन्म करा ।

पाहुनी प्रभुला जे मानीती तन मन ओवाळीन तया ।

'अवतार' अशा ब्रह्मज्ञानीला समर्पित माझी काया ।

*

एक तूं ही निरंकार (३१८)

शीख ईसाई कोणी हिन्दु कोणी जाहले मुसलमान ।

प्रत्येकाने जगात अपुले भिन्न भिन्न बनविले स्थान ।

स्वार्थ भावना मनी ठेवूनी ऐक्य साधण्याशी जाती ।

मानव मूर्ख आग जगी त्या आगीने विझवू पहाती ।

ऐक्य कधी होऊ न शकते जर ना बसला एक मनी ।

'अवतार' सदगुरुवाचून यांना समजवू शके ना कोणी ।

*

एक तूं ही निरंकार (३१९)

अग्री जैसा जळे रवि हा जो आहे उंचावरती ।

अहंपणाने असाच मानव सदा जळत राहे जगती ।

खाली असुनी धरती माता हिरवीगार सदैव दिसे ।

असो ग्रीष्म वा शरद ऋतु ती आनंदाने सदा हंसे ।

धैर्य नम्रता सहनशीलता संतजनांना प्रिय असे ।

म्हणे 'अवतार' गुरु भक्तांची रीत जगी या न्यारी असे ।

*

एक तूं ही निरंकार (३२०)

काठी एक यमाच्या हाती पापीजनी शिक्षा करण्या ।

रक छडी सदगुरुच्या हाती पापी जीवांना उद्धरण्या ।

काठी एक लुटाऊ हाती मार देई जी पथिकाला ।

काठी एक करीते रक्षण मिळे जी शुर शिपायाला ।

एक मानव ना मानव होई एक पहा होती भगवान ।

म्हणे 'अवतार' एकची वस्तु जो समजे तो मानव जाण ।

N/A

References : N/A
Last Updated : July 22, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP