मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विठ्ठल चित्रकवि

विठ्ठल चित्रकवि

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


होता ऋषी गौतम पाठिमोरा ।
तात्काळ शापें मळरूप घोरा ॥
वर्षें शिळा साठिसहस्र झाली ।
कुंडग्निनें पर्णकुटी जळाली ॥३६॥
झाडिलें मग मृगासन तेणें ।
शापिलें विपिन यास्तव एणें ॥
श्वापदें पळति वृक्ष जळाले ।
कोरडे नदि सरोवर झाले ॥३७॥

परित्यागिलीं रम्य नीडें पवित्रें ।
तरु शुष्क झाले समूलाग्रपत्रें ।
न राहे वनामाजिं मुंगी न माशी ।
गतक्रोध वैराग्य ये गौतमासी ॥३८॥

मरुशृंगातें तपातें निघाला ।
ऐसा शक्रें घातला त्यासि घाला ॥
पश्चात्तापें क्रोधशांत्यर्थ झाला ।
तोयस्पर्शें अग्नि जैसा विझाला ॥३९॥

शांता रसाजवळी वीर कदा न राहे ।
सूर्योदया तिमिर देखुनि काय राहे ? ॥
धर्मांपुढें दुरित राहिल हें घडेना ।
श्री आलियावरि दरिद्रा जसें उरेना ॥४०॥

म्हणे ‘म्या कसा आपुला घात केला ।
सुचिस्नात आलों स्वगुंफे भुकेला ॥
पुढें इंद्र येवोनि कापटयवेषें ।
सती भोगिली लिंपिली पापलेशें ॥४१॥

यदर्थीं अहल्येस संतोष नाहीं ।
वृथा शापिली म्यां न जाणोनि कांहीं ॥
नव्हे इंद्र सामान्य देवाभिमानी ।
न जाणोनि केली तपोपुण्यहानी ॥४२॥
कौमारदेहीं सुरतानुरागी ।

चंद्राग्नि गंधर्व तिघे विभागी ॥
एकेक संवत्सर दोनि भोगी ।
दुर्बाध याचा धरि कोण योगी ॥४३॥

मनश्वंद्रमा अर्यमा नेत्र ज्याचे ।
मुखापासुनी भूत इंद्राग्नि त्याचे ॥
जगत्प्राण जो प्राण संपूर्ण गात्रीं ।
विराटस्वरूपी हरी देहमात्री ॥४४॥

होणार तें तों न टळे प्रमाणीं ।
बोलोनि गेले मुनि वेदवाणीं ॥
ब्रम्हादिकां भोग घडे अनिच्छा ।
बळी असे केवळ ईश्वरेच्छा ॥४५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP