आज्ञापत्र - पत्र ३६

ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.


सात-पाच भाऊबंद अथवा नसबतीचे लोक यैसे एकजमावें वतनावरीं राहूं न द्यावें. शोध करुन जे भाऊबंद व निसबतीचे लोक असतील त्यांस दूरप्रदेशीं त्यां (चे) त्यांचे कर्तेपणायोग्य कामें सांगून कबिलेदेखील प्रत्यक प्रत्यक ठेवावे. वतनावरी गुंज होऊ न द्यावी. कदाचित वतनदारांत कोण्ही उन्मत्त, उच्छृंखल यैसा कोण्ही असला तरी त्यास नवाजून जें कठीण कार्य असेल तैसे कार्यावरी त्यास पाठवावा. त्यांमध्यें कार्य त्याचां नाश ही दोन्हीं सत्कार्येच आहेत. वाचला तर आनखी कठीण कार्य सांगावें.

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP